शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB चा 'विराट' विजय! प्ले ऑफच्या शर्यतीत इतरांच्या जीवावर उभे, पण PBKS ला बाहेर फेकले
2
गंमत-जंमत केली तर खपवून घेणार नाही, मीच बंदोबस्त करेन; अजित पवारांनी दिला सज्जड दम
3
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
4
रायली रुसोने फिफ्टी मारून बॅट उंचावली, विराट कोहलीने विकेट पडताच खोड काढली
5
भारतीय प्रवाशांनी भरलेलं विमान या देशानं माघारी पाठवलं! नेमकं काय घढलं? सरकारनं सांगितलं
6
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
7
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
8
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
9
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
10
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
11
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
12
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
13
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
14
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
15
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
16
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
17
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
18
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
19
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
20
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 

महाराष्ट्र निवडणूक निकाल : ठाण्यात कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 11:09 AM

Maharashtra Election Result 2019 : ठाण्यात शिवसेना तब्बल 20 जागांवर पुढे आहे. तर भाजपा 7 मतदारसंघांत आघाडीवर आहे.

ठाणे - विधानसभेसाठी मतदान पार पडले ठाण्यातील चार मतदारसंघातील निकालाकडे आता सर्वांच्याच नजरा लागल्या आहेत. ठाण्यातील चारही मतदारसंघात विद्यमान आमदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. तर ठाणे शहरमध्ये भाजपाचे संजय केळकर यांच्यासाठी ही लढत अतिशय निर्णायक ठरली आहे. 

पुणे, नाशकात एकही जागा न लढवणाऱ्या, युतीत पहिल्यांदाच भाजपापेक्षा कमी जागा लढवणाऱ्या शिवसेनेला मुंबई, ठाण्याने मोठा हात दिला आहे. राज्यात मोठा भाऊ असलेला भाजपा मुंबई, ठाण्यात मात्र छोटा भाऊ ठरताना दिसत आहे. मतमोजणीला सुरुवात होताच शिवसेनेने मुंबई, ठाण्यात आघाडी घेतली आहे. सध्या शिवसेना राज्यात 70 पेक्षा अधिक जागांवर पुढे आहे. यामध्ये मुंबई, ठाण्याचा मोठा वाटा आहे. ठाण्यात शिवसेना तब्बल 20 जागांवर पुढे आहे. तर भाजपा 7 मतदारसंघांत आघाडीवर आहे. मागील निवडणुकीत ठाण्यात भाजपाने 7, तर शिवसेनेने 15 जागा जिंकल्या होत्या. 

कोण आघाडीवर तर कोण पिछाडीवर?

ठाणे 

संजय केळकर (भाजप) - आघाडीवरअविनाश जाधव (मनसे) - पिछाडीवर

कळवा मुंब्रा 

जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी) - आघाडीवरदीपाली सय्यद (शिवसेना) - पिछाडीवर

कोपरी पाचपाखाडी 

एकनाथ शिंदे (शिवसेना) - आघाडीवर

ओवळा माजिवडा 

प्रताप सरनाईक (शिवसेना) - आघाडीवर

कल्याण ग्रामीण 

राजू पाटील (मनसे) - पिछाडीवर

रमेश म्हात्रे (शिवसेना) - आघाडीवर

कल्याण पश्चिम 

विश्वनाथ भोईर (शिवसेना) - आघाडीवर

प्रकाश भोईर (मनसे) - पिछाडीवर

अंबरनाथ 

डॉ. बालाजी किणीकर (शिवसेना) - आघाडीवर

रोहित साळवे (काँग्रेस) - पिछाडीवर

भिवंडी पूर्व

रुपेश म्हात्रे 

भिवंडी पश्चिम 

महेश चौघुले

ऐरोली 

गणेश नाईक (भाजप) -  आघाडीवर

गणेश शिंदे  (राष्ट्रवादी) - पिछाडीवर

बेलापूर

मंदा म्हात्रे (भाजप) - आघाडीवर

अशोक गावडे (राष्ट्रवादी) - पिछाडीवर

उल्हासनगर 

कुमार आयलानी (भाजप) - आघाडीवर

ज्योती कलानी (राष्ट्रवादी) - पिछाडीवर

डोंबिवली  

रवींद्र चव्हाण (भाजप) -  आघाडीवर

मंदार हळबे (मनसे) - पिछाडीवर

विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा लागून राहिली आहे. निवडणुकीचा कल हाती येण्यास सुरुवात झाली असून, भाजपा आतापर्यंत 100 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे, तर राष्ट्रवादी 50 जागांवर पुढे आहे. शिवसेना 70, काँग्रेस 42 जागांवर आघाडीवर आहे. बारामती, कर्जत-जामखेड, वरळी, सातारा, परळी, कोथरूड, कणकवली अशा मतदारसंघांत चुरस असून, लवकरच त्याचा निकाल हाती येणार आहे. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळतो, यावर पुढील पाच वर्षे सत्ता कोणाची ठरणार आहे. 

 

टॅग्स :thane-acठाणे शहरbelapur-acबेलापूरmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाkalyan-rural-acकल्याण ग्रामीणairoli-acऐरोली