शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
2
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
3
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
4
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
5
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
6
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
7
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
8
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
9
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
10
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
11
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
12
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
13
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
14
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
15
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
16
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
17
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
18
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
19
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
20
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: पराभव चाखलेले नऊ आमदार यावेळी सज्ज!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 00:58 IST

‘त्या’ माजी आमदारांमध्ये गणेश नाईक, दौलत दरोडा, गिल्बर्ट मेंडोन्सा यांचा समावेश

- सुरेश लोखंडे ठाणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गेल्या निवडणुकीकडे दृष्टिक्षेप टाकला असता जिल्ह्यातील तत्कालीन नऊ आमदारांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती. या पराभवाचा वचपा काढण्याच्या तयारीत ते आहेत.जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांच्या निवडणुकांसाठी २१ आॅक्टोबरला मतदान होत आहे. मागील निवडणुकीत पराभूत झालेले माजी पालकमंत्री गणेश नाईक यांच्यासह नऊ माजी आमदार या निवडणुकीत पुन्हा नशीब आजमावण्याच्या तयारीत आहेत. या माजी आमदारांना निवडणूक रिंगणात उतरवल्यास, ते विजयश्री मिळवतील की नाही, याची चाचपणी पक्षश्रेष्ठी करत आहेत. या माजी आमदारांपैकी बहुतांश नेते उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे समजते.गेल्या निवडणुकीत भाजपचे सात व शिवसेनेचे सहा आमदार, तर राष्टÑवादीचे चार आणि अपक्ष आमदार गणपत गायकवाड विजयी झाले होते. त्यापैकी भाजपचे दोन विद्यमान तर पाच प्रथमच, शिवसेनेच्या चार विद्यमानसह दोन नव्याने आणि राष्टÑवादीच्या दोन विद्यमानसह दोन आमदार नव्याने विजयी झाले होते. गणेश नाईक यांचा बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे यांनी एक हजार ४९१ मतांनी पराभव केला होता. भिवंडी ग्रामीण मतदारसंघाची भाजपची जागा शिवसेनेने, तर ठाण्याची शिवसेनेची जागा भाजपचे संजय केळकर यांनी आपल्याकडे खेचली.गेल्या निवडणुकीत सेनेचे शहापूरचे आमदार दौलत दरोडा पराभूत होऊन राष्ट्रवादीचे पांडुरंग बरोरा निवडून आले होते. आता बरोरा सेनेत दाखल झाल्यामुळे सेनेत बंडखोरी होण्याचे चिन्हे आहेत. या मतदारसंघात राष्टÑवादीचे मतदार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे राष्टÑवादी उमेदवाराची चाचपणी करत आहे. भिवंडी (प.) चे समाजवादीचे अब्दुल रशीद ताहीर मोमीन, कल्याण (प) मधील प्रकाश भोईर, उल्हासनगरमधील भाजपचे कुमार आयलानी, कल्याण ग्रामीण मनसेचे रमेश पाटील पराभूत झालेले आहेत.मीरा-भार्इंदरमधील राष्टÑवादीचे गिल्बर्ट मेंडोन्सा पराभूत झाले होते. भिवंडी ग्रामीण येथून निवडणूक लढविण्याऐवजी सुरक्षेच्या दृष्टीने भाजपचे विद्यमान आमदार विष्णू सवरा यांनी विक्रमगडमधून निवडणूक लढवली. ते येथे विजयी झाले. पण, यामुळे भिवंडी ग्रामीणची जागा भाजपने गमावली होती. चार जागांऐवजी भाजपने तीन जागा जास्त प्राप्त करून सात जागांवर विजय मिळवला होता.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत २४ पैकी सर्वाधिक पाच जागा शिवसेनेने जिंकल्या होत्या. भिवंडी (पूर्व) मध्ये अबू आझमी विजयी झाले होते. त्याचवेळी ते मानखुर्द येथूनही निवडून आले होते. त्यांनी भिवंडी पूर्वच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. यामुळे या जागेसाठी पुन्हा निवडणूक झाली असता, सेनेचे रूपेश म्हात्रे निवडून आल्यामुळे सेनेच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या सहा झाली होती.याशिवाय एनसीपी, भाजपच्या प्रत्येकी चार आमदारांसह सीपीएम, मनसे, बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष यांचे प्रत्येकी दोन आमदार २००९ मध्ये विजयी झाले होते. काँगे्रसचे उमेदवार राजेंद्र गावित पालघरमधून निवडून आले होते. गेल्या निवडणुकीला पालघर व ठाणे या दोन्ही जिल्ह्यांतून काँग्रेसचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसची कामगिरी कशी राहील, हा चर्चेचा विषय आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Ganesh Naikगणेश नाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस