शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 01:01 IST

जागावाटपाकडे लक्ष; उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोरात

- प्रशांत माने कल्याण : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नजरा आता युती आणि आघाडीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. शिवसेना, भाजपची युती होईल, असा दावा केला जात असला तरी, दुसरीकडे आघाडी घोषित होऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. स्वबळावर लढण्याचा सूर सेना, भाजपमध्ये स्थानिक पातळीवर असताना, जागावाटपात कुणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येतो, याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तूर्तास, उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची स्पर्धा तीव्र आहे. या सर्व घडामोडी पाहता युती आणि आघाडीच्या जागावाटपाबाबत पक्षनेतृत्व काय निर्णय घेतात, यावरच कल्याण, डोंबिवली परिसरातील चारही मतदारसंघांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. तूर्तास युती आणि आघाडीचे दावे दोन्हीकडच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू आहेत. परंतु, युतीची घोषणा जागावाटपासाठी अडली असून, आघाडीची घोषणा झाली, तरी जागांचे वाटप अद्याप झालेले नाही. विशेष बाब म्हणजे, युती आणि आघाडीचे दावे केले जात असले तरी, सर्व पक्षांनी सर्वच मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.२००९ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी झाली होती. परंतु, कल्याण पश्चिम मतदारसंघात पक्षांतर्गत स्पर्धा आणि मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याने केलेली बंडखोरी शिवसेनेला विजय संपादन करण्यात आडकाठी ठरली होती. यंदाही या मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोमात असून शिवसेनेच्या तब्बल ११ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा, अशीही मागणी आता होत असल्याने २००९ मधील लढतीचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमध्येही उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत स्पर्धा पाहायला मिळत असून, काहींनी तर उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच ग्रामीण मतदारसंघात कार्यालये उघडून प्रचाराला सुरुवातही केली आहे. कल्याण पूर्वेतील उमेदवार स्थानिक असावा, अशीही मागणी नेतृत्वाक डे लावून धरण्यात आली आहे. शिवसेनेप्रमाणे भाजपमध्येही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. चार मतदारसंघांसाठी २२ जणांनी मुलाखती दिल्या आहेत.राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्षआघाडीचा आढावा घेता, २००९ साली आघाडीमध्ये चारही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले होते. २०१४ मध्ये आघाडी न होता काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. दरम्यान, आता चारपैकी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली गेली आहे. त्याला काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडेही लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, त्यांची पहिली यादी २० सप्टेंबरला घोषित होईल, असे सांगितले जात होते.परंतु, एमआयएमशी युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे यादी तूर्तास लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. परंतु, युती आणि आघाडीच्या समीकरणाकडे मनसेसह वंचित बहुजन आघाडीचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस