शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
2
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
3
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
4
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
5
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
6
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
7
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त
8
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
9
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
10
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
11
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
12
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
13
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
14
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
15
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
16
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
17
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
18
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
19
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
20
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा

Vidhan Sabha 2019: युती, आघाडीवर लढतीचे गणित

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2019 01:01 IST

जागावाटपाकडे लक्ष; उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोरात

- प्रशांत माने कल्याण : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सर्वपक्षीय नजरा आता युती आणि आघाडीच्या निर्णयाकडे लागल्या आहेत. शिवसेना, भाजपची युती होईल, असा दावा केला जात असला तरी, दुसरीकडे आघाडी घोषित होऊनही काँग्रेस, राष्ट्रवादीचे जागावाटप जाहीर झालेले नाही. स्वबळावर लढण्याचा सूर सेना, भाजपमध्ये स्थानिक पातळीवर असताना, जागावाटपात कुणाच्या वाट्याला कोणता मतदारसंघ येतो, याकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील इच्छुकांचे लक्ष लागले आहे. तूर्तास, उमेदवारी मिळण्यासाठी सर्वच पक्षांमध्ये इच्छुकांची स्पर्धा तीव्र आहे. या सर्व घडामोडी पाहता युती आणि आघाडीच्या जागावाटपाबाबत पक्षनेतृत्व काय निर्णय घेतात, यावरच कल्याण, डोंबिवली परिसरातील चारही मतदारसंघांच्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार आहे.विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार, उमेदवारी अर्ज दाखल करणे, छाननी आणि अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आटोपल्यानंतर उमेदवारांना प्रचारासाठी केवळ १२ दिवस मिळणार आहेत. तूर्तास युती आणि आघाडीचे दावे दोन्हीकडच्या ज्येष्ठ नेत्यांकडून सुरू आहेत. परंतु, युतीची घोषणा जागावाटपासाठी अडली असून, आघाडीची घोषणा झाली, तरी जागांचे वाटप अद्याप झालेले नाही. विशेष बाब म्हणजे, युती आणि आघाडीचे दावे केले जात असले तरी, सर्व पक्षांनी सर्वच मतदारसंघांसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेऊन ठेवल्या आहेत, हेदेखील विसरून चालणार नाही.२००९ च्या निवडणुकीत युती आणि आघाडी झाली होती. परंतु, कल्याण पश्चिम मतदारसंघात पक्षांतर्गत स्पर्धा आणि मित्रपक्षातील पदाधिकाऱ्याने केलेली बंडखोरी शिवसेनेला विजय संपादन करण्यात आडकाठी ठरली होती. यंदाही या मतदारसंघात उमेदवारीसाठी पक्षांतर्गत स्पर्धा जोमात असून शिवसेनेच्या तब्बल ११ जणांनी उमेदवारीसाठी मुलाखती दिल्या आहेत. युती झाल्यास हा मतदारसंघ शिवसेनेला सोडण्यात यावा, अशीही मागणी आता होत असल्याने २००९ मधील लढतीचे चित्र पुन्हा दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कल्याण पूर्व आणि कल्याण ग्रामीणमध्येही उमेदवारी मिळवण्यासाठी पक्षांतर्गत स्पर्धा पाहायला मिळत असून, काहींनी तर उमेदवारी घोषित होण्यापूर्वीच ग्रामीण मतदारसंघात कार्यालये उघडून प्रचाराला सुरुवातही केली आहे. कल्याण पूर्वेतील उमेदवार स्थानिक असावा, अशीही मागणी नेतृत्वाक डे लावून धरण्यात आली आहे. शिवसेनेप्रमाणे भाजपमध्येही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी आहे. चार मतदारसंघांसाठी २२ जणांनी मुलाखती दिल्या आहेत.राष्ट्रवादीचा दोन जागांवर दावा, काँग्रेसच्या भूमिकेकडे लक्षआघाडीचा आढावा घेता, २००९ साली आघाडीमध्ये चारही मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला गेले होते. २०१४ मध्ये आघाडी न होता काँग्रेस, राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढले होते. दरम्यान, आता चारपैकी दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली गेली आहे. त्याला काँग्रेसकडून कसा प्रतिसाद मिळतो, याकडेही लक्ष लागले आहे. वंचित बहुजन आघाडीतील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या असून, त्यांची पहिली यादी २० सप्टेंबरला घोषित होईल, असे सांगितले जात होते.परंतु, एमआयएमशी युतीबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे यादी तूर्तास लांबणीवर पडल्याची सूत्रांची माहिती आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून निवडणूक लढवण्याचे संकेत मिळाल्याने स्थानिक पातळीवरील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य पसरले आहे. परंतु, युती आणि आघाडीच्या समीकरणाकडे मनसेसह वंचित बहुजन आघाडीचे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस