शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

महाराष्ट्र निवडणूक २०१९: मुंब्रा-कळव्यात वाढलेल्या २.४८ टक्के मतदानाचा फायदा कोणाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 5:57 PM

शिवसैनिक उतरलेच नाहीत : आव्हाडांची हॅट्ट्रिक होणार काय?

ठाणे : ठाण्यातील मुंब्रा - कळवा या मतदार संघात ११ उमेदवार निवडणूक रिंगणात असले तरी प्रत्यक्षात राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे हॅट्रिकसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू असून त्यांची लढत शिवसेनेच्या दीपाली सय्यद यांच्याशी होत आहे. या मतदारसंघात यंदा मतदानाची टक्केवारी ही २.४८ टक्यांनी वाढली आहे. यंदा येथे ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. त्यामुळे मतदानाच्या या वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

वास्तविक पाहता या मतदारसंघात झालेल्या विकास कामांच्या जोरावर या मतांची टक्केवारी आणखी वाढेल, अशी वाटत होती. मात्र, ती आशा फोल ठरली का?, शिवसेनेच्या मतदारांनी दीपाली सय्यद यांना नाकारले का? अशीदेखील चर्चा असून त्यामुळेच मतांची टक्केवारी दोन टक्यांनी वाढली असली तरी त्याचे परिणाम फार काही जास्त प्रमाणात होतील असे दिसत नाही.

२०१४ मध्ये या मतदारसंघात ४७.४८ टक्के मतदानाची नोंद झाली होती. समाजवादी, एमआयएम या निवडणुकीत बाहेर आहे. परंतु, एमआयएमने ‘आप’ ला टाळी दिली असल्याने त्याचा किती परिणाम होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. मागील निवडणुकीत ३ लाख ४८ हजार ४११ मतदात्यांपैकी १ लाख ६५ हजार ४२७ मतदात्यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. पैकी ९२ हजार ४५५ पुरुष आणि ७२ हजार ९७२ स्त्री मतदारांनी येथे मतदान केले होते. यंदा या मतदारसंघात ३ लाख ५७ हजार ४९३ मतदार होते. त्यापैकी १ लाख १५९ पुरुष आणि ७८ हजार ४३१ स्त्री मतदार असे मिळून एकूण १ लाख ७८ हजार ५९० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यंदाच्या निवडणुकीत ४९.९६ टक्के मतदानाची नोंद झाली असून जी मागील वेळेच्या तुलनेत २.४८ टक्यांनी जास्त दिसून आली आहे. त्यामुळे वाढलेल्या टक्केवारीचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.मागील १० वर्षांपासून या मतदारसंघावर जितेंद्र आव्हाड यांचे वर्चस्व दिसून आले आहे. शिवसेनेने मागील दोन्ही निवडणुकांमध्ये आव्हाडांना पराभूत करण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. यंदाच्या निवडणुकीत ही रणनिती आणखी प्रबळ करण्यात आली होती. परंतु, स्थानिकांना डावलून शिवसेनेने सेलिब्रिटी चेहरा या मतदारसंघात दिला. दीपाली भोसले- सय्यद यांना उमेदवारी दिली. त्यामुळे येथील इच्छुक असलेल्या शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी दिसून आली. त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेचे मतदार जास्त प्रमाणात बाहेर पडले नसल्याचे दिसून आले. दुसरीकडे मागील १० वर्षांत विकास कामे करून आणि मुंब्रा - कळव्याचे एक वेगळे रोड मॉडेल तयार करूनही आव्हाडांना मतांची टक्केवारी फारशी वाढविता आली नाही, हेदेखील तितकेच सत्य म्हणावे लागणार आहे. परंतु,असे असले तरी ठाण्यातील इतर मतदारसंघाच्या तुलनेत या मतदारसंघात २ टक्के का होईना मतदान वाढले असल्याने ती निर्णायक ठरणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरले आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडmumbra-kalwa-acमुंब्रा कळवाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस