शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

Maharashtra Government: ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदार निश्चिंत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 1:30 AM

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत.

- अनिकेत घमंडीडोंबिवली : सत्ता स्थापनेसाठी राज्यात सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाचा धसका घेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आपापले आमदार एक प्रकारे नजरकैदेत ठेवले असताना, जिल्ह्यातील भाजपचे आमदार मात्र आपापल्या मतदारसंघात कार्यरत आहेत. पक्षाच्या वेळोवेळी सुरु असलेल्या बैठकांसाठी आम्हाला मुंबईला जावे लागत आहे. मात्र, उर्वरित वेळ आम्ही मतदारसंघासाठी देत असल्याचे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारला ३० नोव्हेंबर रोजी बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. बहुमताचे धनुष्य पक्ष सहज पेलेल, असा विश्वास ठाणे जिल्ह्यातील भाजप आमदारांनी व्यक्त केला. मात्र, ज्या मतदारांनी आम्हाला निवडून दिले, त्यांच्यासाठी काम करणे हे आमचे कर्तव्य आहे. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी आम्हाला मतदारसंघातच राहायला सांगून, आवश्यकता असेल तेव्हा मुंबईत येण्याच्या सूचना केल्या आहेत.सत्तास्थापनेच्या गोंधळात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मात्र जिल्ह्यातून गायब झाले आहेत. शिवसेना नेते आ. एकनाथ शिंदे यांच्यासह या पक्षाचे ठाणे जिल्ह्यातील आ. प्रताप सरनाईक, विश्वनाथ भोईर, बालाजी किणीकर, शांताराम मोरे यांच्यासह पालघर जिल्ह्यातील सुनील भुसारा आणि श्रीनिवास वणगा हेदेखील पक्षनेत्यांच्या आदेशानुसार मुंबईतच तळ ठोकून आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे जिल्ह्यात दोन आमदार आहेत. त्यापैकी आ. जितेंद्र आव्हाड हे राज्यस्तरावरील महत्त्वाच्या घडामोडींमध्ये अग्रस्थानी दिसत असून, शहापूरचे आ. दौलत दरोडा हे अजित पवारांसोबत गेल्याने चर्चेत आले. मात्र, आपण शरद पवारांसोबतच असल्याचा व्हिडीओ त्यांनी रविवारी सोशल मीडियावर पोस्ट केला.भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसला नक्कीच बहुमत मिळेल. त्यानुसार, रणनीती आखण्यात आली आहे. भाजपचे सर्व आमदार आमच्यासोबत असून प्रत्येकाला जी जबाबदारी दिली आहे, त्यानुसार काम सुरू आहे. सर्व घडामोडींवर दिल्ली ते गल्लीपर्यंत पक्षश्रेष्ठींचे बारीक लक्ष आहे.- आ. रवींद्र चव्हाण,माजी राज्यमंत्री, भाजपभाजपचे सरकार येईल, यात शंका नाही. आम्हाला मतदारसंघामध्येच कार्यरत राहण्याचे पक्षाचे आदेश आहेत. गरजेनुसार दोन तासांत मुंबईला यावे, असेही सूचित करण्यात आले आहे. आमच्या पक्षश्रेष्ठींचा आमच्यावर पूर्ण विश्वास असल्याचे यावरून स्पष्ट होते. यातून काम करण्यासाठी ऊर्जा मिळते.- आ. गणपत गायकवाड, कल्याण पूर्वआम्हाला बंदिस्त ठेवण्याची पक्षाला गरजच नाही. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांसमवेत मी काम केलेले आहे. त्यांच्यासारखे नेतृत्व राज्याला लाभल्याने विकासकामे झपाट्याने होतील. मी आजपर्यंत विकासाच्या राजकारणाला साथ दिली आहे. यावेळीही पक्षाने दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडणार आहे.- आ. किसन कथोरे,मुरबाड मतदारसंघउल्हासनगरच्या लाखो मतदारांनी सरकारच्या विकासरथाला बघून मतदान केले आहे. त्यामुळे मतदारांसाठी आम्ही सगळे मतदारसंघातच असून कुठेही गेलेलो नाही. पक्षश्रेष्ठींच्या अहोरात्र संपर्कात आहोत.- कुमार आयलानी, उल्हासनगरशेवटी काय तर हिस्से, वाटे यासाठीच सारे काही आहे. हेच राजकारण संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्यांनी बघत असून, लाखो मतदारांची ही शोकांतिका आहे. मी स्वत: या परिस्थितीवर फारसे बोलू शकत नाही. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाची वाट मी बघत आहे. मात्र, मतदारसंघात माझे काम सुरू आहे. हे राजकारण फार काळ टिकणार नाही, असे दिसते.- आ. प्रमोद (राजू) पाटील, मनसे नेते, कल्याण ग्रामीण मतदारसंघ

टॅग्स :BJPभाजपाMLAआमदारthaneठाणे