शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019:उल्हासनगरमध्ये चुरशीची लढत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2019 01:31 IST

Maharashtra Election 2019: शहरातील समस्यांना बगल

उल्हासनगर : मतदारसंघातील समस्यांना बगल देत, शहर विकासाच्या मुद्याला मात्र दोन्ही प्रमुख उमेदवारांनी प्रचारादरम्यान हात घातला. पाणीटंचाई, रस्त्यांची दुरवस्था, अर्धवट विकासकामे, अर्धवट कल्याण-बदलापूर रस्ता, धोकादायक इमारतींचा प्रश्न, वाहतूककोंडी आदी गंभीर समस्या निवडणूक प्रचारात कुठेही दिसल्या नाही. भाजपचे आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्र्यांसह पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीही हजेरी लावली. राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्या प्रचारासाठी मात्र एकही नेता फिरकला नाही. दोन्ही नेत्यांनी विकासकामांच्या आश्वासनांचा मतदारांवर अक्षरश: पाऊस पाडला आहे.

उल्हासनगर मतदारसंघात १८ उमेदवार रिंगणात असून, भाजपचे कुमार आयलानी आणि राष्ट्रवादीच्या ज्योती कलानी यांच्यात थेट लढत आहे. रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी अखेरच्या टप्प्यातील प्रचारात नॉनसिंधी मतदारांना आकर्षित करण्याचे काम सुरू केले. पक्षश्रेष्ठी तसेच मुख्यमंत्र्यांनी कलानी कुटुंबाला शब्द देऊनही कुमार आयलानी यांना उमेदवारी दिल्याने, नाराज झालेल्या कलानी कुटुंबाने विद्यमान आमदार ज्योती कलानी यांना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक रिंगणात उतरवले.

कलानी यांच्या प्रचाराची जबाबदारी त्यांचा मुलगा व ओमी टीमचा प्रमुख ओमी कलानी यांनी घेतली आहे. आयलानींच्या निवडणुकीची सूत्रे मुलगा धीरज आयलानी, गटनेते जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक प्रकाश माखिजा, मनोज लासी, प्रदीप रामचंदानी आदींच्या हातात आहे. रिपाइंच्या बंडखोर उमेदवाराच्या मतांचा परिणाम दोघांवर होण्याची शक्यता आहे.

कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावून उल्हासनगरात मेट्रो आणण्याचे आश्वासन दिले. सिंधी समाजाला आकर्षित करण्यासाठी मेट्रो स्टेशनचे नाव सिंधुनगर ठेवण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. उत्तर भारतीय मतदारांना भाजपकडे खेचण्यासाठी भोजपुरी अभिनेता व खासदार मनोज तिवारी यांचा रंगारंग कार्यक्रम घेतला. त्यापाठोपाठ पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची रॅली काढण्यात आली.

दुसरीकडे कलानी कुटुंब स्वत:च्या ताकदीवर घरोघरी जाऊन प्रचार करीत आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचा एकही मोठा नेता प्रचार करण्यासाठी फिरकला नाही. कलानी कुटुंबाचे शहरातील वर्चस्व वेळोवेळी सिद्ध झाले असून, मोदीलाटेतही ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या चिन्हावर आमदार म्हणून निवडून आल्या होत्या.

रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला. कुमार आयलानी यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने सकाळी ६ वाजता सेंच्युरी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ उभे राहून मतदान करण्याची विनंती कामगारांना केली. वरिष्ठ नागरिक संघ, योगा केंद्र, मैदान व उद्यानात सकाळी जाऊन मतदानाचे आवाहन आयलानी यांनी नागरिकांना केले.ज्योती कलानी यांनीही प्रचारासाठी तेच तंत्र वापरले आहे. आयलानी व कलानी यांनी शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्बांधणीचा प्रश्न, अवैध बांधकामे नियमित करणे, कल्याण ते बदलापूर रस्त्याची पुनर्बांधणी, शहर विकास आराखडा, शहर विकासासाठी शासनाकडून विशेष निधी, शहरातील जागा महापालिकेला हस्तांतरित करणे आदी विकासकामांचे आश्वासन दिले.विकास ठप्प झाल्याने

नागरिकांचे स्थलांतर

शहराचा विकास ठप्प पडल्याने, हजारो नागरिक इतर शहरांत स्थलांतरित होत आहेत. परिणामी, बहुसंख्येने असलेल्या सिंधी समाजाची लोकसंख्या मराठी भाषिकांपेक्षा कमी झाली. शहारतील राजकीय मक्तेदारीमुळे शहरावर ही परिस्थिती ओढवल्याचा आरोप रिपाइंचे बंडखोर उमेदवार भगवान भालेराव यांनी केला.

टॅग्स :ulhasnagar-acउल्हासनगरMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019