शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

पिसाळलेल्या कुत्र्यांकडे लक्ष देऊ नका, प्रताप सरनाईकांनी साधला मेहतांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2019 8:01 PM

शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत.

मीरा रोड - शिवसेना सर्वात विश्वास घातकी पक्ष असून मीरा भाईंदरमधून शिवसेना मुळासकट उखडून टाकण्याचा दम भरणा-या भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहतांविरोधात शिवसैनिक संतप्त झाले आहेत. पण शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांना संदेश पाठवून मेहतांनी माफी मागितली. भावनेच्या भरात व मानसिक तणावात आपण बोलून गेल्याचे मेहतांनी फोन करून सांगितले, असे खुद्द सरनाईक यांनी म्हटले आहे. तर पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, शिवसेना संपवण्याची भाषा करणारे स्वत:च संपले, असे सरनाईक शिवसैनिकांना म्हणाले आहेत.बाळासाहेब ठाकरे कलादालनास विरोध, मेहतांनी उद्धव ठाकरे व शिवसैनिकांचे काढलेले संस्कार आदी कारणांसह सेना नगरसेवक, पदाधिकारी आदीमध्ये विविध कारणांनी मेहतांबद्दल असलेल्या रोषामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी मेहतांना ठरवून धोबीपछाड दिला. त्यामुळे मेहता खवळले असून त्यांनी थेट सेनेला सर्वात मोठी विश्वास घातकी पार्टी म्हणत शहरातून शिवसेना मुळासकट संपवणार, असा दम भरला होता.मेहतांच्या वक्तव्याने सोशल मीडियासह शिवसैनिकांमध्ये निषेध आणि संताप व्यक्त होत होता. नगरसेवक राजू भोईर यांनी तर शिवसेनेला संपवण्याची भाषा करणा-यांना मीरा भाईंदरच्या जागरुक जनतेने आधीच संपवून टाकले आहे. शिवसैनिकांना डिवचणा-यांचे काय होते हे महाराष्ट्राची जनता आणि शिवसैनिकांनी दाखवून दिले आहे. स्वत:ची खोटी कर्म आणि केलेली पापं याचं प्रायश्चित करा, असा टोला भोईर यांनी लगावला आहे.मेहतांवर शिवसैनिक संतापले असल्याने सरनाईकांनीच समजूत काढली आणि शांत राहण्यास सांगितले. लोकांनीच ज्याला संपवले त्याला नाहक मोठं करू नका, असे सांगतानाच २०२२ पर्यंत मेहतांचं राजकिय अस्तित्व जनता आणि शिवसेना ठेवणार नाही, असे सरनाईक म्हणाले. भले भले शिवसेना संपवण्याची भाषा करणारे संपले. कुत्र्यासारखे हाल झाले. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याकडे लक्ष देऊ नका, अशी बोचरी टीका त्यांनी केली. मेहतांनीच आपल्या संदेश पाठवून माफी मागितली असून, भावनेच्या भरात बोललो, असे म्हटल्याचे सरनाईकांनी सांगितले. मेहतांनी फोन देखील केला असे ते बोलले.खासदार राजन विचारे यांनी देखील मेहतांचा समाचार घेत शिवसेना संपवण्याची भाषा करण्याची देखील मेहतांची पात्रता नाही असे म्हणाले. लोकांनी तुमची पात्रता दाखवुन दिली असुन स्वत:च्या कर्माचे खापर दुसरायांवर फोडण्या पेक्षा आत्मचिंतन करुन सुधरा असा सल्ला विचारेंनी दिलाय.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019