शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
7
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
8
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
9
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
10
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
11
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
12
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
13
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
14
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
15
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
16
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
17
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
18
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
19
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
20
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी आज पाऊस पडतोय- अविनाश जाधव 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 10:15 AM

Maharashtra Election 2019 : ठाणे विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला.

ठाणेः ठाण्यात मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अशावेळी सकाळीच रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विविध मतदान केंद्रांवर मतदार पोहोचले आहेत. ठाणे विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मतदान बजावल्यानंतर अविनाश जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, खूप चांगल वातावरण आहे, या पाच वर्षांत ठाणेकरांना आमदार दिसले नाहीत, त्यांनी काही काम केलेली नाहीत, त्यामुळे मतदारांमध्ये एक राग अन् रोष आहे, मतदानासाठी मतदार केंद्रांवर गेलो, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर राग दिसत होता. त्यामुळे बदल नक्की होईल, मराठी माणसाच्या विकासासाठी, मराठी माणसाच्या पाठी खंबीर उभे राहण्यासाठी मला मतदान करा, ठाण्यात कुठल्याही प्रकराचं काम झालं नाही.जो माणूस पाच वर्ष दिसला नाही, तो पुढची पाच वर्षं काय काम करणार आहे. नागरिकांनी माझा आवाज बुलंद करण्यासाठी मला मतदान करा. आज पडणारा पाऊस हा राज्यातील घाण आणि महाराष्ट्राला लागलेली धूळ वाहून जाण्यासाठी पडत असल्याचं वक्तव्य करत ठाणेकरांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन अविनाश जाधव यांनी केलं आहे.तर दुसरीकडे पावसाचा जोर कमी असला तरी ठाण्यातील नागरिक आहेत हे मोठ्या प्रमाणात मतदान करतील, असा अंदाज वर्तवला जातोय. सकाळ सकाळीच ठाणे शहर मतदारसंघातील भाजपा उमेदवार संजय केळकर आणि जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या कुटुंबीयांसमवेत यांनी देखील रांगेत उभे राहून मतदान करून नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019thane-acठाणे शहर