शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB च्या वाट्याला यंदाही 'ई साला कप नामदे' नाहीच! राजस्थान रॉयल्सकडून 'विराट' स्वप्नांचा चुराडा 
2
चित्त्यापेक्षा चपळ! विराट कोहलीचा भन्नाट थ्रो, ध्रुव जुरेल रन आऊट; Janhvi Kapoor चं सेलिब्रेशन
3
पुणे अपघात प्रकरणी बाल हक्क न्यायालयाचा मोठा निर्णय; १७ वर्षांच्या 'बाळा'ची बालसुधारगृहात रवानगी
4
२२ खून, अनेक गुन्हे, वेशांतर करून रामललांच्या दर्शनाला गेला असताना पोलिसांनी आवळल्या मुसक्या
5
हे आहेत लोकसभा निवडणूक लढवत असलेले सर्वात श्रीमंत उमेदवार, संपत्तीचा आकडा वाचून विस्फारतील डोळे  
6
"मद्य घोटाळा असो किंवा नॅशनल हेराल्ड घोटाळा...", PM मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल
7
RCB चे तारे ज़मीन पर! महत्त्वाच्या सामन्यात शरणागती, राजस्थान रॉयल्सची सुरेख गोलंदाजी
8
फुल राडा! RR चा कोच कुमार संगकारा तिसऱ्या अम्पायरला जाब विचारायला गेला अन्... Video
9
रोव्हमन पॉवेलचा Stunner कॅच; फॅफ ड्यू प्लेसिस माघारी, पण विराट कोहलीने रचला विक्रम भारी
10
विराट कोहलीला 'फसव्या' चेंडूवर युझवेंद्र चहलने गंडवले; विक्रमवीराला तंबूत पाठवले, Video 
11
भाजप किती जागा जिंकेल? अमेरिकेतील प्रसिद्ध राजकीय तज्ञाने केली भविष्यवाणी, म्हणाले...
12
Fact Check: राष्ट्रपती मुर्मू यांच्या रंगावर भाष्य करतानाचा पंतप्रधान मोदींचा 'तो' Video एडिटेड
13
PHOTOS: ब्यूटी विद ब्रेन! सर्वात तरूण IAS अधिकारी; सौंदर्याच्या बाबतीत जणू काही अभिनेत्रीच
14
पुण्यातील अपघाताबाबत राहुल गांधींचा तो दावा गैरसमजातून, असीम सरोदेंनी सांगितली कायद्यातील तरतूद
15
उच्च न्यायालयाचा ममता सरकारला दणका; 2010 नंतर दिलेली सर्व OBC प्रमाणपत्रे रद्द
16
आला उन्हाळा, तब्येत सांभाळा; उष्णतेमुळे 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
17
धार्मिक वक्तव्ये टाळा, सैन्याचे राजकारण करू नका; भाजप-काँग्रेसला निवडणूक आयोगाचे निर्देश
18
इंडिया आघाडीतून पंतप्रधान कोण होणार? जयराम रमेश म्हणाले- "सर्वात मोठ्या पक्षाचा उमेदवार..."
19
वर्ल्ड कपच्या तोंडावर अमेरिकेकडून बांगलादेशचा धुव्वा; भारताच्या शिलेदारानं सामना गाजवला
20
राज ठाकरेंचं विधान अन् सभागृहात हशा; मुलांमधील लठ्ठपणाबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आर्मी युनिफॉर्मसमोर महागडी साडी फिकी - गौरी महाडिक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 4:39 AM

माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी, मग कुटुंब आणि त्यानंतर मी स्वत: अशी भावना व्यक्त करत हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच ध्येय माझ्यासमोर आहे.

ठाणे : माझ्यासाठी माझा देश सर्वात आधी, मग कुटुंब आणि त्यानंतर मी स्वत: अशी भावना व्यक्त करत हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक यांचे स्वप्न पूर्ण करणे, हेच ध्येय माझ्यासमोर आहे. साडी नेसण्यासाठी फक्त ११ दिवस राहिले आहेत. आर्मीच्या युनिफॉर्मसमोर लाखाची साडीही मला फिकी वाटते, अशा भावना पतीच्या पावलावर पाऊल ठेवत सैन्यदल अधिकारी प्रशिक्षणासाठी जाणाऱ्या वीरपत्नी गौरी महाडिक यांनी व्यक्त केल्या.श्री शनैश्वर फाउंडेशनतर्फे शुभंकरोती मंडळ हॉल येथे रविवारी झालेल्या ‘आपल्या वीरांगना, आपला अभिमान’ या कार्यक्रमात महाडिक यांचा गौरव करण्यात आला. यावेळी त्यांची मुलाखतही घेण्यात आली. लग्न कसे ठरले, हे सांगताना त्यांनी प्रसाद महाडिक यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, त्यांचा मला दोन वर्षे १० महिने १५ दिवसांचा सहवास लाभला. या काळात त्यांनी मला सर्व नियम शिकवले होते. जेव्हा मी तिरंगा पाहायचे, तेव्हा अभिमान वाटायचा, आजही अभिमान वाटतो. ते तिरंगा घेऊन आले आणि त्यातूनच गेले, या भावना मनात कायम आहेत. ते आजच्या दिवशी कमिशनर झाले होते आणि पुढच्या वर्षी मीपण होणार, याचा मला अभिमान आहे. त्यांना मी नेहमी हसताना आवडत होते. त्यामुळे मी कधीच रडणार नाही. मला आर्मी जॉइन करून त्यांचा युनिफॉर्म परिधान करून त्यांचे स्टार लावायचे आहेत. प्रशिक्षणासाठी मला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळते. पूर्वी आर्मीत जाण्याविषयी मी कधीच विचार केला नव्हता. मला त्यांची पत्नी म्हणूनच जगायचे होते. मी ‘सीएस’ केले आहे. मात्र, आर्मीत जाणे माझ्या नशिबात लिहिल्याने तेथे मी पूर्ण तयारीने उतरणार आहे, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. दरम्यान, यावेळी हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांचे भाऊ परेश मोहरकर आणि गौरी यांच्या आईवडिलांचाही सन्मान झाला.युद्ध नको उपाय सांगायुद्ध जाहीर करा, असे सर्वचजण म्हणत असतात, पण ते सोपे नाही. सरकारने विचारले तर त्यांना उपाय सांगा, पण युद्ध जाहीर करा, असे म्हणू नका. कारण, आम्ही गमावले आहे, याचे दु:ख आम्हालाच माहीत आहे. युद्ध हा उपाय नाही. सरकार आणि आर्मीवर विश्वास ठेवा, असे गौरी महाडिक यांनी सांगितले.एखादे मूल दत्तक घेण्याचा किंवा दोन मुलांचा शैक्षणिक खर्च करणार असल्याचा निर्धार व्यक्त करताना हुतात्मा मेजर प्रसाद महाडिक आणि हुतात्मा मेजर प्रफुल्ल मोहरकर यांच्या नावाने दरवर्षी श्री शनैश्वर फाउंडेशनला २५ हजार रुपयांची देणगी देण्याचे त्यांनी जाहीर केले.आपल्या मुलांचे लग्न करताना पत्रिका पाहू नका, पत्रिकेमागे लागून त्यांचे आयुष्य वाया घालवू नका. त्यांना एखादी व्यक्ती आवडली असेल, तर लग्न करण्याची परवानगी द्या. सुना, जावई आनंदाने स्वीकारा, असा सल्ला त्यांनी दिला.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानthaneठाणे