शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा; उल्हासनगरात ऐन पावसाळ्यात पाणी टंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2021 6:59 PM

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो.

- सदानंद नाईक 

उल्हासनगर : शहरातील विविध भागात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नागरिकांना पिण्याच्या पाणीसाठी वणवण भटकण्याची वेळ आली. एमआयडीसीची जलवाहिनी फुटून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाई निर्माण झाल्याची कबुली पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारेख यांनी दिली. 

उल्हासनगर महापालिकेकडे स्वतःचे पाणी स्रोत नसल्याने, शहराला एमआयडीसीकडून दररोज १४० एमएलडी पाणी पुरवठा होतो. दरम्यान एमआयडीसीची जलवाहिनी सलग दोन दिवस फुटल्याने, शहरातील विविध विभागात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता पारीख यांनी दिली. सुभाष टेकडी, संभाजी चौक, भरतनगर, ओ टी सेक्शन, कुर्ला कॅम्प, गायकवाड पाडा, दहाचाळ, ज्योती कॉलनी, शहाड गावठण, आनंदनगर आदी परिसरात पाणी टंचाई निर्माण होऊन, महिलांना पाण्याच्या एका हंड्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली. गेल्या शुक्रवारी जलवाहिणीच्या दुरुस्तीसाठी एमआयडीसीने एक दिवस पाणी पुरवठा बंद केला. तर दुसऱ्या दिवशी जलवाहिनी फुटली. तर त्यानंतर कमी दाबाने पाणी पुरवठा झाल्याने पाणी टंचाई निर्माण झाली. 

शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याने, नगरसेवक व नागरिकांच्या तक्रारीने पाणी पुरवठा विभागाची दाणादाण उडाली. अखेर सोमवारी सायंकाळ पासून पाणी पुरवठा सुरळीत झाल्याने, अनेक भागात पाणी टंचाईची झळ बसली. पाणी पुरवठा विभागाचे उपायुक्त सुभाष जाधव यांनी पाणी पुटवठा विभागाचा आढावा घेऊन, कमी दाबाने पाणी पुरवठा होत असल्याबाबत पाणी पुरवठा करणाऱ्या एमआयडीसीला जाब विचारला. शहरात राबविण्यात आलेली अर्धवट पाणी पुरवठा वितरण योजना, पाणी गळती, कमी दाबाने व अनियमित पाणी पुरवठा आदी कारणाने शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याची माहिती उपायुक्त सुभाष जाधव यांनी दिली. शहर पूर्वेतील अनेक भागात आजही दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे.

पाणी गळती थांबता थांबे ना?

शहरात ३५० कोटीच्या निधीतून पाणी वितरण योजना राबविली असूनही शहरात पाणी टंचाई कायम आहे. जलवाहिनी गळती होऊन लाखो लिटर पाणी गटारात जात असून महापालिकेने पाणी गळती थांबविली तर लाखो लिटर पाण्याची बचत होऊन नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा होणार आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरWaterपाणी