शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

शिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : इतिहास अभ्यासक अजित मोघे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 17:22 IST

इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी आपल्या ओघवत्या शैलीतून उपस्थितांना अफजलखानाचा वध इतिहास ज्ञात अज्ञात या विषयावर संबोधित केले.

ठळक मुद्देशिवचरित्राच्या अभ्यासाची ज्ञानमार्गावरुन वाटचाल आवश्यक : अजित मोघेअफजलखानाचा वध ज्ञात - अज्ञात इतिहास या विषयावर मोघे यांचे व्याख्यान महाराजांच्या कार्याचा अभ्यास डोळसपणे करण्याची गरज : अजित मोघे

ठाणे: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांना देवाचा अवतार मानून त्यांची पूजा करणाऱ्यांची संख्या भरपूर आहे, पण त्याच वेळी महाराजांच्या खºया कार्याची आधुनिक आणि वैज्ञानिक पद्धतीने मांजणी करुन ज्ञानमार्गावरुन वाटचाल करण्याची खरी गरज असल्याचे इतिहास अभ्यासक अजित मोघे यांनी सांगितले.           ठाण्याच्या विष्णुनगर माघी गणेशोत्सव मंडळाचे यंदा ६३ वे वर्ष आहे. त्या निमित्ताने मंगळवारी आयोजित केलेल्या अफजलखानाचा वध ज्ञात - अज्ञात इतिहास या विषयावर मोघे यांचे व्याख्यान आयोजित केले होते. महापालिका शाळा क्र. १९ शाळेच्या सभागृहात हे व्याख्यान पार पडले. शिवचरित्राचा अभ्यास का व कसा करायचा या विषयी बोलताना मोघे म्हणाले की, महाराजांपुर्वी देखील सह्याद्री होता, त्यावरील उत्तुंग गरिदुर्ग होते, गनिमी कावा होता, शूर आणि स्वामिनिष्ठ सैनिक होते, मुत्सद्दी होते, तत्त्वविवेचक पंडीत होते आणि धर्मपरायण प्रजा पण होती. पण या सर्वांच्या योग्य समन्वय साधून महाराजांपुर्वी कोणीही स्वराज्य स्थापन करु शकला नाही. नेमके इथेच महाराजांचे मोठेपण आहे. महाराजांच्या कार्याचा अभ्यास सामान्य माणसापासून असामान्यांपर्यंत सर्वांनीच अधिक डोळसपणे करण्याची गरज असल्याचे आग्रही प्रतिपादन त्यांनी केले. जगात सर्वच प्रगत देशांमध्ये इतिहासाचा उपयोग जिज्ञासापुर्तीसाठी होतो दुर्दैवाने भारतात इतिहासाचा उपयोग फक्त आणि फक्त मनोरंजनासाठी होतो. याचे उदाहरण देताना ते पुढे म्हणाले की, फ्रान्समधील राष्ट्रपुरूष नेपोलीयन या व्यक्तीवर तेथील राष्ट्रीय संग्रहात २७ हजार ग्रंथ आहेत. महाराजांच्या लौकीक पराक्रमाच्या गोष्टी आपण ओरडून सांगतो पण त्यांच्या अलौकीक पराक्रमाच्या गोष्टी जगासमोर येण्याची गरज आहे. शिवाजी या शब्दाचा मुळात अर्थ व्यवस्था आहे. अलौकीक म्हणजे महाराजांचे प्रशासन व्यवस्था, शासन व्यवस्था आणि प्रशासकीय निर्णयांची काटेकोर अंमलबजावणी, प्रशासनातील करडी शिस्त या गोष्टींचा अभ्यास व्हायला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अफजल खान या प्रश्नाला जावळी हे उत्तर महाराजांनी १६४९ साली आपल्या कल्पनेत रचले आणि ते १६५९ ला वास्तवात साकारले यावर अधिक बोलताना मोघे म्हणाले की, एक सेनापती म्हणून शिवाजी महाराजांची महानता यातून प्रतित होते की, स्वराज्यावर कोसळणारे अफजलखानचे संकट त्यांनी दहा वर्षे पुढे ढकलले. मुळात १६४९ ला तो चालून आला होता पण कोवळ््या स्वराज्याला हे न झएपणारे युद्ध आहे ही महत्त्वाची बाब महाराजांच्या लक्षात आली. अफजलखानला रणांगणात खेचण्यासाठी त्याला प्रतिकूल आणि आपल्याला अनुकूल अशी युद्धभूमी म्हणजे जावळी. ती आपल्या ताब्यात आता नसल्यामुळे अफजलखान या संकटाला हात घालण्यात अर्थ नाही हे ओळखून हे युद्ध महाराजांनी पुढे ढकलले.

टॅग्स :thaneठाणेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजhistoryइतिहास