शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

रेल्वेचे सहकार्य नसल्याने कल्याण पत्रीपूलाचे बांधकाम रखडणार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 4:18 PM

कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.

ठळक मुद्देकल्याण डोंबिवली शहरातील काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली.महिना झाल्यानंतरही काम बंद का? असा सवाल पवार यांनी एमएसआरडीसीच्या अभियंत्यांना विचारला.रेल्वेने सहकार्य केल्यास आगामी वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पवार यांना दिले.

डोंबिवली - कल्याण डोंबिवली शहरातील जलद वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या काम बंद असलेल्या पत्री पुलाच्या बांधकामाची पाहणी शनिवारी आमदार नरेंद्र पवार यांनी केली. त्यावेळी महिना झाल्यानंतरही काम बंद का? असा सवाल पवार यांनी एमएसआरडीसीच्या अभियंत्यांना विचारला. त्यावर रेल्वे प्रशासनाकडून काही तांत्रिक परवानगी मिळण्यासाठी विलंब झाला आहे. त्यामुळे पुलाचे बांधकाम रखडण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले. त्यावर पवार यांनी तात्काळ खासदार कपिल पाटील यांच्याशी संपर्क साधत लवकरच तोडगा काढला जाईल, पण कामाला सुरुवात करा काम बंद ठेवू नका असे स्पष्ट केले.

रेल्वेने सहकार्य केल्यास आगामी वर्षभरात पूल उभा राहण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी पवार यांना दिले. यावेळी त्यांच्यासोबत एमएसआरडीसीचे उपअभियंता अनिरुद्ध बोरडे, कंत्राटदार दीपक मंगल,सल्लागार एल.एन.मालविय उपस्थित होते. गेल्या महिन्यात १८ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेने ६ तासांचा पॉवर ब्लॉक वाहतुकीसाठी धोकादायक ठरलेला ब्रिटिशकालीन १०४ वर्षांचा जुना पत्री पुल पाडला. त्यानंतर या जागेवर नवा पुल अत्यंत जलद पणे उभारू असे आश्वासन एमएसआरडीसीने दिले होते. मात्र आता त्यास महिनाभर उलटून गेल्यानंतरही काम कुर्म गतीने सुरू असल्याचे आमदार पवार यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी संताप व्यक्त केला.

पूल पाडल्याने वाहतूकीचा संपूर्ण भार हा बाजूलाच असणाऱ्या नव्या पुलावर येत आहे. तेथेही प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना कल्याण डोंबिवलीकरांना करावा लागतो. वारंवार विचारणा करूनही अधिकारी वर्ग नीट माहिती देत नसल्याने आमदारांनी नाराजी व्यक्त केली. तसेच थेट भेट देत सद्यपरिस्थितीचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे संबधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांची सुटी असतानाही धावाधाव झाली. यापुढे रेल्वेकडून कसलाही विलंब होणार नाही, याची काळजी घेण्यात येणार असल्याचे सांगितले. नागरिकांना होणारा त्रास आणि शहरातील वाहतूकीवर येणारा ताण लक्षात घेता सबंधित सर्व यंत्रणांनी नव्या पत्री पुलाच्या बांधकामाला गती देण्याची आवश्यकता असल्याचे पवार म्हणाले. 

टॅग्स :kalyanकल्याणrailwayरेल्वे