शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

पालघर जिल्ह्यात रिलायन्सकडून जमीन अधिग्रहणात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:25 IST

कॉन्शिअस सिटीझन फोरमचा आरोप : गॅस पाइपलाइन प्रकल्पासाठी दिलेल्या नुकसानभरपाईत शेतकऱ्यांची फसवणूक

अनिरुद्ध पाटील ।वाडा : पालघर व ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये शेतकºयांच्या जमिनींचे अधिग्रहण करताना २०१३ भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या उच्चतम मूल्याचा आधार घेऊन नुकसान भरपाई देणे बंधनकारक असताना संबंधित यंत्रणेने शेतकºयांची दिशाभूल करून मनमानीपणे मोबदला दिला आहे. नुकसान भरपाईचा दर ठरविण्याबाबत शेतकºयांना विश्वासात घेतले नसून या संपूर्ण प्रक्रि येत कोणतीही पारदर्शकता नसल्याने मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा आरोप कॉन्शिअस सिटीझन फोरमचे अध्यक्ष के. कुमार यांनी पत्रकार परिषदेत केला.केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाद्वारे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून गुजरात राज्यातील दहेज ते महाराष्ट्रातील नागोठणेपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना संबंधित यंत्रणेने ज्या शेतकºयांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जात आहे. त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देताना एकाच गावातील बाधित शेतकºयांना वेगवेगळ्या दराने नुकसान भरपाई दिल्याचे उघड झाले आहे.ज्या शेतकºयांनी विरोध दर्शवला अथवा ज्यांचे राजकीय हितसंबध आहेत त्यांना चढ्या दराने मोबदला दिला. तर सर्व सामान्य शेतकºयांना अत्यल्प मोबदला देत तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकºयांची मोठ्याप्रमाणावर फसवणूक झाली असल्याने शेतकºयांना नियमानुसार योग्य मोबदला मिळायला हवा या करीता कॉन्शिअस सिटिझन फोरम या संघटनेने पुढाकार घेतला आहे.रविवारी (दि. २२) कुडूस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घणाघाती आरोप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, दयानंद घरत, विनोद म्हसकर यांच्यासह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते. हा प्रकल्प राबवताना सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये संबंधित सक्षम प्राधिकाºयांनी शेतकºयांना विश्वासात घेऊन बाजारभावाच्या उच्चतम मूल्यानुसार नुकसान भरपाईचा दर ठरविणे अपेक्षित असताना संबंधित यंत्रणेने व रिलायन्स कंपनीने परस्पर दर ठरविले असल्याचा आरोप के. कुमार यांनी केला आहेत.ही जमीन अधिग्रहित करताना महसूल व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकºयांवर दबाव टाकून व भीती घालत भूसंपादन करून मनमानीपणे नुकसान भरपाईचा दर दिला आहे. यात कुठेही बाजारभावाच्या उच्चतम मूल्याचा आधार घेतला गेला नसल्याने शेतकºयांची फसवणूक झाल्याचे कुमार म्हणाले. एकाच गावात भिन्न भिन्न दर कसे काय असू शकतात? असा सवाल करत या संपूर्ण प्रक्रि येची पारदर्शकपणे चौकशी होऊन शेतकºयांना २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये योग्य नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित सर्व यंत्रणांकडे व सरकारकडे आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत. त्यानंतरही शेतकºयांना न्याय मिळाला नाही तर सोबत असलेल्या शेतकºयांना घेऊन जनहित याचिका दाखल करून न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करू असेही कुमार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकर्यांवर अन्याय करत असते. परंतु येथील जनता इंग्रजांविरोधात लढल्याचा इतिहास आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनी आणि सरकारविरोधात लढायला कचरणार नाही. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय दिला नाही तर लवकरच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करू.- के. कुमार, अध्यक्ष,कॉन्शिअस सिटिझन फोरमआमच्या गावातील शेतकर्यांना वेगवेगळ्या दराने नुकसान भरपाई दिली गेली. आमच्या जमिनीत काम करण्यास मनाई केली असता संबंधित दलालांकडून व पोलीसांकडून धमकविण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून योग्य मोबदला मिळाला नाही.- यतिश यशवंत पाटील,शेतकरी , लाप, ता. भिवंडीआमच्या कुटुंबाच्या मालकीच्या शेतजमिनीतून आमच्या सम्मतीशिवाय पाईपलाईन टाकण्यात आली. नुकसान भरपाईचा मोबदलाही मिळाला नाही. आमचे कुटुंब नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने संबंधित कंपनीने मनमानीपणे आमच्या जागेत काम केले.- अमर गोपाळ पष्टे,शेतकरी,डोंगस्ते, ता. वाडा

टॅग्स :Relianceरिलायन्स