शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पालघर जिल्ह्यात रिलायन्सकडून जमीन अधिग्रहणात अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 01:25 IST

कॉन्शिअस सिटीझन फोरमचा आरोप : गॅस पाइपलाइन प्रकल्पासाठी दिलेल्या नुकसानभरपाईत शेतकऱ्यांची फसवणूक

अनिरुद्ध पाटील ।वाडा : पालघर व ठाणे जिल्ह्यातून गेलेल्या रिलायन्स गॅस पाईपलाईन प्रकल्पामध्ये शेतकºयांच्या जमिनींचे अधिग्रहण करताना २०१३ भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या उच्चतम मूल्याचा आधार घेऊन नुकसान भरपाई देणे बंधनकारक असताना संबंधित यंत्रणेने शेतकºयांची दिशाभूल करून मनमानीपणे मोबदला दिला आहे. नुकसान भरपाईचा दर ठरविण्याबाबत शेतकºयांना विश्वासात घेतले नसून या संपूर्ण प्रक्रि येत कोणतीही पारदर्शकता नसल्याने मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाली असल्याचा आरोप कॉन्शिअस सिटीझन फोरमचे अध्यक्ष के. कुमार यांनी पत्रकार परिषदेत केला.केंद्र सरकारच्या पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस मंत्रालयाद्वारे रिलायन्स कंपनीच्या माध्यमातून गुजरात राज्यातील दहेज ते महाराष्ट्रातील नागोठणेपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम करताना संबंधित यंत्रणेने ज्या शेतकºयांच्या जमिनीतून ही पाईपलाईन जात आहे. त्या शेतकºयांना नुकसान भरपाई देताना एकाच गावातील बाधित शेतकºयांना वेगवेगळ्या दराने नुकसान भरपाई दिल्याचे उघड झाले आहे.ज्या शेतकºयांनी विरोध दर्शवला अथवा ज्यांचे राजकीय हितसंबध आहेत त्यांना चढ्या दराने मोबदला दिला. तर सर्व सामान्य शेतकºयांना अत्यल्प मोबदला देत तोंडाला पाने पुसली आहेत. त्यामुळे शेतकºयांची मोठ्याप्रमाणावर फसवणूक झाली असल्याने शेतकºयांना नियमानुसार योग्य मोबदला मिळायला हवा या करीता कॉन्शिअस सिटिझन फोरम या संघटनेने पुढाकार घेतला आहे.रविवारी (दि. २२) कुडूस येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी घणाघाती आरोप केले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रवीण कदम, दयानंद घरत, विनोद म्हसकर यांच्यासह शेकडो बाधित शेतकरी उपस्थित होते. हा प्रकल्प राबवताना सन २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये संबंधित सक्षम प्राधिकाºयांनी शेतकºयांना विश्वासात घेऊन बाजारभावाच्या उच्चतम मूल्यानुसार नुकसान भरपाईचा दर ठरविणे अपेक्षित असताना संबंधित यंत्रणेने व रिलायन्स कंपनीने परस्पर दर ठरविले असल्याचा आरोप के. कुमार यांनी केला आहेत.ही जमीन अधिग्रहित करताना महसूल व पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकºयांवर दबाव टाकून व भीती घालत भूसंपादन करून मनमानीपणे नुकसान भरपाईचा दर दिला आहे. यात कुठेही बाजारभावाच्या उच्चतम मूल्याचा आधार घेतला गेला नसल्याने शेतकºयांची फसवणूक झाल्याचे कुमार म्हणाले. एकाच गावात भिन्न भिन्न दर कसे काय असू शकतात? असा सवाल करत या संपूर्ण प्रक्रि येची पारदर्शकपणे चौकशी होऊन शेतकºयांना २०१३ च्या भूसंपादन कायद्यान्वये योग्य नुकसान भरपाई मिळावी म्हणून शेतकºयांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाºयांना भेटणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित सर्व यंत्रणांकडे व सरकारकडे आम्ही ही मागणी लावून धरणार आहोत. त्यानंतरही शेतकºयांना न्याय मिळाला नाही तर सोबत असलेल्या शेतकºयांना घेऊन जनहित याचिका दाखल करून न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करू असेही कुमार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले.सरकार कोणत्याही पक्षाचे असो ते भांडवलदारांच्या हितासाठी सर्वसामान्य शेतकर्यांवर अन्याय करत असते. परंतु येथील जनता इंग्रजांविरोधात लढल्याचा इतिहास आहे. त्यामुळे रिलायन्स कंपनी आणि सरकारविरोधात लढायला कचरणार नाही. सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय दिला नाही तर लवकरच न्यायालयीन मार्गाचा अवलंब करू.- के. कुमार, अध्यक्ष,कॉन्शिअस सिटिझन फोरमआमच्या गावातील शेतकर्यांना वेगवेगळ्या दराने नुकसान भरपाई दिली गेली. आमच्या जमिनीत काम करण्यास मनाई केली असता संबंधित दलालांकडून व पोलीसांकडून धमकविण्यात आले. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाला असून योग्य मोबदला मिळाला नाही.- यतिश यशवंत पाटील,शेतकरी , लाप, ता. भिवंडीआमच्या कुटुंबाच्या मालकीच्या शेतजमिनीतून आमच्या सम्मतीशिवाय पाईपलाईन टाकण्यात आली. नुकसान भरपाईचा मोबदलाही मिळाला नाही. आमचे कुटुंब नोकरीनिमित्त बाहेरगावी असल्याने संबंधित कंपनीने मनमानीपणे आमच्या जागेत काम केले.- अमर गोपाळ पष्टे,शेतकरी,डोंगस्ते, ता. वाडा

टॅग्स :Relianceरिलायन्स