शहरं
Join us  
Trending Stories
1
लुक-आउट नोटीस, जामीन फेटाळला; अखेर केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा पोलिसांना शरण आला, काय घडले?
2
IPL कॅप्टन्सीत गिलचा मोठा पराक्रम! ५०० धावांचा पल्ला गाठत विराट-सचिनच्या विक्रमाशी बरोबरी
3
तामिळनाडू सरकारचे खातेवाटप ठरले, मुख्यमंत्री विजयने स्वतःकडे कोणते विभाग ठेवले? पाहा, यादी
4
IPL 2026 : गिलच्या विकेटसह नरेननं फिरवली मॅच! GT चा विजय रथ रोखत KKR नं मारली बाजी
5
“थलपती विजयशी तुलना करू नका”; पवन कल्याण, CM पदावरून साऊथ सुपरस्टारबाबत चाहत्यांमध्ये चर्चा
6
षटकारांची ‘बरसात’! IPL मध्ये अशी कामगिरी करणारा फिन ॲलन क्रिकेट विश्वातील पहिलाच फलंदाज
7
लहानग्या विराटला गंभीर आजार, DCM शिंदे मदतीला धावले; विनामूल्य शस्त्रक्रिया करून दिला दिलासा
8
KKR vs GT: मुंबईकर रघुवंशीचा ईडन गार्डन्सवर धमाका! गंभीर-उथप्पा यांच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
सुट्टीच्या आदल्या रात्री झोप का लागत नाही? काय आहे त्यामागचं लॉजिक? समजून घ्या!
10
“परिस्थिती बदलली नाही, तर दशकांच्या यश अन् मेहनतीवर पाणी फिरेल”; PM मोदींचे सूचक विधान
11
“धर्मेंद्र प्रधानांना बडतर्फ करा”; राहुल गांधींची मागणी, नीट पेपर लीक प्रकरण RSS-BJPशी जोडले
12
‘वॉरंट’ काढलं, पण DSP सिराजला 'अरेस्ट' करायला नाही जमलं; फिन ॲलनचा धुमाकूळ, शतक थोडक्यात हुकलं!
13
मातृत्वाला सलाम! स्वतः होरपळली, पण काळजाच्या तुकड्यांना वाचवलं; मन हेलावून टाकणारी घटना
14
ब्लूटूथ इयरबड्समुळे ब्रेन कॅन्सर होतो? तज्ज्ञांचा मोठा खुलासा, वापरताना 'अशी' घ्या काळजी
15
'माझ्याविषयी गैरसमज पसरवले...'; मराठा भवनासाठी जागा दिल्यानंतर मुंडेंचे विरोधकांना उत्तर
16
नोटांचे बंडल, दागिने, आलिशान फ्लॅट; इंजिनिअरकडे सापडलं कोट्यवधीचं घबाड, ४ ठिकाणी धाड
17
Monsoon in Andaman : आनंदवार्ता! अंदमान-निकोबारमध्ये मान्सून दाखल; 'या' दिवशी केरळमध्ये होणार आगमन
18
Adhik Maas 2026: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण; स्वामी सेवेने कालातीत कृपा लाभेल!
19
बँकॉकमध्ये मोठा अपघात! मालगाडीची बसला जोरदार धडक; आगीत ८ जणांचा मृत्यू, २० जखमी
20
Sunil Narine : मिस्ट्री स्पिनरची कमाल! IPL मध्ये 'द्विशतक' साजरे करणारा ठरला पहिला परदेशी खेळाडू
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमगडमध्ये सूर्यफुलाचे वाढते उत्पन्न

By admin | Updated: March 12, 2016 01:52 IST

विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़

तलवाडा: विक्रमगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीची मदार प्रामुख्याने पावसाळी भातशेतीवरच. मात्र गेल्या काही वर्षापासुन दुबार पिक घेण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे़ त्यात प्रामुख्याने पावसाळयात भात तर उन्हाळयांत भाजीपाला लागवड होत आहे. परंतु ग्रामीण भागातील अल्पशती असणारे शेतकरी सुर्य फुल या खाद्यतेलाच्या पिकांची लागवड मोठया प्रमाणात करीत आहेत़ परंतु आता त्यामध्येही बदल होऊन एकमेकांनी केलेले शेतामधील प्रयोग व त्यापासुन मिळणारा नफा पाहाता आता सध्या येथील शेतकरी जागृत होऊ लागले आहे़
येथील शेतकरी प्रामुख्याने पावसाळी भात लागवड तर उन्हाळी कलिंगड, काकडी, भेंडी, चवळी, मिरची, अशा प्रकारची पिके घेतली जातात़ मात्र, गेल्या काही वर्षापासुन तालुक्यात सुर्यफुल या खाद्यतेल देणाऱ्या पिकाची लागवड शेतकरी उन्हांळी हंगामात मोठया प्रमाणात घेऊ लागले आहेत. यावर्षी तालुक्यात उन्हाळी हंगामात ३६० हुन अधिक हेक्टरवर भाजीपाला लागवड करण्यांत आलेली आहे़. तर तालुक्यात यंदा अंदाजे आकडेवारीनुसार ४० ते ५० हेक्टरवर सुर्यफुलाची लागवड शेतकऱ्यांनी केली आहे़ तर गेल्या वर्षीही अंदाजीत ४० हेक्टरवर ही लागवड करण्यात आली होती.
सुर्यफुल हे पिक अल्पशा खर्चात मोठे उत्पन्न देणारे पिक आहे़ या पिकाच्या लागवडीचा खर्च व मजुरांची गरज सुध्दा कमी प्रमाणात लागते़ त्यामुळे या पिकांपाासुन थोडी मेहनत घेतल्यास मोठे उत्पन्न मिळते़ या पाश्वभुमीवर विक्रमगड तालुक्यातील माण व ओंदे गावातील काही शेतकऱ्यांनी आपल्या शेती खाचरांवर आपल्या कुटुंबाच्या मदतीने सुर्यफुलाची लागवड केली आहे.
या लागवडीकरीता बीयाणे, खत, मजुरी, ट्ॅक्टर असा मिळून अल्प खर्च येतो. लागवडीनंतर फक्त ८ दिवसांतुन ऐकदा पाण्याची पाळी दयावी लागते़ तर ऐकदा खत घालावे लागते़ या पिकावर कुठल्याही प्रकारचा रोग येत नसल्याचे शेतकऱ्यांकडुन सांगण्यात येते़ तसेच एक ते दोन मजुर सर्व पिकाची लागवड तसेच देखभाल करु शकतात,त्यामुळे या पिकाला मजुरांचा खर्च व इतर लागणारा खर्च मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचा वाचतो़वर्ष २०१६: यंदाच्या वर्षी माण येथील कृषीमधून पदवीधर झालेले शेतकरी विलास लडकू पाडवी यांनी चार एकरमध्ये सुर्यफुलाची लागवड केली आहे़ तसेच त्याबरोबरच इतर पिके एक एकरमध्ये काकडी, एक एकरमध्ये मोगरा अर्धा एकरमध्ये कांदा अशी लागवड केली आहे़ ४बाजारात सुर्यफलाच्या १५ किलो डब्याचा दर १६०० रुपये तर काकाड १९ किलो, मोगरा १२० किलो याप्रमाणे उत्पादीत मालाला भाव भाग मिळत आहे़
४गत वर्षी ओंदे येथील शेतकरी हेमंत ठाकरे यांनी एक एकरमध्ये सुर्यफुलाची लागवड करुन अल्पखर्चात नऊ डबे खाद्य तेल मिळाले.विक्रमगड तालुक्यातील हवामान हे उष्ण व दमट असुन, जमीन मध्यम ते खोल स्वरुपाची व योग्य पाण्याचा निचरा होणारी आहे़ सुर्यफुल पिकास हवामान व जमीन योग्य असल्याने शेतकऱ्यांना फायदा होवु शकतो़
- विश्वनाथ पाटील, शेतकरी
व कुणबीसेना प्रमुख, विक्रमगड