शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

तटरक्षककडून मच्छिमारांची उपेक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 00:01 IST

दुर्घटनाग्रस्तांना मच्छिमारच वाचवितात; तटरक्षकदलाची कवडीची मदत होत नाही, संदेश व्यर्थ

- हितेन नाईकपालघर : मच्छिमार हे देशाच्या संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे सैनिक असून ते समुद्रातले आमचे डोळे आणि कान असल्याची स्तुती सुमने कोस्टगार्ड, नेव्हीचे अधिकारी नेहमीच व्यासपीठावरून उधळत असले तरी जेंव्हा समुद्रात मच्छिमारावर संकटे येतात तेव्हा ते कधीही वेळेवर धाव घेत नाहीत. बचावकार्य करीत नाहीत. ही अशी उदासिनता का? असा खडा सवाल तरुण मच्छिमार आता विचारू लागले आहेत.खोल समुद्रातील संशयास्पद हालचाली संदर्भात आजही किनारपट्टीवरील प्रत्येक मच्छिमार बांधव जागरुकतेने आवश्यक ती माहिती स्थानिक पोलीस, कोस्ट गार्ड यांना तत्परतेने कळवित असतात. जिल्ह्यातील प्रत्येक सागरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील तटरक्षक दल व पोलीसांचा मित्र म्हणून मच्छिमार तरुण आपली भूमिका चोखपणे बजावीत असतात. एखादे संशयास्पद जहाज समुद्रात दिसल्याची माहिती पोलिसांना कळविल्या नंतर मच्छिमार आपली स्वत:ची बोट पोलिसांना धाव घेण्यासाठी उपलब्ध करून देऊन तसेच स्वत:ही पोलिसांसोबत जाऊन धोका पत्करत असतो. अशावेळी सुरक्षा यंत्रणेच्या स्पीड बोटी मात्र किनाऱ्यावर बंद पडलेल्या अवस्थेत पडून असतात. संकटात सापडलेल्या आपल्या बांधवांना व सुरक्षायंत्रणांना मच्छिमार नेहमीच मदत करीत असतात.२६/११ चा समुद्रीमार्गाने झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर समुद्रातील संरक्षण यंत्रणा मजबूत करण्याच्या नावाखाली मच्छीमारांकडील कागदपत्रे तपासली जातात. त्यात एखाद्याचे एखादे कागदपत्र कमी असल्यास बोट मालकासह अन्य लोकांचा अनन्वित छळ केला जात होता. अशा अमानवी कृत्याच्या विरोधात मच्छिमार संघटनांनी संरक्षण विभागाच्या वरिष्ठ पातळीवर तक्र ारी केल्यानंतर आता या छळात काहीशी घट झाली आहे.सातपाटीमधील ‘शिवनेरी नौका’ ८ मे रोजी समुद्रात मासेमारी करीत असताना महाकाय लाटांच्या तडाख्यात सापडून बुडाली होती. या घटनेची माहिती वायरलेस सेट वरून कळाल्यानंतर तात्काळ मदत उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकाºयांना आणि कोस्टगार्डला कळविण्यात आले. ११ मच्छीमारांच्या जीविताला धोका उत्पन्न झालेला असतांना कोस्ट गार्ड ने आपल्या स्पीडबोटी आणि हेलीकॉप्टरच्या मदतीने घटनास्थळी पोहचणे अत्यावश्यक असताना घटना घडून अनेक तासानंतर त्यांच्या घिरट्या दिसून आल्या होत्या. समुद्रातील जीपीएस नंबर वरून समुद्रात बोट कुठे आहे. याचे लोकेशन तात्काळ मिळत असतांना तसेच जवळपासच्या प्रत्येक बोटीतील वायरलेस सेटवरून माहिती मिळत असूनही व आम्ही संकटात असतांना कोस्टगार्ड आमच्या मदतीला वेळीच का धावून येत नाही? हा सवाल प्रत्येक मच्छिमार तरुणांच्या मनात धुमसतो आहे.डहाणूमधील भानुदास तांडेल यांची भाग्यलक्ष्मी बोट ३० नॉटिकल (किनाºयापासून सुमारे ६० किमी)वर बुडाली असतांना त्यांना तात्काळ मदत मिळावी म्हणून डहाणूतील काही मच्छिमार जवळच्याच कोस्ट गार्ड कार्यालयात पोहोचले. समुद्रात संकटात सापडलेल्या ११ मच्छीमारांना तात्काळ मदत करावी अशी विनंती त्यांनी अधिकालºयांना केली होती. मात्र समुद्र खवळलेला असल्याने आम्ही काही मदत करू शकत नाही अशी हतबलता कोस्टगार्ड ने व्यक्त केली होती. मात्र त्याच वादळीवाºयात आणि तुफानी लाटांचा मारा थोपवित डहाणूतील अशोक आंभिरे, भूपेश मरदे, नागेश मरदे, गणेश तांडेल, दाजी तांडेल आदी मच्छीमारांनी आपल्या बोटीद्वारे तात्काळ धावून जात बुडालेली बोट आणि त्यामधील ११ मच्छीमाराना वाचविले. त्यांना मंगळवारी दुपारी ३ वाजता सुखरूप डहाणूच्या किनाºयावर आणण्यात यश मिळविले. या संदर्भात डहाणू कोस्ट गार्डचे कमांडन्ट एम विजयकुमार यांच्याशी संपर्क साधला असता कोस्ट गार्ड नेहमीच मच्छिमारांच्या सोबत आहे. वादळी वातावरण आणि बोटी घटनास्थळा पासून लांब असल्याने तात्काळ मदत पुरवू शकलो नाही, अशी कबुली त्यांनी दिली.अंभीरे व सहकाºयांना पुरस्कार द्याकोस्टगार्डच्यावतीने देण्यात येत असलेला ‘शौर्य पुरस्कार क्रियाशील मच्छिमार अशोक आंभिरे आणि त्यांच्या सहकाºयांना ही देण्यात यावा अशी मागणी ठाणे-पालघर जिल्हा मच्छिमार मध्यवर्ती संघाचे अध्यक्ष जयकुमार भाय यांनी केली आहे. असे घडून आल्यास त्याचा सकारात्मक परिणाम मच्छिमारांवर नक्कीच घडून येईल.समुद्रात अनेक संकटांशी सामना करीत ११ खलाशांचे प्राण वाचविण्यात मुख्य भूमिका बजाविणाºया मच्छीमाराना नॅशनल मेरिटाईम सर्च अ‍ॅण्ड रेस्क्यू अ‍ॅवॉर्डने सन्मानित करा, अशी सूचना मी अधिकाºयांना केली आहे.- नरेंद्र पाटील,अध्यक्ष, एनएफएफ संघटना.

टॅग्स :palgharपालघर