शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

भाजपासोबत युती केल्यास मनसेचे १५ नगरसेवक होतील विजयी?; ठाण्यातील कार्यकर्त्यांच्या भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 4:42 AM

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता ...

ठाणे : येत्या महापालिका निवडणुकांसाठी चारचे पॅनल जाहीर झाल्यास मनसेला '' एकला चलो रे '' धोरणाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसोबत मनसेने युती केल्यास ठाणे शहरातून किमान १५ जागा निवडून येतील, असा विश्वास मनसैनिकांनी व्यक्त केला. २०१७ ची पुनरावृत्ती टाळायची असेल तर मनसेला युती सोयीची ठरेल, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. मनसे-भाजप युतीबाबत मनसैनिकांची मते जाणून घेण्याकरिता मंगळवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात बैठक घेत आहेत.

कोविड काळात आंदोलने, मोर्चे यांच्या माध्यमातून मनसे हा पक्ष सतत चर्चेत राहिला. ठाणे शहरात जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष संदीप पाचंगे तसेच कोपरी पाचपाखाडी विभाग अध्यक्ष महेश कदम तिघांनी कोविड काळात जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडली. काही वेळा प्रशासनाला निर्णय घेण्यास भाग पाडले. अनेकदा समस्या सोडविल्याने कोविडच्या पहिल्या लाटेपासून आतापर्यंत मनसेने प्रशासनावर अंकुश ठेवला. ठाणे शहरात मनसे संघटनात्मकदृष्ट्या सक्षम असून येथे मनसेच्या मराठी भाषिकांच्या हितरक्षणाच्या भूमिकेला मानणारा मोठा मतदार वर्ग आहे.

राज्यात सत्ता असल्याने शिवसेनेला मराठीच्या किंवा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भूमिका घेण्यास मर्यादा आहेत. त्यामुळे याचा लाभ मनसे उठवू शकते. बृहन्मुंबईत भाजपचे आमदार विजयी झालेले असून तेथे भाजपला मानणारा मतदार मोठ्या संख्येने राहतो. त्या तुलनेत ठाण्यात भाजपकडे एकही आश्वासक चेहरा नाही. त्यामुळे मुंबईपेक्षा ठाण्यात भाजपला मनसेच्या संघटनेची व राज ठाकरे यांच्या करिष्म्याची जास्त गरज आहे. त्यामुळे पुढील समीकरणांच्या जुळवाजु‌ळवीकरिता उद्याची राज यांची भेट महत्त्वाची आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत २०१९ साली मनसेला काही पक्षांकडून मिळालेल्या छुप्या तर काही पक्षाच्या उघड पाठिंब्यामुळे ठाणे शहर विधानसभा मतदार संघात मनसेला चांगली मजल मारता आली. परंतु गेल्या काही दिवसात सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सतत केलेल्या आंदोलनामुळे, वैयक्तिक टीकेमुळे भविष्यात पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी आहे. अशावेळी मनसेला प्रामुख्याने ठाणे शहर मतदारसंघात आपले स्थान टिकवायचे असेल तर भाजपशी युतीशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर ही युती झाल्यास २०१७ ची पुनरावृत्ती टळेल आणि किमान १५ जागा मनसेला जिंकणे शक्य होईल.

पक्ष स्थापनेपासून असलेल्या पदाधिकाऱ्यांनी मधल्या काळात नेतृत्वाला कंटाळून पक्षाला राम राम केला. त्यांची नाराजी वेळीच दूर केली असती तर, या जुन्या जाणत्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाला फायदा झाला असता असे मनसैनिकांचे मत आहे.

पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी राज ठाकरे यांनी वैयक्तिक संवाद साधल्यास त्यांना त्यांच्या भावना आणि अडीअडचणी जाणून घेता येईल. तसेच, पुढे काम करण्यास आणखी प्रोत्साहन मिळेल असेही कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेthaneठाणे