शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
3
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
4
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
6
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
7
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
8
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
9
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
10
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
11
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
12
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
13
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस
14
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
15
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
16
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
17
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
18
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
19
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
20
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन

१५ वर्षांपूर्वी काँक्रिट रस्ते केले असते तर ३,५०० कोटी रुपये वाचले असते, एकनाथ शिंदेंचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 10:34 IST

Ekanath Shinde: पुढच्या दोन-तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते व आम्ही ते काम केले.

 ठाणे  - पुढच्या दोन-तीन वर्षांत मुंबई खड्डेमुक्त होईल. ठाणे शहरही खड्डेमुक्त करायचे आहे. खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी धाडस लागते व आम्ही ते काम केले. मुंबई महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी पंधरा वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतला असता, तर पालिकेचे साडेतीन हजार कोटी रुपये वाचून अपघातात बळीही गेले नसते, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. ठाण्यात विविध विकास प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रविवारी झाले. त्यानिमित्त डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. ते म्हणाले की, विविध कामांसाठी मुंबई महापालिकेच्या मुदत ठेवीचे पैसे वापरल्याची ओरड होत आहे. उलट, आमचे सरकार आले, त्यानंतर त्यात ११ हजार कोटींनी वाढ झाली आहे.

पांडुरंगाचे दर्शन बंद राहणार नाहीयंदा पाऊस लांबला तरी तो आपला पूर्ण कोटा भरून काढेल, असा विश्वास व्यक्त करताना शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या भरभराठीसाठी पांडुरंगाकडे साकडे घालणार असल्याचे सांगितले. पंढरीच्या वारीसाठी टोल माफ, तसेच जास्त बसगाड्या सोडण्याबरोबरच १५ लाख वारकऱ्यांचा एक लाखांचा विमा उतरविण्यात आला आहे. यंदा पांडुरंगाच्या पूजेदरम्यान मुखदर्शनही सुरूच राहणार आहे, असेही ते म्हणाले.

...तेव्हा तुम्हीच सत्तेत होता!आता चौकशी होणार म्हणून मोर्चा काढणार आहेत; पण त्यावेळी तुम्हीच सत्तेत होता. त्यामुळे ती कामे तुम्हीच केली आहेत. हे लक्षात घ्या. कोरोना काळात ६०० रुपयांची शवपिशवी सहा हजार रुपयांना कुणी विकली, हे सत्य लोकांपुढे यायला हवे, असा टोलाही त्यांनी ठाकरे यांना लगावला.चांगले काम कराल तर सत्कार, अन्यथा कारवाईज्या शहरांचे रस्ते मोठे, त्या शहरांचा विकास होतो. समृद्धी महामार्ग, घाटकोपर ते घोडबंदर फ्री वे, ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग तसेच इतर प्रकल्प राबविले जात आहेत. जे अधिकारी चांगले काम करतील, त्यांचा सत्कार केला जाईल. जे काम करणार नाहीत, त्याच्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला.

घोडबंदरच्या पाण्याबाबत लवकरच बैठक एमएमआरडीएच्या देहर्जे प्रकल्पातील पाणी पालघरच्या प्रकल्पांसाठी मंजूर केले. घोडबंदर विभागाला २०० दशलक्ष लिटर पाणी मिळावे, अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी केली. तर वाढीव पाण्याबाबत लवकरच बैठक घेऊ, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. अमृत योजनेतून ३२३ कोटी रुपये मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरे