शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
4
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
5
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
6
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
7
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
8
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
9
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
10
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
11
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
12
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
13
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
14
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल
15
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
16
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
17
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
18
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
19
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
20
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 02:35 IST

आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आॅनलाइन अर्जात बदल करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी सेंटरला भेट देऊन आपल्या अर्जातील पहिल्या भागात बदलण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या मुथा महाविद्यालयातील सेंटरमध्ये शनिवारी १०० विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात बदल केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी दिली.सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांची विषयांची संख्या तसेच गुणपद्धती राज्यातील बोर्डापेक्षा वेगळी आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार अकरावीत प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी गुणपत्रिकेवरील सहा विषयांपैकी सरासरीसाठी पाच सर्वोत्तम (बेस्ट फाइव्ह) विषयांचे गुण धरले जात होते. मात्र, याविषयीची माहिती शाळांपर्यंत पोहोचलेली नाही.आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधीच भरले असल्याने त्यांना आता गुणपत्रिकेतील गुण बदलण्यासाठी पुन्हा अर्जाचा पहिला भाग भरावा लागत आहे. त्यामुळे आपोआपच भाग दोनही भरावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी सेंटरकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डोंबिवलीत पूर्वेत के.बी. वीरा शाळा आणि पश्चिमेत साउथ इंडियन हायस्कूलमध्ये तर, कल्याणमध्ये मुथा महाविद्यालयात केंद्र ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्जात बदल करणे सोयीचे जावे, यासाठी रविवारी सकाळी १० ते ३ ही केंद्रे खुली असणार आहेत. २५ जूनला अकरावी प्रवेशाची बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तोपर्यंत ही प्रक्रि या पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी फॉर्ममध्ये बदल केला. तर, सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलैला जाहीर होणार आहे.हा निर्णय चुकीचा!ओमकार इंटरनॅशनल आयसीएसई स्कूलच्या संस्थापिका दर्शना सामंत म्हणाल्या, यंदाच्या वर्षी राज्य मंडळाने अंतर्गत गुण बंद केले आहेत. त्यामुळे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशही सरासरी गुणांच्या आधारे व्हावा, असे बोलत आहे. पण, मुळातच या बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पातळी कठीण असते. त्या तुलनेत राज्यातील बोर्डाची नाही. मग, असे असतानाही आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. यासंदर्भातील लेखी जीआर आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाही. पण, सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रthaneठाणे