शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या
2
'निवडणूक आयोग मला शपथपत्र मागतो; मी संसदेत शपथ घेतलीये', राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
3
जंगलात रील बनवायला गेले अन् तोंड सुडवून आले! चार जण गंभीर; नेमकं काय घडलं?
4
मतचोरीचा आरोप, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह; प्रेझेंटेशनवरून शरद पवारांचा राहुल गांधींना सल्ला
5
तिकडे उद्धव ठाकरे दिल्लीत, इथे नाराज पदाधिकाऱ्यांचे राजीनामे; ठाकरे गटात बाहेरच्यांची लुडबुड?
6
भारताच्या जमिनीवरून 'या' देशाच्या राष्ट्रपतींनी चीनला दिली थेट युद्धाची धमकी, काय घडलं?
7
लय भारी! Instagram युजर्सची धमाल; Repost, Maps, Friends फीचर्सचा मजेदार अनुभव
8
१४% आपटला हा शेअर, मजबूत Q1 निकालानंतरही जोरदार विक्री; यादरम्यान एक्सपर्टनं वाढवलं टार्गेट प्राईज
9
उद्धव ठाकरेंना राहुल गांधींच्या घरी मागे बसवलं? संजय राऊत म्हणाले, "आम्हाला स्क्रीन समोर बसून पाहताना..."
10
'शपथ पत्रावर सही करा नाहीतर देशाची माफी मागा'; निवडणूक आयोगाने राहुल गांधींना दिले दोन पर्याय
11
“उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेल्यापासून राहुल गांधी मातोश्रीवर गेले का?”; भाजपाचा सवाल
12
पीएम मोदी मोठा निर्णय घेणार; अमेरिकेच्या ५० टक्के कर आकारणीबाबत मंत्रिमंडळाची बैठक
13
"मी विधवा झाली", पत्नीच्या डोळ्यासमोर पतीची हत्या; हुमा कुरेशीच्या वहिनीने सांगितलं काय घडलं?
14
Dhadak 2: मराठमोळ्या आदित्य ठाकरेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री; तृप्ती डिमरीसोबत केली स्क्रीन शेअर
15
शरणू हांडेचं अपहरण करणारा 'तो' युवक आणि मास्टरमाईंड कोण?; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक आरोप
16
Kapil Sharma : "जो सलमानसोबत काम करेल तो मरेल", कॅफे गोळीबारानंतर लॉरेन्स गँगची कपिल शर्माला धमकी
17
३ दिवसांत ६०% पेक्षा जास्त तेजी; ८०० रुपयांचा शेअर आता १२९९ पार, तुमच्याकडे आहे का?
18
Duleep Trophy 2025 : ज्युनिअरच्या नेतृत्वाखाली कर्तृत्व दाखवण्यासाठी मैदानात उतरणार हे २ सिनियर्स
19
थरारक! गोपीचंद पडळकर समर्थकाचं फिल्मी स्टाईल अपहरण; पोलिसांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव
20
Video - 'ते' आले अन् धारदार शस्त्रांनी केला हल्ला; हुमा कुरेशीच्या भावाच्या हत्येचे CCTV फुटेज

आयसीएसईच्या विद्यार्थ्यांची अर्जात बदल करण्यासाठी धावपळ, नव्या जीआरमुळे फटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2019 02:35 IST

आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत.

- जान्हवी मोर्येडोंबिवली - आयसीएसई बोर्डातून दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अकरावीसाठी राज्य सरकारच्या बोर्डाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊ इच्छित असल्याने त्यांच्या गुणपत्रिकेवरील पहिल्या पाच विषयांचे सरासरी गुण (फर्स्ट फाइव्ह) ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आॅनलाइन अर्जात बदल करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. विद्यार्थ्यांनी सेंटरला भेट देऊन आपल्या अर्जातील पहिल्या भागात बदलण्यास सुरुवात केली आहे. कल्याणच्या मुथा महाविद्यालयातील सेंटरमध्ये शनिवारी १०० विद्यार्थ्यांनी आपल्या अर्जात बदल केल्याची माहिती महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रुती वाईकर यांनी दिली.सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डांची विषयांची संख्या तसेच गुणपद्धती राज्यातील बोर्डापेक्षा वेगळी आहे. मात्र, राज्य सरकारने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार अकरावीत प्रवेशासाठी आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण ग्राह्य धरताना पहिल्या पाच विषयांचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यापूर्वी गुणपत्रिकेवरील सहा विषयांपैकी सरासरीसाठी पाच सर्वोत्तम (बेस्ट फाइव्ह) विषयांचे गुण धरले जात होते. मात्र, याविषयीची माहिती शाळांपर्यंत पोहोचलेली नाही.आयसीएसईच्या विद्यार्थ्यांनी आपले अर्ज आधीच भरले असल्याने त्यांना आता गुणपत्रिकेतील गुण बदलण्यासाठी पुन्हा अर्जाचा पहिला भाग भरावा लागत आहे. त्यामुळे आपोआपच भाग दोनही भरावा लागत आहे. विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यासाठी सेंटरकडे धाव घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी डोंबिवलीत पूर्वेत के.बी. वीरा शाळा आणि पश्चिमेत साउथ इंडियन हायस्कूलमध्ये तर, कल्याणमध्ये मुथा महाविद्यालयात केंद्र ठेवण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अर्जात बदल करणे सोयीचे जावे, यासाठी रविवारी सकाळी १० ते ३ ही केंद्रे खुली असणार आहेत. २५ जूनला अकरावी प्रवेशाची बायफोकलची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. तोपर्यंत ही प्रक्रि या पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामुळे काही विद्यार्थ्यांनी शुक्रवारी फॉर्ममध्ये बदल केला. तर, सर्वसाधारण गुणवत्ता यादी १ जुलैला जाहीर होणार आहे.हा निर्णय चुकीचा!ओमकार इंटरनॅशनल आयसीएसई स्कूलच्या संस्थापिका दर्शना सामंत म्हणाल्या, यंदाच्या वर्षी राज्य मंडळाने अंतर्गत गुण बंद केले आहेत. त्यामुळे इतर बोर्डांच्या विद्यार्थ्यांचा प्रवेशही सरासरी गुणांच्या आधारे व्हावा, असे बोलत आहे. पण, मुळातच या बोर्डाच्या अभ्यासक्रमाची पातळी कठीण असते. त्या तुलनेत राज्यातील बोर्डाची नाही. मग, असे असतानाही आयसीएसईच्या विद्यार्थ्यांसाठी चुकीचा निर्णय घेतला गेला आहे. यासंदर्भातील लेखी जीआर आमच्यापर्यंत अजून पोहोचला नाही. पण, सरासरी गुणांच्या आधारे प्रवेश होणार असल्याची माहिती मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रthaneठाणे