शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

 दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, आव्हाडांचा नाईकांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2020 19:23 IST

प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही.

ठाणे -  काही महिन्यांवर आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि भाजपा नेते गणेश नाईक यांच्यात वाकयुद्ध रंगले आहे. जितेंद्र आव्हाड यांनी नाईक यांच्यावर टीका केल्यानंतर तेरे बस की बात नही तेरे बापको बोल असे प्रतिआव्हान दिले होते. मात्र आता जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.  दर दहा वर्षांनी बाप बदलण्याची मला सवय नाही, असा टोला त्यांनी गणेश नाईक यांना लगावला आहे.

‘प्रत्येकजण आपापल्या बौद्धिक पातळीनुसार बोलतो. त्यामुळे गणेश नाईक यांनी माझा बाप काढला याचं मला आश्चर्य वाटत नाही. पण याचा अर्थ मी आणखी खालच्या पातळीवर उतरावं असा होत नाही. उलट मला त्यांची दया आली. आमच्या पक्षात असताना ज्या माणसाचा इतका रुबाब होता, त्याच्यावर आता एखादा अट्टल दारूडा चारचौघात जशी शिवीगाळ करतो तशी वेळ त्यांच्यावर का आली, याचा गांभीर्याने विचार करण्याची नवी मुंबईकरांना आवश्यकता आहे,’ असे आव्हाड म्हणाले.

संबंधित बातम्या 

दिल्लीप्रमाणे मुंबईतही दंगल घडावी अशी भाजपची मानसिकता होती : आव्हाड

गणेश नाईकांना पुन्हा डिवचले, जितेंद्र आव्हाडांची बोचरी टीका

'गणेश नाईकांचा छा...छैया बघायला तयार राहा'; जितेंद्र आव्हाडांचा पुन्हा हल्लाबोल     

दरम्यान, ‘नवी मुंबई ही नवी मुंबईच राहिली पाहिजे. ती नाईक मुंबई बनता कामा नये. आज ते थेट विरोधात असल्यामुळे माझ्यावर पक्षशिस्तीचं बंधन नाही, जे इतकी वर्ष होतं. माझ्या एका भाषणामुळे ते गटारी पातळीवर उतरले आणि त्यांनी थैय्या केला. आता मी त्यांना भरतनाट्यम, ट्विस्ट, डिस्को, झुंबा, आदिवासी डान्स, कोळी नृत्य, सालसा, लांबाडा, आणि आयटम नाचसुद्धा करायला लावणार आहे. नाहीतरी या पक्षातून त्या पक्षात नाचायची सवय त्यांना आहेच.मी येतोय गणेश नाईक. सराव सुरु करा. मी तुमचा बाप काढणार नाही. पण बाप दाखव, नाहीतर श्राद्ध घाल म्हणून नक्कीच सांगणार,’असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसGanesh Naikगणेश नाईकBJPभाजपाNavi Mumbaiनवी मुंबई