शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 08:42 IST

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही.

मुंबई/ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र मिळाल्यानंतरही तब्बल दहा दिवस त्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय न घेतल्याने, त्या आधारे वर्धापनदिनी काहीही भाष्य न केल्याने अखेर ते व्हायरल करण्यात आले. केंद्र-राज्याच्या संघर्षात माझा बळी दिला जातोय, असे भाष्य करून त्यावरही पक्षाने भूमिका न घेतल्याने सरनाईक यांच्या पाठीशी किती असंतुष्ट उभे राहणार असा प्रश्न शिवसेनेच्या वर्तुळात चर्चिला जात आहे. आपल्यासोबत आणखी काही जणांची नावे सरनाईक यांनी पत्रात घेतली असली, तरी पत्र व्हायरल झाल्यावर त्यातही एकही त्यावर भाष्य करण्यास पुढे आला नाही.

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही. त्यातही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत, असा मारलेला शेरा मंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या कामाबाबत आक्षेप नोंदविणारा आहे. काही मंत्र्यांनी भाजपशी जुळवून घेतल्याचा रोखही या मंत्र्यांना दुखावणारा आहे. त्यामुळेच या पत्रावर काय प्रतिक्रिया देणार, असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांनी सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या एकही मुद्द्यावर भाष्य केले नाही. फक्त विनाकारण त्रास दिल्याचा भाजप-विरोधाचा मुद्दा तेवढा उचलून धरला.

काँग्रेस- राष्ट्रवादीही लक्ष्य

आपली, आपल्या पक्षाच्या आमदारांची व्यथा मांडताना सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अकारण लक्ष केल्याची भावना शिवसैनिकांत आहे. या दोन्ही पक्षांसोबत महाआघाडी स्थापन केल्यानंतर आणि त्यापूर्वीही शिवसेनेची राजकीय स्पर्धा फक्त भाजपशी असताना या दोन पक्षांना लक्ष्य करून आघाडीत तेढ वाढवण्याची भूमिका नेमकी त्यांची आहे, की त्यामागे कोणी बोलविता धनी आहे याबाबत वेगवेगळे तर्क दिवसभर लढविले जात होते.

पत्र लिहिण्याची वेळ का आली?

सरनाईक कुटुंबाचे आजवरचे ठाण्यातील राजकारण हे तेथील स्थानिक नेत्यांशी जुळवून घेण्यापेक्षा थेट मातोश्रीच्या आशीर्वादाने चालणारे होते. मीरा-भाईंदरच्या राजकारणावर पकड मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचा इन्कार सरनाईक यांनी केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारीही मिळाली. मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि नरेंद्र मेहता यांना धक्का देत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या गीता जैन शिवसेनेत आल्यानंतर सरनाईक यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना वेसण घातली गेली.

मातोश्रीशी त्यांचे घनिष्ट संबंध असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत भाजप नेत्यांनी सरनाईक तेथे लपून बसल्याचा आरोपही केला. सुरूवातीपासून सरनाईक यांच्यामुळे अडचणीत येत गेल्याने मातोश्रीने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखल्याची चर्चा होती. त्यामुळे पक्षनेतृत्वाला पत्र लिहिण्याची आणि नंतर ते व्हायरल करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सांगितले जाते.

भाजपने गळ टाकल्याची चर्चा

शिवसेनेची संस्कृती ठावूक असूनही सरनाईक यांनी पत्र लिहिणे, ते व्हायरल करणे, नंतर त्यातील भूमिकेचे लगोलग स्वागत करणे यामुळे यामागे भाजपचे नेते असल्याची चर्चाही सुरू होती. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्याबाबतची पत्रातील भावनाही पुरेशी बोलकी असल्याकडे त्यामुळेच लक्ष वेधले जात होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र ठाण्यात पुरेसे नेते असल्याने आणखी एका नेत्याचा विचार सध्या सुरू नसल्याची तिरकस प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार