शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

प्रताप सरनाईकांच्या पाठीशी किती आमदार उभे राहणार?; भाजपाने गळ टाकल्याचीही चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2021 08:42 IST

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही.

मुंबई/ठाणे : आमदार प्रताप सरनाईक यांचे पत्र मिळाल्यानंतरही तब्बल दहा दिवस त्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय न घेतल्याने, त्या आधारे वर्धापनदिनी काहीही भाष्य न केल्याने अखेर ते व्हायरल करण्यात आले. केंद्र-राज्याच्या संघर्षात माझा बळी दिला जातोय, असे भाष्य करून त्यावरही पक्षाने भूमिका न घेतल्याने सरनाईक यांच्या पाठीशी किती असंतुष्ट उभे राहणार असा प्रश्न शिवसेनेच्या वर्तुळात चर्चिला जात आहे. आपल्यासोबत आणखी काही जणांची नावे सरनाईक यांनी पत्रात घेतली असली, तरी पत्र व्हायरल झाल्यावर त्यातही एकही त्यावर भाष्य करण्यास पुढे आला नाही.

पक्षप्रमुखांना पत्र पाठवून नंतर ते व्हायरल करून त्यावर चर्चा घडवणे ही शिवसेनेची राजकीय संस्कृती नाही. त्यातही शिवसेनेच्या आमदारांची कामे होत नाहीत, असा मारलेला शेरा मंत्रिपद भूषविणाऱ्यांच्या कामाबाबत आक्षेप नोंदविणारा आहे. काही मंत्र्यांनी भाजपशी जुळवून घेतल्याचा रोखही या मंत्र्यांना दुखावणारा आहे. त्यामुळेच या पत्रावर काय प्रतिक्रिया देणार, असा प्रतिप्रश्न करत संजय राऊत यांनी सरनाईक यांनी उपस्थित केलेल्या एकही मुद्द्यावर भाष्य केले नाही. फक्त विनाकारण त्रास दिल्याचा भाजप-विरोधाचा मुद्दा तेवढा उचलून धरला.

काँग्रेस- राष्ट्रवादीही लक्ष्य

आपली, आपल्या पक्षाच्या आमदारांची व्यथा मांडताना सरनाईक यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला अकारण लक्ष केल्याची भावना शिवसैनिकांत आहे. या दोन्ही पक्षांसोबत महाआघाडी स्थापन केल्यानंतर आणि त्यापूर्वीही शिवसेनेची राजकीय स्पर्धा फक्त भाजपशी असताना या दोन पक्षांना लक्ष्य करून आघाडीत तेढ वाढवण्याची भूमिका नेमकी त्यांची आहे, की त्यामागे कोणी बोलविता धनी आहे याबाबत वेगवेगळे तर्क दिवसभर लढविले जात होते.

पत्र लिहिण्याची वेळ का आली?

सरनाईक कुटुंबाचे आजवरचे ठाण्यातील राजकारण हे तेथील स्थानिक नेत्यांशी जुळवून घेण्यापेक्षा थेट मातोश्रीच्या आशीर्वादाने चालणारे होते. मीरा-भाईंदरच्या राजकारणावर पकड मिळवण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. त्याचा इन्कार सरनाईक यांनी केला. त्यानंतर त्यांना शिवसेनेतर्फे उमेदवारीही मिळाली. मीरा-भाईंदरमध्ये भाजप आणि नरेंद्र मेहता यांना धक्का देत अपक्ष म्हणून विजयी झालेल्या गीता जैन शिवसेनेत आल्यानंतर सरनाईक यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षांना वेसण घातली गेली.

मातोश्रीशी त्यांचे घनिष्ट संबंध असल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करत भाजप नेत्यांनी सरनाईक तेथे लपून बसल्याचा आरोपही केला. सुरूवातीपासून सरनाईक यांच्यामुळे अडचणीत येत गेल्याने मातोश्रीने त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखल्याची चर्चा होती. त्यामुळे पक्षनेतृत्वाला पत्र लिहिण्याची आणि नंतर ते व्हायरल करण्याची वेळ त्यांच्यावर आल्याचे सांगितले जाते.

भाजपने गळ टाकल्याची चर्चा

शिवसेनेची संस्कृती ठावूक असूनही सरनाईक यांनी पत्र लिहिणे, ते व्हायरल करणे, नंतर त्यातील भूमिकेचे लगोलग स्वागत करणे यामुळे यामागे भाजपचे नेते असल्याची चर्चाही सुरू होती. चौकशीचा ससेमिरा टाळण्यासाठी हे पाऊल उचलण्याबाबतची पत्रातील भावनाही पुरेशी बोलकी असल्याकडे त्यामुळेच लक्ष वेधले जात होते. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी मात्र ठाण्यात पुरेसे नेते असल्याने आणखी एका नेत्याचा विचार सध्या सुरू नसल्याची तिरकस प्रतिक्रिया दिली. 

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार