शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत काँग्रेसला चौथा धक्का बसणार?; वर्षा गायकवाडांना उमेदवारी दिल्याने बडा नेता नाराज
2
शाहू महाराज एका पक्षाच्या दावणीला बांधले गेले; मोदींच्या सभेपूर्वी राजेश क्षीरसागरांचा हल्लाबोल
3
Virat Kohli ने ३ नंबर 'या' फलंदाजासाठी सोडावा, स्वत: चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला यावं, Harbhajan Singh चा सल्ला
4
इथे २८७ धावाही Safe नाहीत! गोलंदाजांची केविलवाणी अवस्था, भारताला कसा सापडणार 'बॉलिंग'स्टार?
5
राहुल गांधींच्या DNA वर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आक्षेपार्ह टीका करणाऱ्या LDF च्या आमदारावर गुन्हा दाखल
6
'महाराष्ट्रातला शेतकरी मेला पाहिजे, पण गुजरातचा...'; कांदा निर्यातीवरुन राऊतांची पंतप्रधानांवर टीका
7
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
8
TMKOC Sodhi Missing: तारक मेहता फेम 'सोढी' किडनॅप? पोलिसांनी दाखल केली केस; CCTV समोर
9
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
10
Motilal Oswal Financial Share Price : १ वर ३ बोनस शेअर्स देण्याची घोषणा, ३३४% वाढला कंपनीचा नफा; वर्षभरात स्टॉक ३१५% वाढला
11
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
12
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
13
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
14
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
15
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
16
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
17
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
18
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
19
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद

डोंबिवलीतील फेरीवाले बॅकफूटवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2018 5:13 AM

नागरिकांना दिलासा : रेल्वेस्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास

डोंबिवली : पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटरच्या हद्दीत व्यावसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण बुधवारी रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर २० फेरीवाल्यांना रामनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर शहरातील फेरीवाले बॅकफूटवर गेले आहेत. रेल्वेस्थानक परिसरात व्यावसाय न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यानुसार गुरुवारी डॉ. राथ रोड, उर्सेकर वाडी, पाटकर रोडवरील पदपथावर एकही फेरीवाला रस्त्यावर नव्हता. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.

पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे आता फेरीवाले स्थानक परिसरात १५० मीटर परिसरात अजिबात बसणार नाहीत, असा सामंजस्याचा पवित्रा कष्टकरी फेरीवाला संघटनेचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी घेतला आहे. उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसारच आम्ही नियमांचे पालन करू असेही त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. ते पुढे म्हणाले की, बुधवारी आमचे नियोजन सपशेल फेल ठरले. फेरीवाल्यांना आम्ही आधी शिवमंदिर रोडवर बसावे, असा सल्ला दिला होता. पी१, पी२ च्या माध्यमातून रोज जागा घ्यायची, असेही ठरवले होते. पण घडले काही वेगळेच. आम्ही स्थानक परिसर मोकळा करण्यासाठी तयार असलो तरी यापुढे त्या ठिकाणी कोणीही नवा फेरीवाला बसणार नाही, यावर आमचे लक्ष असेल. तसे झाल्यास पोलीस यंत्रणा, लोकप्रतिनिधी, महापालिकेचे अधिकारी यांच्यावर न्यायालयाच्या अवमानप्रकरणी केसेस दाखल करणार आहोत.

महापौर विनीता राणे म्हणाल्या, दीड महिन्यापासून पूर्वेकडील फेरीवाला हटवावा यासाठी आम्ही प्रयत्न सुरू केले. त्यात अनेक अडथळे आले होते, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीही स्थानक परिसर मोकळा ठेवण्याचे आदेशीत केले होते. त्यानुसार आम्ही सातत्याने या सर्व फेरीवाला कारवाईचा अंदाज घेत होतो. फेरीवाला हटाव पथकाला काही अडचणी आल्या. त्या सोडवण्यासाठी तातडीने प्रभागक्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याशी चर्चा करत आहोत. त्याला चांगले यश आले आहे. रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्यासाठी मला नगरसेवक विश्वनाथ राणे, दीपेश म्हात्रे, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे आणि रामनगर पोलीस ठाण्याचेही सहकार्य मिळाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.आता आमचे ध्येय्य कल्याण स्थानक परिसर फेरीवालामुक्त करण्याचे आहे. स्काय वॉक, शिवाजी चौकातील काही भाग फेरीवालामुक्त करणारच असेही त्या म्हणाल्या.२० जणांना पोलीस कोठडीच्रामनगर पोलीसांनी बुधवारी १८ फेरीवाल्यांना तर गुरुवारी दोघांना अटक केली होती. त्यात बबन कांबळे, भालचंद्र पाटील, रेश्मा कुरेशी, लक्ष्मी थेटे, आस्मा ठक्कर, नूतन रणदिवे, आशा मगरे, बाबू नायडू, सदरुद्धीन शेख, शीतला प्रसाद यादव, दीपक भालेराव, अष्टपाल कांबळे, अनंता पाटील, सिकंदर खान, जितू मल्लाहा, संदीप जयस्वाल, कांचन सिंग, हबीब शेख, संजय सिंग यांचा समावेश आहे.च्कल्याण येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने त्यांना १ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंग पवार यांनी दिली. या गुन्ह्याचा तपास सहपोलीस निरीक्षक शरद शेळके करत आहेत. 

टॅग्स :hawkersफेरीवालेthaneठाणे