शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

पत्रीपुलाचे गर्डर मार्चअखेर बसवणार, एप्रिलमध्ये कल्याण डोंबिवलीकरांची कोंडीतून मुक्ती होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2020 8:40 PM

मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे.

डोंबिवली - पत्रीपुलाच्या गर्डरचे भाग येण्यास सोमवारपासून सुरुवात झाली असून, 7 टप्प्यांमध्ये हैदराबाद येथून कल्याणला टेलर कंटेनरमधून ते भाग येणार आहेत. सुमारे 8० मेट्रिक टन वजनांचे लोखंडी गर्डरचे भाग शहरात येत असल्याने त्याची सर्वत्र चर्चा सुरु होती. पहिला भाग आल्यावर सोशल मीडियावर नागरिकांनी गर्डर आले पण ते वेळेत जोडा आणि दिलासा द्या, अशी मागणी केली. सगळे भाग आल्यावर मार्च अखेरीस ते लावण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती एमएसएआरडीसीच्या अधिका-यांनी ‘लोकमत’ला दिली.मध्य रेल्वेने नियोजनानुसार दोन ब्लॉक दिल्यानंतर गर्डर प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागी ठेवणे सोपे जाणार आहे. त्यामुळे आता एकीकडे गर्डर येत असतांनाच दुसरीकडे रेल्वे ब्लॉक कधी, किती तासांचे देते यासंदर्भातही एमएसआरडीसीच्या यंत्रणोला पाठपुरावा करावा लागणार आहे. टेलरमधून गर्डरचे भाग आल्यानंतर ते कल्याणमध्ये प्रकल्पाच्या मोकळया जागेत ठेवण्यात येणार असल्याचे अधिका-यांनी सांगितले. सगळे भाग आल्यानंतर त्यांचे एकत्रिकरण करून 75 आणि 35 अशा दोन टप्प्यात तांत्रिक काम करून ते जोडण्यात येतील. त्यानंतर आधी त्याची चाचणी होईल, आणि नंतरच प्रत्यक्ष पत्रीपूलाच्या नियोजित जागेत ते ठेवण्यात येतील, असे सांगण्यात आले आहे.सगळे भाग यायला सुमारे आठ ते दहा दिवस त्यानंतर पुढील तीन आठवडे जोडणीसाठी आणि त्यानंतर मार्च अखेरीस प्रत्यक्ष कामाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्याच्या एमएसआरडीसी, रेल्वे प्रशासन यांच्या नियोजनानुसार कोणताही अडथळा न येता काम झाल्यास पत्रिपुलाचे लोकार्पण ठरल्याप्रमाणे एप्रिलमध्ये होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. नियोजनानुसार प्रकल्प बांधून लोकार्पण झाल्यास गेले दीड वर्ष पत्रीपुलावर तासन्तास वाहतूक कोंडीत अडकणा-या कल्याण डोंबिवलीच्या वाहनचालकांची सुटका होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :central railwayमध्य रेल्वेkalyanकल्याणdombivaliडोंबिवली