शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

...तर १० दिवसांनंतर टोल बंद करू; एकनाथ शिंदेंचा अधिकाऱ्यांना इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 4:32 PM

निधी आणून दिलाय, आता कामं करा; मंत्री संतापले

ठाणे : येत्या १० दिवसात ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे भरले गेले नाहीत, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल आणि रस्त्यावरील टोल बंद केले जातील, अशा शब्दांमध्ये ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. ठाणे आणि रायगडमध्ये जिल्ह्यांमधील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांनाच नव्हे, तर राजकीय नेत्यांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. खड्ड्यांमुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची गोची झाली आहे. सोशल मीडियावर याचे पडसाददेखील उमटू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, रायगड आणि पालघरचे पालक मंत्री रविंद्र चव्हाण यांनी ठाणे जिल्हाधिकारी नियोजन भवनात तिन्ही जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमआरडीए, एमएसआरडीसी, वाहतूक पोलीस विभाग, परिवहन विभाग, सिडकोच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली. पुढील १० दिवसात रस्त्यांवरील खड्डे भरा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा दोन्ही पालकमंत्र्यांनी यावेळी उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिला. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक शिव्या घालत आहेत. विरोधक आमच्या फोटोचे बॅनर लावत आहेत. आता हे सहन केलं जाणार नाही. आम्ही निधी आणून द्यायचं काम केलं आहे. त्यानंतर पुढील कामं तुम्ही करायला हवी होती. मात्र तुम्ही ती केली नाहीत. आता पुढील १० दिवसात रस्यांवरील खड्डे बुजवा. अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशारा शिंदे आणि चव्हाण यांनी दिला. २८ फेब्रुवारी २०२० या दिवशी कल्याण पत्री पुलाचं काम पूर्ण होणार असून याच दिवशी पत्री पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार असल्याची माहितीदेखील संबंधीत अधिकाऱ्यांनीनी बैठकीत दिली. डोंबिवली पूर्व-पश्चिमेला जोडणारा १२ मीटरचा उड्डाण पूल गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. हा पूल आता २५ मीटरचा करण्यात येणार असून यासाठी ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन घेतल्याची माहिती डोंबिवलीचे आमदार आणि रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिली. लवकरच कोपर पुलाच्या कामालादेखील सुरुवात होईल, असंदेखील त्यांनी सांगितलं.  

टॅग्स :tollplazaटोलनाकाEknath Shindeएकनाथ शिंदेPotholeखड्डे