शहरं
Join us  
Trending Stories
1
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
2
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
3
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
4
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
5
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
6
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
7
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
8
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
9
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
10
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
11
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
12
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
13
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
14
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
15
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
16
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
17
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
18
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
19
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
20
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी

आधी धरण, मग नदीचे रुंदीकरण

By admin | Updated: March 29, 2017 05:27 IST

मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याच नदीवर पेंढरी येथे ११ कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या धरणाच्या जमीनमोजणीचे काम पूर्ण झाले असून, यासाठी लाखो रुपये खर्चसुद्धा झाले आहेत. परंतु, धरणाच्या बांधावर टोपलेभर मातीदेखील पडली नसताना या नदीचे रुंदीकरण करून ठराविक अंतरावर सिमेंट काँक्रिटचे बंधारे बांधण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला पेंढरी धरण संघर्ष समितीने प्रखर विरोध केला असून, प्रथम कमी खर्चात होणारे धरण बांधा, नंतर कनकवीरा नदीचे खोलीकरण आणि सिमेंट काँक्रि टचे बंधारे बांधा, असा निर्णय घेतला आहे. तसे पत्र परिसरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीने शिवसेना नेते सुभाष घरत व पी.एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. तसेच आमदार किसन कथोरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदने देण्यात आली आहेत.कनकवीरा नदीवर पेंढरी येथे धरणाचे बांधकाम करावे, असा प्रस्ताव माजी मंत्री कै. शांतारामभाऊ घोलप यांनी १९७७ मध्ये मांडला होता. मात्र २०११ मध्ये याला प्रथम प्रशासकीय मान्यता मिळून २०१३ मध्ये या धरणाचे ११०० कोटींचे टेंडर मंजूर करण्यात आले. हे काम मे. तुळजा गजानन कन्ट्रक्शन नाशिक या एजन्सीला देण्यात आले आहे. धरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या असून जमिनीची मोजणी झालेली आहे. यासाठी ठेकेदाराने लाखो रुपये खर्च केले आहेत. हा शासनाचा खर्च असूनही ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नद्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील कनकवीरा नदीची निवड करून यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील ११ गावांची सिंचन क्षमता वाढून ५०० हेक्टरपेक्षा जास्त वाढणार आहे. या योजनेस परिसरातील शेतकरी व पेंढरी धरण संघर्ष समितीचा विरोध नाही. ही योजना जिल्हाधिकाऱ्यांनी जरूर राबवावी. परंतु, ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पेंढरी धरणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. (वार्ताहर)