शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आधी धरण, मग नदीचे रुंदीकरण

By admin | Updated: March 29, 2017 05:27 IST

मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला

मुरबाड : मुरबाड तालुक्यातील दाऱ्याघाट परिसरातून वाहणाऱ्या कनकवीरा नदीच्या रुंदीकरणाचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. मात्र, याच नदीवर पेंढरी येथे ११ कोटी खर्च करून बांधण्यात येणाऱ्या धरणाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. या धरणाच्या जमीनमोजणीचे काम पूर्ण झाले असून, यासाठी लाखो रुपये खर्चसुद्धा झाले आहेत. परंतु, धरणाच्या बांधावर टोपलेभर मातीदेखील पडली नसताना या नदीचे रुंदीकरण करून ठराविक अंतरावर सिमेंट काँक्रिटचे बंधारे बांधण्याचा निर्णय ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. मात्र, या निर्णयाला पेंढरी धरण संघर्ष समितीने प्रखर विरोध केला असून, प्रथम कमी खर्चात होणारे धरण बांधा, नंतर कनकवीरा नदीचे खोलीकरण आणि सिमेंट काँक्रि टचे बंधारे बांधा, असा निर्णय घेतला आहे. तसे पत्र परिसरातील शेतकरी आणि सर्वपक्षीय संघर्ष समितीने शिवसेना नेते सुभाष घरत व पी.एस. पवार यांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारेमंत्री गिरीश महाजन यांना दिले आहे. तसेच आमदार किसन कथोरे व पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांनादेखील निवेदने देण्यात आली आहेत.कनकवीरा नदीवर पेंढरी येथे धरणाचे बांधकाम करावे, असा प्रस्ताव माजी मंत्री कै. शांतारामभाऊ घोलप यांनी १९७७ मध्ये मांडला होता. मात्र २०११ मध्ये याला प्रथम प्रशासकीय मान्यता मिळून २०१३ मध्ये या धरणाचे ११०० कोटींचे टेंडर मंजूर करण्यात आले. हे काम मे. तुळजा गजानन कन्ट्रक्शन नाशिक या एजन्सीला देण्यात आले आहे. धरणासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या असून जमिनीची मोजणी झालेली आहे. यासाठी ठेकेदाराने लाखो रुपये खर्च केले आहेत. हा शासनाचा खर्च असूनही ठाणे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी नद्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील कनकवीरा नदीची निवड करून यासाठी ३० कोटी खर्च करण्यात येणार आहे. यामुळे परिसरातील ११ गावांची सिंचन क्षमता वाढून ५०० हेक्टरपेक्षा जास्त वाढणार आहे. या योजनेस परिसरातील शेतकरी व पेंढरी धरण संघर्ष समितीचा विरोध नाही. ही योजना जिल्हाधिकाऱ्यांनी जरूर राबवावी. परंतु, ४० वर्षांपासून प्रलंबित असलेला पेंढरी धरणाचा प्रश्न प्रथम मार्गी लावावा. (वार्ताहर)