शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

मीरा भाईंदरमधून पहिली 1200 लोकं रेल्वेने राजस्थानला रवाना; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तिकिटाचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:19 IST

रेल्वे जाणार कळताच मुंबईपासून लोकं आली धावून

मीरारोड: मीरा भाईंदरमधील सुमारे 1200 जणांना आज रेल्वेने राजस्थानला पाठवण्यात आले. पहिल्यांदाच ट्रेनने रवाना केले गेले. भाईंदरमधून 40 बसने वसई रेल्वे स्थानकात सर्वाना नेण्यात आले. या सर्व प्रवाश्यांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून केला गेला आहे . राजस्थानला रेल्वे जाणार असल्याचे संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होताच अगदी मुंबईतूनसुद्धा लोकं आली होती.  

मीरा भाईंदरमधून राजस्थानला जाऊ इच्छिणाऱ्या मजूर व अन्य कामगार आदी लोकांना आता पर्यंत बस ने पाठवले जात होते. परंतु बसमध्ये खूपच कमी संख्येने प्रवासी जात असल्याने राजस्थानसाठी ट्रेन सोडण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी केली होती. राजस्थानला जाणाऱ्या लोकांची यादी देखील तयार केली गेली होती. राजस्थान सरकारकडून रेल्वेने मीरा भाईंदरमधून लोकांना नेण्याची परवानगी मिळावी त्यासाठी गीता जैन यांनी पाठपुरावा चालवला होता .  

आज मंगळवारी रेल्वेने जाणाऱ्या लोकांना भाईंदरच्या जेसलपार्क खाडी किनारी मैदानात बोलावण्यात आले होते. प्रत्येकाची तपासणी करून पालिकेच्या 40 बस मधून वसई रेल्वे स्थानकात नेण्यात आले. प्रवाश्यांमध्ये महिला, मुलांची संख्या पण बरीच होती. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, आमदार गीता जैन,अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदी उपस्थित होते . महसूल विभाग मार्फत लोकांना जेवणाची पाकिटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. महसूल विभागाने रेल्वेच्या या सर्व प्रवाश्यांचे भाडे भरून तिकीट काढले.  

यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपअधीक्षक शशिकांत भोसले, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार, निरीक्षक संपत पाटील आदी उपस्थित होते. जेसलपार्क येथून लोकांना ट्रेनने राजस्थान साठी नेणार असल्याचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर पसरवण्यात आल्याने मीरा भाईंदरच नव्हे तर अगदी मुंबई उपनगरातून लोकं गोळा झाली होती. परंतु यादीतील नावा नुसारच लोकांना घेण्यात आले. बाकीच्यांना परत पाठवण्यात आले.  

भाईंदर वरून ट्रेन सोडण्यास रेल्वेचा नकार  

मीरा भाईंदरमधून मोठ्या संख्येने परराज्यात जाणारे मजूर, कामगार व लोकं असून भाईंदर रेल्वे स्थानकातून ट्रेन सोडण्याची मागणी केली जात होती  परंतु भाईंदर स्थानकातील फलाट लांबीला कमी असल्याने रेल्वेने नकार दिला. त्यामुळे लोकांना बसमधून वसईला नेऊन सोडावे लागत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार