शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

मीरा भाईंदरमधून पहिली 1200 लोकं रेल्वेने राजस्थानला रवाना; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तिकिटाचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:19 IST

रेल्वे जाणार कळताच मुंबईपासून लोकं आली धावून

मीरारोड: मीरा भाईंदरमधील सुमारे 1200 जणांना आज रेल्वेने राजस्थानला पाठवण्यात आले. पहिल्यांदाच ट्रेनने रवाना केले गेले. भाईंदरमधून 40 बसने वसई रेल्वे स्थानकात सर्वाना नेण्यात आले. या सर्व प्रवाश्यांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून केला गेला आहे . राजस्थानला रेल्वे जाणार असल्याचे संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होताच अगदी मुंबईतूनसुद्धा लोकं आली होती.  

मीरा भाईंदरमधून राजस्थानला जाऊ इच्छिणाऱ्या मजूर व अन्य कामगार आदी लोकांना आता पर्यंत बस ने पाठवले जात होते. परंतु बसमध्ये खूपच कमी संख्येने प्रवासी जात असल्याने राजस्थानसाठी ट्रेन सोडण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी केली होती. राजस्थानला जाणाऱ्या लोकांची यादी देखील तयार केली गेली होती. राजस्थान सरकारकडून रेल्वेने मीरा भाईंदरमधून लोकांना नेण्याची परवानगी मिळावी त्यासाठी गीता जैन यांनी पाठपुरावा चालवला होता .  

आज मंगळवारी रेल्वेने जाणाऱ्या लोकांना भाईंदरच्या जेसलपार्क खाडी किनारी मैदानात बोलावण्यात आले होते. प्रत्येकाची तपासणी करून पालिकेच्या 40 बस मधून वसई रेल्वे स्थानकात नेण्यात आले. प्रवाश्यांमध्ये महिला, मुलांची संख्या पण बरीच होती. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, आमदार गीता जैन,अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदी उपस्थित होते . महसूल विभाग मार्फत लोकांना जेवणाची पाकिटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. महसूल विभागाने रेल्वेच्या या सर्व प्रवाश्यांचे भाडे भरून तिकीट काढले.  

यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपअधीक्षक शशिकांत भोसले, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार, निरीक्षक संपत पाटील आदी उपस्थित होते. जेसलपार्क येथून लोकांना ट्रेनने राजस्थान साठी नेणार असल्याचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर पसरवण्यात आल्याने मीरा भाईंदरच नव्हे तर अगदी मुंबई उपनगरातून लोकं गोळा झाली होती. परंतु यादीतील नावा नुसारच लोकांना घेण्यात आले. बाकीच्यांना परत पाठवण्यात आले.  

भाईंदर वरून ट्रेन सोडण्यास रेल्वेचा नकार  

मीरा भाईंदरमधून मोठ्या संख्येने परराज्यात जाणारे मजूर, कामगार व लोकं असून भाईंदर रेल्वे स्थानकातून ट्रेन सोडण्याची मागणी केली जात होती  परंतु भाईंदर स्थानकातील फलाट लांबीला कमी असल्याने रेल्वेने नकार दिला. त्यामुळे लोकांना बसमधून वसईला नेऊन सोडावे लागत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार