शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

मीरा भाईंदरमधून पहिली 1200 लोकं रेल्वेने राजस्थानला रवाना; मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून तिकिटाचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 18:19 IST

रेल्वे जाणार कळताच मुंबईपासून लोकं आली धावून

मीरारोड: मीरा भाईंदरमधील सुमारे 1200 जणांना आज रेल्वेने राजस्थानला पाठवण्यात आले. पहिल्यांदाच ट्रेनने रवाना केले गेले. भाईंदरमधून 40 बसने वसई रेल्वे स्थानकात सर्वाना नेण्यात आले. या सर्व प्रवाश्यांचा खर्च मुख्यमंत्री सहाय्य्यता निधीतून केला गेला आहे . राजस्थानला रेल्वे जाणार असल्याचे संदेश व्हॉट्सअॅपवर व्हायरल होताच अगदी मुंबईतूनसुद्धा लोकं आली होती.  

मीरा भाईंदरमधून राजस्थानला जाऊ इच्छिणाऱ्या मजूर व अन्य कामगार आदी लोकांना आता पर्यंत बस ने पाठवले जात होते. परंतु बसमध्ये खूपच कमी संख्येने प्रवासी जात असल्याने राजस्थानसाठी ट्रेन सोडण्याची मागणी आमदार गीता जैन यांनी केली होती. राजस्थानला जाणाऱ्या लोकांची यादी देखील तयार केली गेली होती. राजस्थान सरकारकडून रेल्वेने मीरा भाईंदरमधून लोकांना नेण्याची परवानगी मिळावी त्यासाठी गीता जैन यांनी पाठपुरावा चालवला होता .  

आज मंगळवारी रेल्वेने जाणाऱ्या लोकांना भाईंदरच्या जेसलपार्क खाडी किनारी मैदानात बोलावण्यात आले होते. प्रत्येकाची तपासणी करून पालिकेच्या 40 बस मधून वसई रेल्वे स्थानकात नेण्यात आले. प्रवाश्यांमध्ये महिला, मुलांची संख्या पण बरीच होती. उपविभागीय अधिकारी अविनाश शिंदे, पालिका आयुक्त चंद्रकांत डांगे, आमदार गीता जैन,अपर तहसीलदार नंदकुमार देशमुख, मंडळ अधिकारी दीपक अनारे आदी उपस्थित होते . महसूल विभाग मार्फत लोकांना जेवणाची पाकिटे आदी साहित्य वाटप करण्यात आले. महसूल विभागाने रेल्वेच्या या सर्व प्रवाश्यांचे भाडे भरून तिकीट काढले.  

यावेळी पोलीस बंदोबस्त मोठा ठेवण्यात आला होता. अपर पोलीस अधीक्षक संजयकुमार पाटील, उपअधीक्षक शशिकांत भोसले, वरिष्ठ निरीक्षक प्रकाश बिराजदार, निरीक्षक संपत पाटील आदी उपस्थित होते. जेसलपार्क येथून लोकांना ट्रेनने राजस्थान साठी नेणार असल्याचा मॅसेज व्हॉट्सअॅपवर पसरवण्यात आल्याने मीरा भाईंदरच नव्हे तर अगदी मुंबई उपनगरातून लोकं गोळा झाली होती. परंतु यादीतील नावा नुसारच लोकांना घेण्यात आले. बाकीच्यांना परत पाठवण्यात आले.  

भाईंदर वरून ट्रेन सोडण्यास रेल्वेचा नकार  

मीरा भाईंदरमधून मोठ्या संख्येने परराज्यात जाणारे मजूर, कामगार व लोकं असून भाईंदर रेल्वे स्थानकातून ट्रेन सोडण्याची मागणी केली जात होती  परंतु भाईंदर स्थानकातील फलाट लांबीला कमी असल्याने रेल्वेने नकार दिला. त्यामुळे लोकांना बसमधून वसईला नेऊन सोडावे लागत आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याMira Bhayanderमीरा-भाईंदरMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार