शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

वाहन कर्ज परतफेडीची मुदत डिसेंबरपर्यंत वाढवा, अन्यथा आमरण उपोषणाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2020 10:53 IST

भाजप प्रणित रीक्षा चालक युनियनचा पवित्रा, मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, तहसीलदाराना केले सूचित

डोंबिवली: अनलोकडाऊनमुळे रेल्वे सेवा ऑक्टोबरपर्यन्त, आणि शाळा व महाविद्यालये डिसेंबर पर्यंत सुरळीत सुरु होणार नाही अशी शक्यता आहे. त्यामुळे तोपर्यंत रिक्षाचालकांचा व्यवसाय होणार नाही. हे लक्षात घेवून रिक्षाचालकांनी घेतलेले कर्ज परतफेड करण्यासाठी असणारी मुदत डिसेंबर अखेर पर्यंत वाढवावी, अशी मागणी भाजपप्रणित रिक्षा चालक मालक युनियनच्या पदाधिकार्यांनी केली आहे.

रिक्षाचालकांना कर्ज वसुलीसाठी बँका, वित्तीय संस्थाकडून होणारा त्रास थांबवावा. त्या मागणीचा राज्य शासनाने गंभीर्यपूर्वक विचार करावा अन्यथा जाहीर आमरण उपोषणबकरण्यात येईल असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आला आहे. कल्याण डोंबिवलीतील हजारो रिक्षाचालकांनी राज्य शासनाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार नवीन रिक्षा घेण्यासाठी बँका आणि वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतले .मात्र कोविड प्रादुर्भाव वाढल्यानंतर मार्च महिन्यापासून गेले पाच महिने राज्यात लॉक डाऊन होता . त्यामुळे रिक्षा व्यवसाय बंद राहिला होता . त्यावेळी केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या कर्जाचे हफ्ते भरण्यासाठी ३ महिन्यांची सवलत जाहीर केली होती .

कोणत्याही कर्जदाराला थकीत कर्ज वसुलीसाठी त्रास देवू नये ,असे स्पष्ट बजावले होते .मात्र या दरम्यान देखील खाजगी वित्त संस्था थकीत कर्ज असलेल्या रिक्षाचालकांना नाहक त्रासाचे सत्र सुरू असून रिक्षाचालक नैराश्येत आहेत. आता जरी अनलॉक झाले असले तरी सर्व उद्योग व्यवसाय पूर्णतः सुरु झालेले नाहीत .तसेच उपनगरी रेल्वे सेवा आणि शाळा महाविद्यालये अजूनही बंदच असल्याने रिक्षाचालकाना प्रवासी मिळत नाहीत . कल्याण डोंबिवलीत कोविडचा प्रादुर्भाव अजूनही ओसरला नसून बहुतांशी भाग हे कंटेंटमेन्ट झोन आहेत. त्यातच फिजिकल डीस्टसिंगचे नियमामुळे प्रवाशांनी रिक्षाकडे पाठ फिरवली असल्याने अपेक्षेप्रमाणे रिक्षाचालकांचा व्यवसायच होत नाही .

सध्याच्या व्यवसायातून इंधनाचे पैसे देखील मिळत नाही, अशी स्थिती आहे. जोपर्यंत रेल्वे आणि शाळा महाविद्यालये सुरु होत नाहीत तोपर्यंत रिक्षा व्यवसाय खऱ्या अर्थाने सुरु होणे शक्य नाही . त्यामुळे कर्जाचे हफ्ते फेडण्यासाठी बँका व वित्तीय संस्थांनी रिक्षाचालकांना नाहक त्रास देवू नयेत ,असे आदेश द्यावेत . तो त्रास आगामी १५ दिवसात थांबला नाही तर मात्र ठिकठिकाणी आमरण उपोषण आंदोलन करण्यात येईल अशी माहिती पक्षाचे कल्याण जिल्हा वाहतूक सेलचे अध्यक्ष दत्ता माळेकर यांनी दिली.

टॅग्स :auto rickshawऑटो रिक्षाBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे