शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

पालघर जिल्ह्यात ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबची तपासणी, जिल्ह्यात एक मेडिको 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:05 IST

Palghar district : पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.

- हितेन नाईक

पालघर : पालघर जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे; मात्र तरीही रुग्णवाढ होऊ नये यासाठी प्रशासन अद्यापही काळजी घेताना दिसत आहे. दरम्यान, जिल्ह्यात कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅब तपासणीसाठी आयसीएमआरने डहाणू उपजिल्हा रुग्णालयात उभारलेल्या एकमेव मेडिकोव्यतिरिक्त मुंबईच्या जे.जे. रुग्णालय आणि केईएम रुग्णालयातून एकूण ३ लाख ३४ हजार ८३८ स्वॅबच्या तपासणी केल्या आहेत.पालघर जिल्ह्यात आजवर ४५ हजार ५५१ रुग्ण आढळले असून, १२०० रुग्णांचा या जीवघेण्या आजारात मृत्यू झालेला आहे. मात्र त्याच वेळी ४४ हजार १२३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे. यामध्ये सर्वाधिक ३० हजारांहून जास्त रुग्ण वसई-विरार महापालिका क्षेत्रामध्ये आढळले आहेत. यानंतर पालघर तालुक्यामध्ये ८ हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. तर डहाणूमध्ये २ हजार १९७, जव्हारमध्ये ६२१, मोखाडामध्ये २८७, तलासरीमध्ये २७५, वसई ग्रामीणमध्ये १ हजार ३६६, विक्रमगडमध्ये ५९९, वाडामध्ये १ हजार ८७९ रुग्ण आढळलेले आहे. जिल्ह्यात आजवर ४५ हजारांहून जास्त रुग्ण आढळले असले तरी ४४ हजारांहून जास्त रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने दिलासा मिळाला आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर जिल्ह्यातील बव्हंशी व्यवहार पुन्हा सुरळीत सुरू झाले आहेत,  मात्र अद्यापही कोरोनाचा धोका संपलेला नाही. त्यामुळे प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे. स्वॅब घेण्यासाठी तसेच अन्य बाबींसाठी शासन पातळीवरून, जिल्हाधिकारी आणि आयसीएमआरकडून निधी प्राप्त झाला होता. दरम्यान, आता कोरोना नियंत्रणात असल्याने जिल्ह्यात शाळा, महाविद्यालये सुरू झाली आहेत. 

लॅबचे पुढे काय?लॅब पुढेही चालू राहणार आहेत. कारण आता रुग्णसंख्येत पुन्हा वाढही होत आहे. कोरोना स्वॅब टेस्टिंगसाठी प्रत्येक जिल्ह्यात लॅब उभारण्यात आल्या आहेत. त्यात मेडिको (मेडिकल सुविधा आधीपासून असलेले उदा. वैद्यकीय महाविद्यालय किंवा रुग्णालय) आणि नॉन मेडिको (मेडिकल सुविधा आधी नसलेले उदा. विद्यापीठ) असे दोन प्रकार आहेत.

स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मुंबईलाकोरोनाकाळात पालघर जिल्ह्यातील अनेक रुग्णांचे स्वॅब घेऊन ते मुंबईला पाठवले जात होते. त्यामुळे त्या स्वॅबचा अहवाल येण्यासाठी एक दिवसाचा अवधी जात होता. यामुळेही नाराजी व्यक्त होत होती. 

एकाही रिपोर्टमध्ये क्युरी नाहीग्रामीण भागातील रिपोर्टमध्ये क्युरी नव्हत्या, मात्र सुरुवातीच्या काळात वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील रिपोर्टबाबत निगेटिव्हचे पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्याच्या तक्रारी होत्या. यावर महानगरपालिका प्रशासनाने काही लॅबला नोटिशीही बजावल्या होत्या. 

१० जणांचा स्टाफकोरोना प्रादुर्भावाच्या काळात जिल्ह्याच्या आरोग्य प्रशासनाने लॅबमध्ये ८ ते १० जणांच्या स्टाफची नियुक्ती केली होती. 

टॅग्स :palgharपालघरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस