हरित ठाणे जिल्ह्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान — एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2020 06:33 PM2020-01-02T18:33:44+5:302020-01-02T18:42:24+5:30

 काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते.

Eknath Shinde will be a boon for the Green Thane district | हरित ठाणे जिल्ह्यासाठी वनराई बंधारे ठरतील वरदान — एकनाथ शिंदे

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आज केली

Next
ठळक मुद्देभादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयारआतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्णआजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत

ठाणे : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बांधण्यात येत असलेल्या वनराई बंधाऱ्यामुळे जिल्हा हिरवागार होण्यास मदत होईल. या बंधाऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना दुबार पिक घेणे सहज शक्य झाल्याचे प्रतिपादन राज्याचे गृह, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. त्यांनी मुरबाड तालुक्यातील भादाणे गावातील काळू नदीवर बांधण्यात आलेल्या विस्तीर्ण वनराई बंधाऱ्यांची प्रत्यक्ष पाहणी आज केली. त्याप्रसंगी ते बोलत होते
     काळू नदीवर बांधलेल्या या बंधाऱ्यांवर सगळ्यांनी जल प्रतिज्ञा देखील घेतली. त्याच बरोबर पवित्र असणाऱ्यां गंगानदीचे जल शिंदे यांच्या हस्ते या बंधाऱ्यांत सोडण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दिपाली पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे, उपाध्यक्ष सुभाष पवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक पाटील, मुरबाड गट विकास अधिकारी विश्वनाथ केळकर यांच्यासह जिल्हा परिषद , पंचायत समिती सदस्य आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी शिंदे म्हणाले, शासनाचा एकही पैसा खर्च न करता जिल्ह्यात लोक सहभागातून वनराई बंधारे बांधले जात आहेत. आतापर्यंत एक हजार ६०० बंधारे बांधून पूर्ण झाले आहेत. आपल्याला जास्तीत जास्त बंधारे बांधावयचे आहेत. त्यासाठी लोकांची एकजूट महत्वाची आहे. लोकसहभागातून विकासाचे हे उत्तम उदाहरण असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
         मुरबाड तालुक्यातील भादाणे येथील हा बंधारा १६ हजार ५०० गोण्यानी तयार केलेला आहे. बंधाऱ्यांवर शेतकरी आजच्या घडीला भाजीपाला लागवड करत आहे. तसेच बंधाऱ्यांच्या जवळच वीटभट्टी सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे गावातील ३० ते ४० कुटुंबाचा उदरिनर्वाह होण्यास मदत झाल्याची बाब शिंदे यांच्या निदर्शनात मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनवणे यांच्या संकल्पनेतून २ आॅक्टोबर रोजी बंधाऱ्यांच्या मोहिमेला सुरूवात करण्यात आली होती. तेव्हा पासून आजतायगत पाचही तालुक्यात बंधारे बांधले जात आहेत. या बंधाऱ्यांच्या पाण्यामुळे रब्बी हंगामातील पीक घेतली जात आहेत. तसेच जनावराना देखील हे पाणी उपयुक्त ठरत आहेत. लोकांनीच बांधलेले हे वनराई बंधारे जिल्ह्यात लोकोपयोगी ठरत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.

 

Web Title: Eknath Shinde will be a boon for the Green Thane district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.