शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

कमी गुणांमुळे ठाण्यातून बेपत्ता झालेल्या दोन मुली रेल्वेमध्ये मिळाल्या

By जितेंद्र कालेकर | Published: September 02, 2018 11:30 PM

कमी गुण मिळाल्याने पालकांच्या धास्तीने ठाण्यातून दोन मुली घर सोडून गेल्याची बाब समोर आली आहे.मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि शीव (सायन) या रेल्वे स्थानकांमध्ये त्यांनी दोन रात्री घालवल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्यांचा शोध घेतला.

ठळक मुद्दे ठाणे ते सीएसटी केला लोकलने प्रवास सीएसटी आणि सायन स्थानकात काढल्या दोन रात्रीकासारवडवली पोलिसांनी घेतला शोध

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कमी गुणांमुळे मुंबईच्या कुलाबा भागातून पाच मुली बेपत्ता झाल्याची घटना ताजी असतानाच ठाण्यातूनही दोन मुली याच कारणामुळे घर सोडून गेल्याची बाब समोर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि शीव या मुंबईतील रेल्वेस्थानकांमध्ये त्यांनी दोन रात्री घालवल्यानंतर कासारवडवली पोलिसांनी मोठ्या कौशल्याने त्यांचा शोध घेतला.प्रमिला सिंग आणि सविता शर्मा (नावे बदलली आहेत. ) या १३ वर्षे वयाच्या दोघीही मुली ठाण्याच्या डोंगरीपाडा येथे वास्तव्याला आहेत. पातलीपाडा येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील इयत्ता नववीमध्ये त्या शिकतात. प्रमिला ही अभ्यासात साधारण, तर सविता तिच्यापेक्षा कमी आहे. दोघींनाही अलीकडेच झालेल्या घटकचाचणीत दोन विषयांमध्ये कमी गुण मिळाले. त्यामुळे आईवडील रागावतील, या समजातून त्या घाबरल्या. आपण बाहेर जाऊ या, असा प्रस्ताव प्रमिलाने सवितापुढे ठेवला. कुठे जायचे, हे काहीच ठरले नाही. २८ आॅगस्ट रोजी सकाळी पावणेसातच्या सुमारास दोघीही शाळेच्या कम्पाउंडजवळ गेल्या. शाळेत जाण्याऐवजी त्या हिरानंदानी इस्टेटमार्गे रोडवर आल्या. सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास एका एसटीने त्या ठाणे रेल्वेस्थानकाकडे आल्या. दोघींपैकी एकीकडे २२०, तर दुसरीकडे २५० रुपये होते. त्यांनी तिथे वडापाव खाल्ल्यानंतर ठाणे रेल्वेस्थानकातून रेल्वेने सीएसटी स्थानक गाठले. ती रात्र त्याच स्थानकावर काढली. इकडे दोघींच्याही पालकांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात त्यांच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी त्या सायन रेल्वेस्थानकात आल्या. दुपारी एका मित्राला एका दुकानदाराच्या फोनवरून त्यांनी ‘सॉरी’ इतकाच मेसेज टाकला. याच मेसेजच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता ढोले, सहायक पोलीस निरीक्षक शीतल चौगुले, कैलास टोकले आणि रूपाली रत्ने आदींच्या पथकाने त्यांचा शोध सुरू केला. या दुकानदाराचा शोध घेतल्यानंतर आपण त्यांना ओळखत नसल्याचे त्याने सांगितले. परंतु, ३० आॅगस्ट रोजी सकाळी ११.३० वा.च्या सुमारास त्या पुन्हा त्याच दुकानदाराकडे आल्या. पोलिसांचे पथक आपल्या मागावर असल्याची चाहूल लागल्यामुळे त्या घाईतच सीएसटीकडे जाणा-या गाडीत चढल्या. पण, चढताना सविता गाडीतून पडली. त्यावेळी तिला टोकले आणि रत्ने यांनी पकडले. तिच्या वडिलांच्या मदतीने तिला रुग्णालयात दाखल केले. गाडीत चढलेल्या प्रमिलाला मात्र सीएसटी येईपर्यंत झोप लागली. ती पुन्हा त्याच गाडीने डोंबिवलीत गेली. तेव्हा एका महिलेने तिची विचारपूस करून तिच्या आईला फोनवरून ही माहिती दिली. त्यावेळी तिची आई कासारवडवली पोलीस ठाण्यातच होती. त्यामुळे पोलिसांनी तातडीने डोंबिवली स्थानक गाठून अवघ्या दीड तासात दुसरीलाही ताब्यात घेतले. आपल्या मुली सुखरुप परत मिळाल्यामुळे सामान्य कुटूंबातील या पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस