शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

सहा लाखांचे उत्पन्न असूनही नायगाव रेल्वे स्थानक दुर्लक्षित

By admin | Updated: January 21, 2016 02:26 IST

दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक

वसई : दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. परिणामी, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या स्टेशनवरून मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारेच प्रवास अधिक असल्याने सतत धकाधकी आणि धावपळीच्या युगात वावरणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवरील गैरसोयी जणू काही अंगवळणी पडल्या आहेत.कित्येक वर्षे रखडलेला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सब वे काही महिन्यांपासून सुुरू करण्यात आला आहे. पण, रात्रीच्या वेळी सब वेत सुरक्षारक्षकाची व्यवस्था नसल्याने महिलांना सब वे ने ये-जा करण्याची भीती वाटत असते. सब वेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाळ्यात पाणी गळत असते. तसेच पाणी साचून राहिलेले असते. साफसफाई केली जात नसल्याने सब वेत घाण आणि दुर्गंधी पसरलेली असते. सब वेतील लाद्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. स्टेशनवर कायमस्वरूपी पोलीस नसल्याने रात्री-अपरात्री महिला प्रवाशांना ये-जा करताना काळजी घ्यावी लागते. रात्रीच्या वेळी स्टेशनवर भिकारी आणि गर्दुल्ले निवाऱ्यासाठी येतात. पोलीस नसल्याने त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागतो. स्टेशनवर पुरेसे पंखे नाहीत. विजेची सोय नसल्यानेही स्टेशनवर अधिकतर उजेड कमी असल्याने अंधुक प्रकाशात गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होताना दिसते. चारही फलाटांवर बसण्यासाठी पुरेशी बाके नाहीत. रेल्वे फलाटांची उंची जास्त असल्याने गाडीतून चढउतार करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. स्टेशनवर सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास वसई रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांकडे तक्रार करावी लागते. स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिमेला एकेक तिकीट खिडकी आहे. त्यातही दोन्ही बाजूला एकेक खिडकी उघडी असते. पूर्वेला तिकीट खिडकीजवळ दोन आणि पश्चिमेला तीन एटीव्हीएम मशिन्स आहेत. स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास कुणाकडे धाव घ्यायची, असा महिला प्रवाशांचा सवाल आहे. गेल्या वर्षभरात स्टेशन परिसरात रेल्वे अपघातात ११ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. कित्येक वेळा रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळणे खूपच कठीण असते. स्टेशनवर सोयीसुविधांची कमतरता असून स्टेशनबाहेरही प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी दुरून मोटारसायकलीवरून येतात. पण, स्टॅण्डमध्ये अपुरी जागा असल्याने प्रवासी बाहेर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करून दिवसभरासाठी निघून जातात. (प्रतिनिधी)