शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

'समृद्धी' महामार्ग अपघातातील मृतांची संख्या १७ वर, मुख्यमंत्र्यांचा रात्री १ वाजताच भुसेंना फोन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 08:08 IST

शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने अपघात झाला

मुंबई - राज्यातील समृद्धी महामार्गावरीलअपघातांची मालिका अद्यापही सुरूच आहे. या ना त्या कारणाने समृद्धी महामार्ग सुरू होण्याअगोदरपासूनच चर्चेत आहे. मात्र, या महामार्गावील अपघात ही गंभीर बाब बनली आहे. गेल्याच महिन्यात समृद्धी महामार्गावर एका खासगी बसचा स्फोट होऊन २५ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. त्यानंतर, आता पुन्हा एकदा समृद्धी महामार्गावरील शहापूर येथे भीषण दुर्घटना घडली आहे. येथील पुलाचे काम सुरू असताना ग्रेडर-मशिन कोसळून मोठा अपघात झाला. त्यात, १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर अनेकजण जखमी आहेत. 

शहापूरजनिक पुलावरील काम सुरू असताना ग्रेडर मशिन कोसळल्याने अपघात झाला. त्यामध्ये, १७ कामगारांचा मृत्यू झाला असून काहीजण जखमी झाले आहेत. सोमवारी मध्यरात्री सरलांबेजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मंत्री दादा भुसे यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. तसेच, अपघातस्थळी भेट देत पाहणीही केली. घटनास्थळावरुन आत्तापर्यंत १६ मृतदेह बाहेर काढण्यात आले असून डॉग स्कॉड पथकासह अद्यापही कामगारांचा शोध घेण्यात येत आहे. एनडीआरएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्याला सुरुवात केली आहे.

मुख्यमंत्री महोदयांनी रात्री १ वाजताच मला फोन करुन अपघातासंदर्भातील माहिती देत आदेश दिले. त्यानुसार, ताबतडतोब आम्ही सर्वजण टीमसह घटनास्थळी पोहोचलो. तसेच, २० ते २५ मिनिटांत घटनास्थळी मदतकार्याला सुरूवात झाली होती, असे दादा भुसेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले.  

टॅग्स :Samruddhi Mahamargसमृद्धी महामार्गthaneठाणेAccidentअपघातChief Ministerमुख्यमंत्री