शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
3
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
4
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
5
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
6
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
7
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
8
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
9
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
10
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
11
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
12
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
13
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
14
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
17
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
18
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
19
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
20
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
Daily Top 2Weekly Top 5

जो तालुका मुंबईला पाणी देतो, त्याची तहान कधी भागवणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 14:09 IST

रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून जंगलातील चढ-उताराच्या पायवाटेने महिला-भगिनींना घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे

प्रकाश परांजपे ज्येष्ठ पत्रकार

गेल्या वर्षी धुवांधार पावसाने सहा महिने या मुक्काम ठोकूनही शहापूर तालुक्याच्या दुर्गम भागात यंदा लवकरच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. बोअरवेल, विहिरी यांसारखे जलस्रोत आटल्याने रणरणत्या उन्हात तप्त जमिनीवरून जंगलातील चढ-उताराच्या पायवाटेने महिला-भगिनींना घोटभर पाण्यासाठी मैलभर पायपीट करावी लागत आहे. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीलाच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून, आजमितीस ५१ गावपाड्यांवर १४ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.

अडथळ्यांच्या शर्यतीत असलेली साडेतीनशे कोटींची भावली पाणी योजना व निधीअभावी जलजीवन मिशनची पाणी योजना रखडल्याने शासनाची 'हर घर नल से जल' ही घोषणा हवेतच विरली आहे. "जो तालुका मुंबईची तहान भागवतो, त्या शहापूरची तहान कधी भागणार?", हा प्रश्न मात्र कायम आहे. एकीकडे मुंबई महानगराला अखंड पाणीपुरवठा करणारे भातसा, तानसा आणि मोडकसागर ही मोठी धरणे शहापूर तालुक्यात असताना, "धरण उशाला आणि कोरड घशाला", अशी अवस्था आहे. त्यामुळे दुर्गम गावपाड्यांना आजही पाण्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते.

 बोअरवेल, विहिरी, पाणी योजनांची दुरुस्ती आणि टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी दरवर्षी कोट्यवधींचा टंचाई आराखडा तयार करावा लागतो. मात्र, पाणीटंचाईमध्ये दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे. यावर्षी देखील तब्बल तेरा कोटींचा टंचाई आराखडा मंजूर करण्यात आला असून, गतवर्षानुसार साधारणपणे तालुक्यातील किमान पावणेदोनशे गावपाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणे अपेक्षित आहे. गेल्या पाच वर्षाच्या आकडेवारीवर नजर टाकली असता, दरवर्षी टँकरची संख्या व खर्चात सातत्याने चढ-उतार दिसतो. मात्र समस्या कायम आहे. २०२०-२१ ते २५-२६ या कालावधीत टँकरसाठी १७ कोटी खर्च झाला आहे.

धरण उशाला, कोरड घशाला... 

"आमच्याकडे शेती आहे, जनावरं आहेत; पण पाणी नाही. टैंकरचं पाणी पिण्यासाठीच पुरतं, जनावरांना पाणी देणंही कठीण झालंय..." पोटासाठी मोलमजुरीकडे पाठ फिरवून रणरणत्या उन्हात महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे, असे उठावा येथील शेतकरी सखाराम वारे यांनी सांगितले. तर, दुसरे शेतकरी म्हणाले, "धरणं आमच्या डोळ्यासमोर आहेत, पण आमच्या शेताला पाणी मिळत नाही, हीच खरी शोकांतिका आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : When will the thirst of Shahapur, Mumbai's water provider, be quenched?

Web Summary : Despite hosting dams supplying Mumbai, Shahapur faces severe water scarcity. Villagers rely on tankers as water schemes stall. Thirteen crore sanctioned for relief, but the problem persists, highlighting the irony of 'water at the head, dryness at the throat'.
टॅग्स :Waterपाणीshahapurशहापूरthaneठाणे