शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
4
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
5
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
6
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
7
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
8
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
9
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
10
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
11
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
12
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?
13
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
14
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
15
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
16
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
17
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
18
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
19
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
20
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी

कयार चक्रीवादळाचा फटका, माशांच्या किंमतीत 30 टक्क्यांनी वाढ 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2019 10:30 AM

ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो

विशाल हळदे 

ठाणे - अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कयार चक्रीवादळामुळे सतर्कता म्हणून कुलाबा, पालघर, डहाणू, वसई यांसारख्या भागांमध्ये समुद्रात मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. याचा थेट फटका मासेमारी उत्पादनाला बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या परिसरात माशांची आवक घटल्यामुळे किंमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. माशांच्या पुरवठ्यात ६० ते ७० टक्क्यांनी घट झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे.

ठाणे, मुंबई, तसेच पालघरसह कोकण किनारपट्टीवर ऑगस्टपासून मासेमारीचा हंगामा सुरू होतो आणि ऑक्टोबरनंतर चांगल्या प्रकारे मासे मिळायला सुरुवात होते. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा फटका मासे उत्पादनावर झालेला पाहायला मिळत आहे. ठाणे तसेच आसपासच्या शहरात माशांची आवक ही कुलाबा आणि भाऊच्या धक्क्याहून होत असते. गेल्या काही दिवसांपासून या पुरवठय़ात घट झाल्याने माशांच्या किमतीत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे. हिवाळ्याच्या दिवसात माशांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. सद्य:स्थितीत बाजारात मागणीप्रमाणे माशांची आवक होत नसल्याने त्यांच्या किमतीत वाढ झाल्याचे मासळी विक्रेत्यांनी सांगितले. ऑक्टोबर महिन्यात १५० रुपये किलो या दराने मिळणारे बोंबिल सद्य:स्थितीला २०० रुपये किलोने मिळत आहे. तर, ४०० रुपये किलोने मिळणारी कोळंबी सद्य:स्थितीला ५०० रुपये किलोने मिळत आहेत. पापलेट आकारानुसार ६०० ते १२०० रुपये किलोने मिळत होते. आता, ते ८०० ते १५०० रुपये किलोने मिळत आहेत, आणि ५५० रुपये किलोने मिळणारी सुरमई सद्य:स्थितीला ८०० रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे माशांच्या किमतीत प्रतिकिलोमागे १०० ते ३०० रुपयाने वाढ झाल्याने मासे खरेदी करताना ग्राहकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. गेल्या काही काळात जिताडा माशालाही खवय्यांकडून मोठी मागणी असते. उत्तम प्रतीच्या जिताडय़ाचे दरही किलोमागे एक हजार ते १२०० रुपयांपर्यत पोहोचले आहेत.  

टॅग्स :thaneठाणेfishermanमच्छीमारcycloneचक्रीवादळ