शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

कल्याणमध्ये संचारबंदी केवळ दुकान बंदपुरतीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 4:41 AM

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवारपासून सुरू झालेली संचारबंदी ही केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद ...

कल्याण : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी गुरुवारपासून सुरू झालेली संचारबंदी ही केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बंद दुकानांपुरतीच मर्यादित असल्याचे दिसून आले. अनेक नागरिक बिनकामाचे शहरात फिरत असल्याचे दिसून आले. त्यांच्याविरोधात पोलीस व केडीएमसी अधिकारी कारवाई करत नसल्याने त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

अत्यावश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असा आवाहन करण्यात आले असताना शहरात सकाळपासून विनाकारण नागरिक बाहेर पडले हाेते. सकाळी ९ ते १० वाजताच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात रहदारी दिसून आली. चौकात पोलीस बंदोबस्त व महापालिकेचे कारवाई पथक होते. त्यांच्याकडून मुक्त संचार करणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कारवाई केली गेली नाही. त्यामुळे नियम न पाळताच कोरोना कमी कसा होणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत हाेता. अत्यावश्यक सेवेतीलच कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्यास मुभा दिली आहे. त्यानुसार बुधवारपासूनच रेल्वेस्थानकात कल्याण पश्चिम आणि पूर्व भागात दोनच ठिकाणी प्रवेश खुला ठेवला होता. बांबू आणि दोरीचे बॅरिकेट्स बांधण्यात आले होते. सकाळी रेल्वेस्थानकात प्रवाशांची कोणतीही विचारपूस केली जात नव्हती. त्यामुळे सामान्य प्रवासीही थेट रेल्वेने प्रवास करताना दिसून आले.

दुपारी अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या प्रवाशांचे ओळखपत्र तपासून त्यांना तिकीट दिले गेले. याप्रकरणी रेल्वे अधिकारी राजेंद्र गुजर यांनी सांगितले की, सकाळपर्यंत आदेश न आल्याने सकाळी सर्वसामान्यांना प्रवेश दिला गेला. आता फक्त ओळखपत्र तपासून तिकीट दिले जात आहे. कल्याण बसडेपोतूनही सर्व ठिकाणच्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या गेल्या. त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा या नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले.

फोटो-कल्याण-रेल्वे स्टेशन

--------------------