शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

Coronavirus : कोरोनामुळे योगवर्ग बंद नको -योगशिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 01:14 IST

कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत

ठाणे : कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून सरकारने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत; परंतु योगमुळे रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, श्वसनक्षमता वाढते, त्यामुळे योगवर्ग सुरू ठेवावेत. योगवर्गात पाच ते दहा जणांची संख्या असावी, अशी मागणी योगशिक्षकांनी केली आहे. सरकारने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे तसेच, शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात अनेक योगवर्ग बंद ठेवले आहेत; परंतु योगचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. कोरोनाच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी योगवर्ग सुरू ठेवण्याची गरज आहे. शासनाने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली असल्याने ते नाइलाजाने बंद ठेवावे लागत असल्याची खंत योगशिक्षकांनी व्यक्त केली.रोज पाच जणांना घेऊन योग शिकवायला हरकत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता प्राणायम करणे तरी आवश्यक आहे.- ज्योत्स्ना प्रधानयोगवर्गात परदेशातून आलेला कोणीही नसतो. ज्याला ही बाधा झाली आहे त्याच्याकडून संसर्ग होण्याची भीती असते. प्राणायम केले तरी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगवर्ग सुरू असावेत.- स्मिता निमकरसरकारने आदेश दिल्याने योगवर्ग बंद ठेवले आहेत. योग करताना कोणताही संसर्ग होत नाही. आमच्याकडे दारे, खिडक्या उघडी असतात. योगसाधनेने उत्साह होतो, तब्येत चांगली राहते. त्यामुळे एका वर्गात पाच ते दहा जणांना परवानगी मिळावी.- नीलिमा येवलेकर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYogaयोग