शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
4
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
5
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
6
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
7
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
8
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
9
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
10
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
11
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
12
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
13
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
14
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
15
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
16
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
17
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
18
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
19
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
20
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP

Coronavirus : कोरोनामुळे योगवर्ग बंद नको -योगशिक्षकांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 01:14 IST

कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत

ठाणे : कोरोनाचे सावट आल्याने खबरदारी म्हणून सरकारने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश योगवर्गही बंद ठेवले आहेत; परंतु योगमुळे रोगप्रतिकारक क्षमता विकसित होते, श्वसनक्षमता वाढते, त्यामुळे योगवर्ग सुरू ठेवावेत. योगवर्गात पाच ते दहा जणांची संख्या असावी, अशी मागणी योगशिक्षकांनी केली आहे. सरकारने सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम रद्द करण्याचे तसेच, शाळा, महाविद्यालये, खासगी क्लासेस, व्यायामशाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यात अनेक योगवर्ग बंद ठेवले आहेत; परंतु योगचे शारीरिक आणि मानसिक फायदे आहेत. कोरोनाच्या भीतीपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी योगवर्ग सुरू ठेवण्याची गरज आहे. शासनाने समूहाने एकत्र येण्यावर बंदी घातली असल्याने ते नाइलाजाने बंद ठेवावे लागत असल्याची खंत योगशिक्षकांनी व्यक्त केली.रोज पाच जणांना घेऊन योग शिकवायला हरकत नाही. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता प्राणायम करणे तरी आवश्यक आहे.- ज्योत्स्ना प्रधानयोगवर्गात परदेशातून आलेला कोणीही नसतो. ज्याला ही बाधा झाली आहे त्याच्याकडून संसर्ग होण्याची भीती असते. प्राणायम केले तरी शरीरावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे योगवर्ग सुरू असावेत.- स्मिता निमकरसरकारने आदेश दिल्याने योगवर्ग बंद ठेवले आहेत. योग करताना कोणताही संसर्ग होत नाही. आमच्याकडे दारे, खिडक्या उघडी असतात. योगसाधनेने उत्साह होतो, तब्येत चांगली राहते. त्यामुळे एका वर्गात पाच ते दहा जणांना परवानगी मिळावी.- नीलिमा येवलेकर

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYogaयोग