शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

Coronavirus : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा, आर्य गुरुकुल शाळेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 01:55 IST

कोरोनाची व्याप्ती वाढली तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा पेच सध्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनापुढे आहे.

कल्याण : कोरोनाच्या धास्तीने शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न शाळांना भेडसावत असताना कल्याणमधील आर्य गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेतली. आपला पाल्य आॅनलाइन परीक्षा देत असल्याचे फोटो व व्हिडीओ पालकांनी शाळेला पाठवून दिले. आॅनलाइन परीक्षेमुळे पालकांची चिंता दूर झाली आहे.कोरोनाची व्याप्ती वाढली तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा पेच सध्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनापुढे आहे. शासनाने शाळांना सुटी जाहीर केल्याने सध्या सर्वच शाळा बंद आहेत. परीक्षा लांबणीवर पडल्या तर निकाल लांबणीवर पडण्याची भीती असून शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या आपत्तीला तोंड देत विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेता येईल, याबाबत आर्य गुरुकुल शाळेने विचार करून आॅनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना अडचण येणार नाही आणि विद्यार्थी घरी बसून परीक्षा देऊ शकतो. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेण्याकरिता पालकांची परवानगी घेण्यात आली. शाळेतील ५४६ मुलांनी ही परीक्षा दिली. सीबीएसई बोर्डाच्या पद्धतीनुसार खुली परीक्षा घेता येते, अशी माहिती शाळेचे संचालक भरत मालिक यांनी दिली. आॅनलाइन परीक्षेकरिता शाळेच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. पालकांनी आपल्या पाल्याचे घरी बसून परीक्षा देत असलेले फोटो व व्हिडीओ शाळेला पाठविले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा संकटाच्या काळात परीक्षा घेण्यासाठी करीत असल्याची माहिती शाळेच्या शैक्षणिक संचालक नीलम मालिक यांनी दिली.विद्यार्थ्यांना बहुपर्यायी आणि मोठी उत्तरे अशा दोन्ही पद्धतीचे प्रश्न या परीक्षेत देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याच्या घरी चारपाच विद्यार्थ्यांनी जाऊन परीक्षा दिली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी सोमवारी संस्कृत, गणित, सामाजिक शास्त्रांची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा युजर फे्रण्डली असल्याची प्रतिक्रिया पालक स्मिता मोकल यांनी दिली.पाचवीत शिकणारी इर्शिता मोकल म्हणाली की, आपल्याला संगणकावर टायपिंग जमत नाही. पण, शाळेने पुरेसा वेळ दिला होता. संगणकावर परीक्षा देताना मजा वाटली. कोणतीही तक्रार असल्यास शाळांनी हेल्पलाइन नंबर दिला होता. त्याद्वारे शंकांचे निरसन केले जात होते.आॅनलाइन परीक्षेबाबत पालक रूपाली धवले म्हणाल्या की, हा प्रयोग आम्हाला आवडला. शाळेने आम्हाला लिंक दिली होती. त्यावर पेपर होता. एकाच वेळी एवढे विद्यार्थी परीक्षा देणार, त्यामुळे सर्व्हर डाउन होईल का, ही भीती होती. मात्र, तसे झाले नाही. आम्ही आमच्या पाल्याला गुण किती मिळतात, यापेक्षा आकलन किती झाले आहे, यावर भर देतो. त्यामुळे परीक्षेचा तणाव तिच्यावर कधी येत नाही. विद्यार्थी चारवी धवले हिनेही संगणकावर परीक्षा देताना मजा आली व घरातून परीक्षा देत असल्याने टेन्शन नव्हते, असे सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र