शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

Coronavirus : कोरोनामुळे विद्यार्थ्यांची ऑनलाइन परीक्षा, आर्य गुरुकुल शाळेचा उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2020 01:55 IST

कोरोनाची व्याप्ती वाढली तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा पेच सध्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनापुढे आहे.

कल्याण : कोरोनाच्या धास्तीने शाळा बंद ठेवण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, असा प्रश्न शाळांना भेडसावत असताना कल्याणमधील आर्य गुरुकुल शाळेने विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेतली. आपला पाल्य आॅनलाइन परीक्षा देत असल्याचे फोटो व व्हिडीओ पालकांनी शाळेला पाठवून दिले. आॅनलाइन परीक्षेमुळे पालकांची चिंता दूर झाली आहे.कोरोनाची व्याप्ती वाढली तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा कशा घ्यायच्या, हा पेच सध्या अनेक शाळांच्या मुख्याध्यापक व व्यवस्थापनापुढे आहे. शासनाने शाळांना सुटी जाहीर केल्याने सध्या सर्वच शाळा बंद आहेत. परीक्षा लांबणीवर पडल्या तर निकाल लांबणीवर पडण्याची भीती असून शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मात्र, या आपत्तीला तोंड देत विद्यार्थ्यांची परीक्षा कशी घेता येईल, याबाबत आर्य गुरुकुल शाळेने विचार करून आॅनलाइन परीक्षा घेण्याचे ठरविले. यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना अडचण येणार नाही आणि विद्यार्थी घरी बसून परीक्षा देऊ शकतो. इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा घेण्याकरिता पालकांची परवानगी घेण्यात आली. शाळेतील ५४६ मुलांनी ही परीक्षा दिली. सीबीएसई बोर्डाच्या पद्धतीनुसार खुली परीक्षा घेता येते, अशी माहिती शाळेचे संचालक भरत मालिक यांनी दिली. आॅनलाइन परीक्षेकरिता शाळेच्या कर्मचाऱ्यांनी कठोर परिश्रम घेतले. पालकांनी आपल्या पाल्याचे घरी बसून परीक्षा देत असलेले फोटो व व्हिडीओ शाळेला पाठविले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अशा संकटाच्या काळात परीक्षा घेण्यासाठी करीत असल्याची माहिती शाळेच्या शैक्षणिक संचालक नीलम मालिक यांनी दिली.विद्यार्थ्यांना बहुपर्यायी आणि मोठी उत्तरे अशा दोन्ही पद्धतीचे प्रश्न या परीक्षेत देण्यात आले होते. एका विद्यार्थ्याच्या घरी चारपाच विद्यार्थ्यांनी जाऊन परीक्षा दिली. परीक्षेच्या पहिल्या दिवशी सोमवारी संस्कृत, गणित, सामाजिक शास्त्रांची परीक्षा विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा युजर फे्रण्डली असल्याची प्रतिक्रिया पालक स्मिता मोकल यांनी दिली.पाचवीत शिकणारी इर्शिता मोकल म्हणाली की, आपल्याला संगणकावर टायपिंग जमत नाही. पण, शाळेने पुरेसा वेळ दिला होता. संगणकावर परीक्षा देताना मजा वाटली. कोणतीही तक्रार असल्यास शाळांनी हेल्पलाइन नंबर दिला होता. त्याद्वारे शंकांचे निरसन केले जात होते.आॅनलाइन परीक्षेबाबत पालक रूपाली धवले म्हणाल्या की, हा प्रयोग आम्हाला आवडला. शाळेने आम्हाला लिंक दिली होती. त्यावर पेपर होता. एकाच वेळी एवढे विद्यार्थी परीक्षा देणार, त्यामुळे सर्व्हर डाउन होईल का, ही भीती होती. मात्र, तसे झाले नाही. आम्ही आमच्या पाल्याला गुण किती मिळतात, यापेक्षा आकलन किती झाले आहे, यावर भर देतो. त्यामुळे परीक्षेचा तणाव तिच्यावर कधी येत नाही. विद्यार्थी चारवी धवले हिनेही संगणकावर परीक्षा देताना मजा आली व घरातून परीक्षा देत असल्याने टेन्शन नव्हते, असे सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोनाSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र