शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यात यश आले असले तरी गाफील राहू नका; उध्दव ठाकरेंचे आवाहन    

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2020 17:16 IST

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोना बाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते.

ठाणे : कोरोना रोखण्यासाठी ज्या काही उपाय योजना करण्यात आल्या आहेत. त्या निश्चितच चांगल्या आहेत. कोरोना रुग्णांची घटणारी संख्या, उपचार करुन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या यावरुन ठाण्याने कोरोनाचे संकट रोखण्यासाठी केलेले उपाय हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले. तसेच यापुढेही गाफील राहू नका. कोरोनाचा प्रादरुभाव पुन्हा वाढू शकतो, सणांचे दिवस आहेत. त्यामुळे काळजी घ्या अशा सुचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्या आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे कोरोनाबाबत केलेल्या उपाय योजनांचा आढावा घेण्यासाठी ठाण्यात आले होते. यावेळी कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांच्या समवेत पर्यावरण मंत्री आदीत्य ठाकरे,  ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री यांचे सल्लागार अजोय मेहता, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, आरोग्य विभागाचे अधिकारी, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त आदींसह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यावेळी त्यांनी कोरोना बाबत ठाण्याने जी काही काम केले आहे, त्याबाबत समाधान असल्याचे सांगितले.

यावेळी महापालिका आयुक्तांनी सुरवातील कोरोना बाबत कशा बाबत उपाय योजना केल्या, कोविड केअर सेंटरचा कसा फायदा झाला या विषयीचे सादरीकरण केले. त्यानंतर मुंब्रा पॅटर्न कसा यशस्वी केला या बाबत मुख्यमंत्र्यांनी सवाल केला असता, त्या ठिकाणी कशा पध्दतीने उपाय योजना केल्या. रुग्णांचा शोध कशा पध्दतीने घेतला गेला, या विषयीची माहिती सहाय्यक आयुक्त आणि उपायुक्तांनी त्यांना दिली. ठाण्यात आल्यानंतर समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोना प्रार्दुभाव रोखण्यात ठाण्याने यश मिळविले आहे. त्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. परंतु गाफील राहू नका, सणांचे दिवस आहे. परंतु, प्रादुर्भाव वाढू शकतो, आपल्याला थांबायचे नाही, कोरोना विरुध्दचा हा लढा सुरुच ठेवायचा असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे पुन्हा मी जेव्हा ठाण्यात येईन तेव्हा ठाणे कोरोनामुक्त झालेले मला नक्कीच आवडेल, असेही त्यांनी सांगितले.

मुंब्रा पॅटर्न बाबत समाधान वाटत असल्याचेही त्यांनी सांगितले. त्यानुसार मुंब्रा पॅटर्नही इतर भागात राबविण्यात यावा, झोपडपटटी भागात ज्या पध्दतीने कोरोना रोखण्यात यश आले आहे, तसेच इमारतींमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव कसा रोखता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचनाही त्यांनी केल्या. यासाठी जे काही सहकार्य लागेल ते सांगा, निधी हवा असेल तर तो देखील देऊ आणि कोरोना प्रादुर्भाव रोखा अशा सुचनाही त्यांनी केल्या. कोरोना बाबत नागरीकांमध्ये जनजागृती करा, सणा सुदीचे दिवस आहेत, त्यानुसार या काळात कशी काळजी घेतली गेली पाहिजे याची माहिती देखील नागरीकांना द्या असेही त्यांनी यावेळी सांगितले. तर कोरोना दक्षता समिती ही प्रत्येक वॉर्डात स्थापन करावी अशी सुचनाही त्यांनी दिली.

लॉकडाऊननंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली आहे, दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र यामुळे गाफील राहून चालणार नाही, सतर्क राहावे लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा नियमित वापर करावा, वैयक्तीक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे आहे. याशिवाय पावसाळी आजारांकडेही दुर्लक्ष करु नका अशा सुचनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिल्या आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसthaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका