शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

Corona Vaccine : कोरोना लसीचा साठा नसल्याने मीरा भाईंदर पालिकेची ६ लसीकरण केंद्र बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 21:01 IST

Corona Vaccine And Mira Bhayander Municipal Corporation : लोकांनी लसीकरण केंद्रावर नोंदणी शिवाय गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. 

मीरारोड - केंद्र शासनाकडून कोरोनाच्या मागणीनुसार लस दिल्या जात नसल्याचा आरोप होत असतानाच मीरा भाईंदर महापालिकेत सुद्धा केवळ ३३४० इतक्याच शिल्लक असल्याने महापालिकेने ६ लसीकरण केंद्र बंद केली आहेत. तर उर्वरीत ५ लसीकरण केंद्रावर सुद्धा केवळ लसीचा दुसरा डोस घ्यायचे बाकी असणाऱ्यांनाच लस दिली जाणार आहे. रोज केवळ ५०० लोकांनाच लस मिळणार आहे. लोकांनी लसीकरण केंद्रावर नोंदणी शिवाय गर्दी करू नये असे आवाहन पालिकेने केले आहे. 

मीरा भाईंदर महापालिकेला शासनाकडून कोविशील्डच्या ९४ हजार तर कोवॅक्सीनच्या १२ हजार ६२० अशा एकूण १ लाख ६ हजार ६२० लसींचा साठा पुरवण्यात आला होता. शहरात लसीकरणासाठी पालिकेची ११ केंद्र तर खासगी ९ केंद्र सुरू करण्यात आली होती. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नागरिकांचे लवकर लसीकरण व्हावे या अनुषंगाने  रोज ३ ते साडे तीन हजार लसीकरणाचे टार्गेट असताना सुमारे ५ हजार पर्यंत रोज लसीकरण केले गेले केले. लसीकरण केंद्रावर वैद्यकीय कमर्चाऱ्यांसह शिक्षक, आशा वर्कर यांची सुद्धा मदत घेण्यात आली. महापालिकेने लसीकरणाचे नियोजन करत जास्तीजास्त सुविधा देत त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला.

बुधवार ७ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार पहिला डोस दिलेल्यांची संख्या ८६ हजार ९२७ तर दुसरा डोस दिलेल्यांची संख्या ८ हजार ८९ इतकी होती. ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना ४३ हजार २२८ लस देण्यात आल्या. तर ४५ ते ६० वयोगटातील ३१ हजार ५११ जणांना लस देण्यात आली. वैद्यकीय व आपत्कालीन सेवेतील लोकांना १३ हजार ३३१ आणि ६ हजार ९४६ इतक्या लस देण्यात आल्या आहेत. परंतु लसीची सतत मागणी करून देखील पुवठा न झाल्याने गुरुवार ८ एप्रिलच्या सायंकाळी केवळ ३३४० कोविशील्डच्या लस शिल्लक राहिल्या आहेत . लसीचा साठा जवळपास संपल्याने महापालिकेला आता लसीकरणाची मीरारोड, विनायक नगर, मुर्धा, पेणकर पाडा, नवघर व उत्तन येथील आरोग्य केंद्रातील लसीकरण तात्पुरते बंद करण्यात आले आहे.

रुग्णालय, इंदिरा गांधी रुग्णालय, मीनाताई ठाकरे सभागृह, बंदरवाडी आरोग्य केंद्र व काशीगाव आरोग्य केंद्रातच लसीकरण चालणार आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा नव्याने लसीकरण केले जाणार नाही. केवळ दुसरा डोस ज्यांचा बाकी आहे त्यांचेच लसीकरण केले जाणार आहे. लसीची उपलब्धता पाहता रोज प्रत्येक लसीकरण केंद्रात केवळ १०० लोकांनाच लस दिली जाणार असून एकूण ५०० लस रोज दिल्या जातील. लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाणार आहे. 

डॉ . अंजली पाटील (लसीकरण अधिकारी , महापालिका) - सध्या शासनाकडून लसीचा पुरवठा झालेला नसल्याने ६ केंद्र तात्पुरती बंद केली आहेत. ज्या ५ केंद्रात लसीकरण सुरू आहे तेथे रोज प्रत्येकी १०० जणांनाच तेही दुसरा डोस बाकी असणाऱ्यांना लस दिली जाईल.   नागरिकांनी लसीकरण केंद्रावर गर्दी करू नये व ऑनलाईन नोंदणी करावी. लसीचा पुरवठा होताच पुन्हा लसीकरण सुरू केले जाईल. नागरिकांना कोरोना संसर्गाचा पासून मुक्त करण्यासाठी पालिकेने दिलेल्या इष्टांक पेक्षा जास्त वेगाने लसीकरण केले आहे. लसीकरण केंद्रात आवश्यक सर्व सुविधा व कर्मचारी तैनात आहेत.  

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याthaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMira Bhayanderमीरा-भाईंदरMira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक