शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
2
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
3
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
4
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
5
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
6
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
7
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
8
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
9
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
10
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
11
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
12
सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान
13
कलंकित अन् काळा भूतकाळ असलेले विश्वास ठेवण्यालायक नाहीत, काँग्रेस-राजद जोडी...! बिहारमध्ये CM योगींची तुफान फटकेबाजी
14
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
15
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...
16
IND vs SA 1st Test : 'ध्रुव' तारा चमकला! टीम इंडियात ३९ वर्षांनी पहिल्यांदाच असं चित्र दिसणार?
17
Kitchen Hack: गॅस बर्नरवर काळे, चिकट थर जमा झालेत? 'या' दोन वस्तूंनी मिनिटांत करा चकाचक 
18
५०० रुपये उधार घेतले, ११ कोटी जिंकले... भाजीवाल्याला आल्या धमक्या, बंद करावा लागला फोन
19
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
20
अखंड भारताची 'ही' बॉर्डर, तालिबान-पाकिस्तानच्या वादाचं मूळ कारण; १३२ वर्षांनीही धगधगती आग कायम

Coronavirus:...तर ‘अशा’ लोकांना शहराच्या बाहेर हलवा; मनसे आमदार राजू पाटील यांची मागणी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 09:08 IST

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्तांना पत्र लिहिलं आहे.

ठळक मुद्देमनसे आमदार राजू पाटील यांचे केडीएमसी आयुक्तांना पत्र डोंबिवली हॉटस्पॉट असताना बाहेरुन रुग्ण आणू नका १०० पेक्षा अधिक लोक शहरात आल्याची माहिती

ठाणे – राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४ हजार ५०० च्या वर पोहचला आहे. तर २०० पेक्षा अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबई, पुणे, ठाणे, कल्याण-डोंबिवली येथील परिसरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने लोकांमध्ये चिंता वाढली आहे. दिल्लीच्या मरकज येथील तबलीगी जमातीतील काही संभाव्य कोरोनाग्रस्तांना डोंबिवलीत आणल्याप्रकरणी मनसेने आक्षेप घेतला आहे.

याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसीचे आयुक्तांना पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी म्हटलंय की, सध्या जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. या रोगातून कल्याण-डोंबिवलीही सुटू शकली नाही. महाराष्ट्रात कल्याण-डोंबिवलीचा कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्यात तिसरा किंवा चौथा क्रमांक लागतो. आपल्या इथं रोग पसरण्यासाठी नाममात्र असलेली आरोग्यसेवा आणि काही लोकांचा हलगर्जीपणा कारणीभूत ठरत असल्याचं दिसून येतं असा आरोप त्यांनी पत्रात केला आहे.

तसेच जेव्हा डोंबिवली परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट बनत चालला होता व त्याच सुमारास कल्याणहून रस्त्यावर फिरणाऱ्या साधारण २५ लोकांना आपण पाथर्ली येथील BSUP त क्वारंटाइन केल्याची माहिती आहे. याबाबत बाहेरुन रुग्ण आणू नका अशी विनंती फोनवरुन केली होती. याच पाथर्ली भागात काही दिवसांपूर्वी एक कोरोनाग्रस्त आढळून आला आहे. तसेच येथून जवळच असलेला आजदे सागर्ली भाग हॉटस्पॉट म्हणून जाहीर केला आहे. अशातच काही संभाव्य कोरोना रुग्ण ज्यामध्ये तबलीगी यांचा समावेश आहे असे एकूण १०० वर लोक इथे ठेवले आहेत  त्यामुळे लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे असं पत्रात सांगण्यात आलं आहे.

त्यामुळे हॉटस्पॉटमध्ये आढळले रुग्ण त्या जागेपासून दूर नेणे अपेक्षित असताना उलट बाहेरचे संभाव्य शहरातील दाट वस्तीच्या ठिकाणी आणणे योग्य नाही. आधीच कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या डोंबिवलीत या तबलींगींची उपस्थिती जर लोकांमध्ये भीती निर्माण करत असेल तर त्यामुळे भविष्यात प्रशासनावर ताण येणार असेल तर या लोकांना लवकरात लवकर डोंबिवली शहराबाहेर हलवावे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.

टॅग्स :MNSमनसेdombivaliडोंबिवलीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkdmcकल्याण डोंबिवली महापालिका