शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

Coronavirus:...तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच; मनसे आमदाराचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2020 12:48 IST

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे.

ठळक मुद्देभाजपाने पण आता जबाबदारी झटकण्याचे काम करू नयेकल्याण-डोंबिवली या दोन्ही शहरांची दुर्दशा करण्यात शिवसेना-भाजपाचा वाटा समान आहे.केडीएमसीत आरोग्य सेवेच्या नावाने बोंबाबोंबच आहे.

मुंबई - चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगावर थैमान घातलं आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा साडेतीन लाखांहून वर पोहचला आहे. राज्यातही कोरोनाचं संकट दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच या संघर्षाच्या काळात कोलमडलेल्या आरोग्य सेवेवरुन सत्ताधारी पक्षांवर विरोधकांनी गंभीर आरोप लावले आहेत. 

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे. राजू पाटील म्हणतात की, केडीएमसीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून युतीचीच सत्ता आहे. जवळजवळ २० हजार कोटींच्यावर बजेट या काळात मंजुर झाले. परंतु आरोग्य सेवेच्या नावाने बोंबाबोंबच आहे. मागच्या सरकारमध्ये डोंबिवलीचे आमदार वैद्यकिय शिक्षण मंत्री, पालकमंत्री हेच आरोग्यमंत्री पण होते आणि खासदार तर डॉक्टरच आहेत. तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच राहिली असा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच खरंतर एखादे वैद्यकिय महाविद्यालय व दोन्ही शहरात एक एक सुसज्ज दवाखाना सहज उभारता आले असते. त्यामुळे भाजपाने पण आता जबाबदारी झटकण्याचे काम करू नये. या दोन्ही शहरांची दुर्दशा करण्यात दोन्ही पक्षांचा वाटा समान आहे. एकीकडे सत्ताधारी आरोग्यसेवा तयार करू शकले नाहीत म्हणून सध्या करोडो रुपये खर्च करून खाटा टाकायची कामं करत आहे. तर दुसरीकडे गेल्या २५ वर्षापासून युतीत असलेली भाजपा काही महिन्यापूर्वी वेगळी काय झाली जणू आम्ही त्यांच्यातले नाहीच अशा अविर्भावात जबाबदारी झटकण्याचे काम करत आहेत. लॉकडाऊनला विरोध करून नंतर होणाऱ्या प्राणहानी वरून राजकारण करण्याचे जर कोणी मनात आणत असेल तर ते माणूसकीला धरून होणार नाही असं सांगत राजू पाटील यांनी शिवसेनेसोबत भाजपावरही टीकास्त्र सोडलं आहे.

दरम्यान, कोरोना काळात नुसतेच राजकीय आरोपप्रत्यारोप करायचे नाही हे आधीच ठरवले होते. परंतु आज महापालिका हद्दीत कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या १२/१३ दिवसापासून रोज साधारण ७ ते ८ मिनिटात एक रूग्ण या वेगाने वाढत आहेत. केडीएमसीकडे उपलब्ध बेड व रूग्णांची संख्या समान झाली आहे. अशावेळी प्रशासन याआधी घेतलेल्या लॉकडाऊन काळात पुरेशा सोई उपलब्ध करण्यात सपशेल कमी पडल्याचे दिसत आहे. म्हणून प्रशासनाने पुरेशा सोई उपलब्ध करून देण्यासाठी १५ दिवसाचा ‘लॉकडाऊन नव्हे कर्फ्यू’ घोषित करणे गरजेचे आहे. नाहीतर यापुढे रुग्णांना बेड न मिळाल्याने रस्त्यावर आपला प्राण सोडवे लागतील.म्हणून अशावेळी एक कडक लॉकडाऊन घेणे गरजेचे आहे अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.  

टॅग्स :MNSमनसेkdmcकल्याण डोंबिवली महापालिकाEknath Shindeएकनाथ शिंदेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस