शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

CoronaVirus: अत्यावश्यक सेवा वगळता ठाण्यात इतर सेवा पूर्ण बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 2:15 AM

टोल नाक्यावर वाहनांची रांग; सरकारी आदेशातील संदिग्धतेमुळे उद्योगांचे शटर डाउन

ठाणे : ठाण्यातील आनंद नगर टोलनाक्यावर सोमवारी सकाळी वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्याचे चित्र दिसत होते. मात्र शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा या बंदच होत्या. ठाण्यात दिवसेंदिवस कोरोना बाधीत रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने व उद्योग सुरु करण्याबाबतच्या सरकारी आदेशांत संदिग्धता असल्याने काही आस्थापनांना व्यवहार सुरु करण्याची परवानगी देऊनही बहुतांश व्यवहार ठप्पच होते.मागील २१ मार्च पासून संपूर्ण देशात लॉक डाउन करण्यात आला आहे. तो आता ३ मे पर्यंत लागू असणार आहे. २० एप्रिल पर्यंत ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असेल त्या ठिकाणचे उद्योग तसेच इतर काही व्यवहार काही प्रमाणात सुरु करता येऊ शकतील, असे सरकारच्यावतीने सांगण्यात आले होते. तसेच शासकीय कार्यालयात १० टक्के उपस्थितीला परवानगी दिली होती. परंतु ठाण्यातील कोरोना बाधीत रुग्णांचा आकडा १५० च्या घरात गेला आहे. परिणामी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या सीमा बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे ठाण्यासह जिल्ह्यातील एकही उद्योगधंदा सोमवारपासून सुरु होऊ शकलेला नाही. उद्योग सुरु केल्यानंतर कामगारांना त्याच ठिकाणी ठेवण्यात यावे, अशी अट घालण्यात आली आहे. परंतु लघु उद्योगांसाठी ते शक्य नाही. उद्योग सुरु केले तरी कच्चा माल उपलब्ध होऊ शकणार नाही. त्यामुळे उद्योगधंदे सुरु करुन काय उपयोग, असा सवाल ‘टिसा’चे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब खांबेटे यांनी केला. तसेच सरकारच्या इतर अनेक अटी जाचक आणि संदिग्ध असल्याने जिल्ह्यातील उद्योगधंदे सुरु होऊ शकलेले नाहीत, असे खांबेटे म्हणाले.टोलनाकेसोमवारपासून सुरु झाल्याने आनंद नगर टोलनाक्यावरील दोन लेन यासाठी खुल्या करण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी अवजड वाहनांच्या काही प्रमाणात रांगा लागल्या होत्या. महापालिकेतही १० टक्के कर्मचारी हजर नव्हते. कर्मचाऱ्यांचे प्रमाण तुरळक होते. शहरातील इतर भागात अत्यावश्यक सेवा वगळता इतर सेवा बंदच होत्या.कळव्यात भाजीसाठी गर्दीमहापालिकेत १० टक्के कर्मचाºयांची उपस्थिती मंजूर केलेली असली तरी त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाही. ठाण्यातील दैनंदिन व्यवहारांवर कोरोनाच्या भयाचे सावट असले तरी कळव्यात मात्र रुग्ण वाढत असतांनाही नागरीकांना त्याचे भय नसल्याचे चित्र होते. रस्त्यांवर तसेच भाजी खरेदीकरिता लोकांची गर्दी दिसत होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस