शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरात घुसून हत्या; चोरांकडून कृत्य की ओळखीच्या व्यक्तीकडूनच घात?
3
"इंडिया आघाडी तीन कट रचतेय", घोसीत PM नरेंद्र मोदींचा हल्लाबोल
4
ENG vs PAK : ...म्हणूनच पाकिस्तानचा पराभव होतोय; माजी खेळाडूनं सांगितली मैदानाबाहेरील गोष्ट
5
कल्याणमधील 'तो' अ‍ॅसिड हल्ला बनावट; UPSC करणाऱ्या तरुणीचे बिंग पोलिसांनी 'असं' फोडलं
6
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
7
Rajkot Game zone Fire Accident: 'डेथ फॉर्म' भरलात तरच तुम्हाला प्रवेश मिळेल, गेम झोन मालकांनी ठेवली होती ही अट; राजकोट दुर्घटनेवर मोठा खुलासा
8
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
9
पॅट कमिन्सकडून एका 'ऑटो राईड'चे श्रेयस अय्यरने मागितले २० कोटी; फायनलपूर्वीचा मजेशीर Video 
10
"मुलाच्या आईने भावनिक होऊन..."; आरोपीच्या ड्रायव्हरबाबत पुणे पोलिसांचा मोठा खुलासा
11
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
12
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
13
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
14
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
15
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
16
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
17
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
18
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
19
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
20
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट

CoronaVirus News: ठाणे जिल्ह्यात शनिवारी कोरोनाचे ७५ मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2020 4:22 AM

नव्या १५६६ रुग्णांची वाढ; आरोग्य विभागाची माहिती

ठाणे : जिल्ह्यात शनिवारी कोरोनाने ७५ जणांचा मृत्यू झाला. तर, एक हजार ५६६ नव्या रुग्णांची वाढ झाली. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंंख्या ९६ हजार ९६० झाली असून मृतांचा आकडा दोन हजार ७१८ झाला.ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनाचे २८८ रुग्ण नव्याने आढळल्याने बाधितांची संख्या २१ हजार ८०२ वर पोहोचली आहे. चार जणांच्या मृत्यूने आतापर्यंत मृतांची संख्या ६९२ झाली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात ३०९ रुग्णांसह १० जणांच्या मृत्यूची नोंद झाली. यामुळे आतापर्यंत २२ हजार १५५ रुग्ण बाधित झाले असून मृतांची संख्या ४३१ झाली आहे.भिवंडी महापालिका क्षेत्रात १९ बाधित आढळून आले. तर, तब्बल ४० जणांच्या मृत्यूंची नोंद झाली. आतापर्यंत येथे बाधितांची संख्या तीन हजार ७५६ झाली असून मृतांची संख्या २५८ झाली आहे. मीरा-भार्इंदरमध्ये १९९ रुग्णांसह पाच जणांच्या मृत्यूची नोंद शनिवारी करण्यात आली. अंबरनाथमध्ये ६३ नवे रुग्ण वाढले असून एका जणाच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. यामुळे बाधितांची संख्या चार हजार १८२ तर, मृतांची १६५ आहे. बदलापूरमध्ये ६७ रुग्णांची नोंद झाल्यामुळे बाधितांची संख्या दोन हजार १३ झाली. ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण भागात १२१ रुग्णांची वाढ तर चार मृत्यू झाले आहेत.वसई-विरारमध्ये सात रुग्णांचा मृत्यूवसई-विरार शहरात शनिवारी २१६ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले, मात्र त्याच वेळी सात रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकूण बाधित रुग्णांची संख्या १३ हजार २८७ वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे १२५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आजवर पालिका हद्दीतील १० हजार ८३ रुग्णांनी कोरोनावर मात करण्यात यश मिळविले आहे.वसई-विरार शहर महापालिका हद्दीत शनिवारी दिवसभरात सात रुग्णांनी आपले प्राण गमावले. यात वसई-१, विरार-२ आणि नालासोपारामधील४ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे आजवर जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या २७७ झाली आहे. तर शनिवारी दिवसभरात आढळलेल्या २१६ रुग्णांमध्ये वसई-७३, वसई-विरार-४, नायगाव-४, नालासोपारा-७० आणि विरार-६५ रुग्णांचा समावेश आहे.नवी मुंबईमध्ये ४५५ रुग्ण वाढलेनवी मुंबई : शहरात दिवसभरात ४५५ रुग्ण वाढले असून एकूण रुग्णांची संख्या १८,१४९ झाली आहे. महानगरपालिका प्रशासनाने चाचण्याची संख्या वाढविली आहे. आतापर्यंत ३६,४४३ आरटीपीसीआर चाचण्या झाल्या असून ३२,२२८ अँटिजेन चाचण्या झाल्या आहेत. दिवसभरात ५२१ रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत तब्बल १४,०७३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शनिवारी सात जणांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा ४६१ झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या