शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

कोजागिरीवर कोरोनाचे सावट, मागच्या वर्षीच्या तुलनेत दूधविक्रीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:24 IST

कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते.

कल्याण : कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शुक्रवारी एकाच दिवशी आले. हा दुग्धशर्करा योग पाहता दुधाची मागणी वाढेल, अशी अपेक्षा शहरातील दूध नाक्यावरील दूधविक्रेत्यांना होती. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे ही अपेक्षा फोल ठरली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत दुधाची विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते. पश्चिमेतील मुस्लीमबहुल वस्तीत जवळपास १०० पेक्षा जास्त गोठे असून, त्यातील ताजे म्हशीचे दूध काढून जवळच असलेल्या दूध नाक्यावर सुटे विकले जाते. विशेष म्हणजे, ताज्या दुधाचा प्रतिलीटर भाव दररोज बदलत असतो. कोजागिरीला किरकोळ विक्रीसह अनेक सोसायट्या येथे दुधाची खरेदी करतात. १० ते ५० लीटरपर्यंत दूध येथून सोसायट्या घेऊन जातात. मग रात्री सोसायटीच्या आवारात अथवा गच्चीवर कोजागरी साजरी केली जाते. प्रत्येकाला चंद्रप्रकाशात गरम दूध दिले जाते.ईद-ए-मिलादला मुस्लीमही दूध खरेदी करतात. त्यामुळे यंदा कोजागिरी व ईद-ए-मिलादला दुधाची जास्त विक्री होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांची होती. शुक्रवारी सकाळी दूध नाक्यावर दुधाचा भाव प्रतिलीटरमागे ६० रुपये होता, तर दुपारी २ वाजता हा भाव १० रुपयांनी वाढून ७० रुपये झाला. दिवसभरात केवळ १० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षी किमान २० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षीच्या दुलनेत यंदा विक्रीत ५० टक्के घट आहे. त्याचा फटका दूधविक्रेत्यांना बसल्याची माहिती दूधविक्रेते मोहम्मद हनी यांनी दिली. कोरोनामुळे दुधाची विक्री कमी झाली आहे.लोक एकत्रित येऊन सण साजरा करू शकत नाही. त्यामुळे जास्तीचे दूध घेऊन ते काय करणार, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला.गरम दुधासोबत चटकदार लाल शेव असलेले फरसाण जास्त विकले जाते. ते केवळ कोजागिरीनिमित्त तयार केले जाते. कोजागिरीला या खास फरसाणची जास्त मागणी असते. हे फरसाण २०० रुपये किलो दराने विकले जाते. त्याला यंदा मागणी कमी असल्याची माहिती एका डेअरीचे मालक प्रकाश हसीजा यांनी दिली. 

सोसायट्यांमध्ये कोजागिरी सुनसुनी  कल्याण : कोरोनामुळे यंदा नागरिकांना कोणतेही सण, उत्सव उत्साहात साजरे करता आलेले नाहीत. दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्र मंडळी, महिला मंडळ जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. परंतु, कोरोनाचे विघ्न  टळले नसल्याने अनेक मंडळे, सोसायट्यांनी शुक्रवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली नाही.डोंबिवलीतील रहिवासी वंदना सोनवणे म्हणाल्या की, मागील वेळेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वांगणी येथे फिरायला गेलो होताे. रात्रीच्या चंद्रप्रकाशात दूध, खीर पिण्यासाठी खूप मज्जा आली होती. माहुली गडावर जाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. परंतु, आता कोरोनामुळे महिला मंडळ बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या गच्चीवर जाऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा बेत आखला आहे.घराघरांत खीर-पुरी, श्रीखंड यावर तावकोजागिरीची पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून दिले जाते. शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविण्यात आला. नंतर, नैवेद्य म्हणून ते दूध देण्यात आले. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात खीर-पुरी, श्रीखंड-पुरी, तांदळाची पेज, अशी मेजवानी होती. 

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस