शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
2
Maharashtra Rain Alert: ठाणे, पुण्यासह पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा
3
पाकिस्तान तर विचारही करू शकणार नाही, इराणी मिसाईल्स रोखण्यासाठी इस्त्रायल रोज किती करतोय खर्च माहितीये?
4
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
5
Rishabh Pant, IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध विराट कोहलीच्या जागी कोण बॅटिंगला उतरणार? उपकर्णधार ऋषभ पंतने दिलं उत्तर
6
युद्धाच्या भीतीदरम्यान शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १२० अंकांनी घसरला, IT Stocks वर दबाव
7
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
8
उद्धवसेनेचे माजी नगरसेवक मनसेशी युतीच्या बाजूने
9
Ganeshotsav 2025: मोठ्या पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाचा पेच?
10
गलवान घाटी संघर्षावर आधारित सिनेमात सलमान खानसोबत 'ही' अभिनेत्री दिसणार
11
इराणवर हल्ला करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची मंजुरी; 'या' कारणामुळे थांबवला अंतिम आदेश
12
JM Mhatre: जे. एम. म्हात्रेंच्या ४४ कोटींच्या ठेवी, गुंतवणुकीवर ईडीची टाच
13
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर आज दिल्लीत होणार अंत्यसंस्कार, पण का झाला उशीर?
14
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
15
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
16
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
17
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
18
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
19
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
20
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली

कोजागिरीवर कोरोनाचे सावट, मागच्या वर्षीच्या तुलनेत दूधविक्रीत घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 01:24 IST

कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते.

कल्याण : कोजागिरी पौर्णिमा व ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण शुक्रवारी एकाच दिवशी आले. हा दुग्धशर्करा योग पाहता दुधाची मागणी वाढेल, अशी अपेक्षा शहरातील दूध नाक्यावरील दूधविक्रेत्यांना होती. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे ही अपेक्षा फोल ठरली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत दुधाची विक्री ५० टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे दूध विक्रेत्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.कल्याणचा ऐतिहासिक दूध नाका हा दूधविक्रीसाठी प्रसिद्ध आहे. तेथे पहाटे २ वाजल्यापासून दूधविक्री सुरू होते. दुपारी २, तसेच सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत दूधविक्री होते. पश्चिमेतील मुस्लीमबहुल वस्तीत जवळपास १०० पेक्षा जास्त गोठे असून, त्यातील ताजे म्हशीचे दूध काढून जवळच असलेल्या दूध नाक्यावर सुटे विकले जाते. विशेष म्हणजे, ताज्या दुधाचा प्रतिलीटर भाव दररोज बदलत असतो. कोजागिरीला किरकोळ विक्रीसह अनेक सोसायट्या येथे दुधाची खरेदी करतात. १० ते ५० लीटरपर्यंत दूध येथून सोसायट्या घेऊन जातात. मग रात्री सोसायटीच्या आवारात अथवा गच्चीवर कोजागरी साजरी केली जाते. प्रत्येकाला चंद्रप्रकाशात गरम दूध दिले जाते.ईद-ए-मिलादला मुस्लीमही दूध खरेदी करतात. त्यामुळे यंदा कोजागिरी व ईद-ए-मिलादला दुधाची जास्त विक्री होईल, अशी अपेक्षा विक्रेत्यांची होती. शुक्रवारी सकाळी दूध नाक्यावर दुधाचा भाव प्रतिलीटरमागे ६० रुपये होता, तर दुपारी २ वाजता हा भाव १० रुपयांनी वाढून ७० रुपये झाला. दिवसभरात केवळ १० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षी किमान २० हजार लीटर दुधाची विक्री झाली. मागच्या वर्षीच्या दुलनेत यंदा विक्रीत ५० टक्के घट आहे. त्याचा फटका दूधविक्रेत्यांना बसल्याची माहिती दूधविक्रेते मोहम्मद हनी यांनी दिली. कोरोनामुळे दुधाची विक्री कमी झाली आहे.लोक एकत्रित येऊन सण साजरा करू शकत नाही. त्यामुळे जास्तीचे दूध घेऊन ते काय करणार, असा प्रश्न ग्राहकांनी उपस्थित केला.गरम दुधासोबत चटकदार लाल शेव असलेले फरसाण जास्त विकले जाते. ते केवळ कोजागिरीनिमित्त तयार केले जाते. कोजागिरीला या खास फरसाणची जास्त मागणी असते. हे फरसाण २०० रुपये किलो दराने विकले जाते. त्याला यंदा मागणी कमी असल्याची माहिती एका डेअरीचे मालक प्रकाश हसीजा यांनी दिली. 

सोसायट्यांमध्ये कोजागिरी सुनसुनी  कल्याण : कोरोनामुळे यंदा नागरिकांना कोणतेही सण, उत्सव उत्साहात साजरे करता आलेले नाहीत. दसरा आणि दिवाळीदरम्यान येणारी कोजागिरी पौर्णिमा ही खास मित्र मंडळी, महिला मंडळ जमवून गप्पांच्या साथीने रात्र जागविण्याचे एक चांगले निमित्त असते. परंतु, कोरोनाचे विघ्न  टळले नसल्याने अनेक मंडळे, सोसायट्यांनी शुक्रवारी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली नाही.डोंबिवलीतील रहिवासी वंदना सोनवणे म्हणाल्या की, मागील वेळेस कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री वांगणी येथे फिरायला गेलो होताे. रात्रीच्या चंद्रप्रकाशात दूध, खीर पिण्यासाठी खूप मज्जा आली होती. माहुली गडावर जाऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला. परंतु, आता कोरोनामुळे महिला मंडळ बाहेर पडत नाही. त्यामुळे प्रत्येकाने घराच्या गच्चीवर जाऊन कोजागिरी पौर्णिमा साजरी करण्याचा बेत आखला आहे.घराघरांत खीर-पुरी, श्रीखंड यावर तावकोजागिरीची पूजा झाल्यावर पोहे आणि नारळाचे पाणी नैवेद्य म्हणून दिले जाते. शरद ऋतूमधील पौर्णिमेच्या स्वच्छ चांदण्यात दूध आटवून चंद्राला आटीव दुधाचा नैवेद्य दाखविण्यात आला. नंतर, नैवेद्य म्हणून ते दूध देण्यात आले. अनेक घरांमध्ये रात्रीच्या जेवणात खीर-पुरी, श्रीखंड-पुरी, तांदळाची पेज, अशी मेजवानी होती. 

टॅग्स :kalyanकल्याणCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस