शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
2
इकडे सुप्रिम कोर्टात सुनावणी, तिकडे दोन्ही शिवसेना एकत्र लढणार? गोंडस नाव दिले, म्हणे उद्धव ठाकरेंची परवानगी...
3
दिल्ली ब्लास्टचं इंटरनॅशनल कनेक्शन? पाकिस्तानच नव्हे, 'या' मुस्लीम देशाचं नावही येतंय समोर; पासपोर्टवरून धक्कादायक खुलासा!
4
'त्या' पोस्टरनं उलगडलं जैशचं टेरर मॉड्युल; समोर आला फोटो, एक महिना आधीच पाकिस्तानातून..
5
Bihar Election Exit Poll: मैथिली ठाकूर हरणार की जिंकणार, एक्झिट पोलचा अंदाज काय?
6
बापरे... ६ बायका...! सर्व जणी एकाच वेळी प्रेग्नन्ट; इंटरनेटवर व्हायरल होतोय हा युवक; बघा VIDEO
7
Motorola: ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५००० एमएएचची बॅटरी; 'हा' वॉटरप्रूफ फोन झाला आणखी स्वस्त!
8
शिवसेना कुणाची? आता सुप्रीम कोर्टात पुढच्याच वर्षी अंतिम सुनावणी होणार; आजची तारीख पुढे ढकलली
9
₹१ च्या शेअरची कमाल, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹१ कोटी; ₹१४५ वर आला भाव, तुमच्याकडे आहे का?
10
लग्नात बूट चोरल्यानं भडकला नवरा, वरमाला फेकली; नाराज नवरीनेही लग्न मोडले, अनवाणीच परत पाठवला
11
वनप्लस 15 ची किंमत रिलायन्स डिजिटलने लीक केली, डिलीटही केली पण...; गुगलवर आताही दिसतेय...
12
Swami Samartha: देवाजवळ दिवा लावताना काच फुटली, दिवा पडला तर स्वामींना करावी 'ही' प्रार्थना!
13
अतूट प्रेम! कोमात असलेल्या लेकीला शुद्धीवर आणण्यासाठी १० वर्ष आईने रोज केला डान्स अन्...
14
सलग तिसऱ्या दिवशी बाजारात तेजी! IT शेअर्समध्ये जोरदार खरेदी, एशियन पेंट्स टॉप गेनर, कुठे झाली घसरण?
15
Delhi Blast : "दावत के लिए बिरयानी तैयार..."; दिल्ली स्फोटासाठी खास कोडवर्ड, चॅट बॉक्समध्ये धक्कादायक खुलासा
16
Shreeji Global FMCG Shares: पहिल्याच दिवशी शेअरची स्थिती खराब; १२५ रुपयांचा शेअर आला ९९ रुपयांवर, गुंतवणूकदारांवर डोकं धरण्याची वेळ
17
बिहार निवडणुकीत NDA पराभूत झाल्यास निफ्टी ७% पर्यंत घसरू शकतो? ब्रोकरेज फर्मने दिला इशारा
18
सोनम-राजाचं लग्न ते बेवफाई अन् हत्या... सगळं समोर येणार! राजा रघुवंशी हत्या प्रकरणात कुणी दिली पहिली साक्ष?
19
जीएसटी रद्द झाल्यानं जीवन, आरोग्य विमा घेण्याचं प्रमाण वाढलं; प्रीमियम वाढून ३४,००७ कोटी रुपयांवर 
20
'पैसे दुप्पट' करणारा ते अल फलाह युनिव्हर्सिटीचा मालक; हा जावेद अहमद सिद्दीकी कोण?

Corona Virus News: संचारबंदीसाठी ठाणे पोलीस सज्ज: विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार करडी नजर

By जितेंद्र कालेकर | Updated: April 15, 2021 00:07 IST

वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो.

ठळक मुद्दे कलम १४४ चा भंग केल्यास होणार कारवाईएसआरपीएफसह राहणार पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळल्यास संबंधितांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.राज्य शासनाने यापूर्वीच रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश ४ एप्रिलपासून लागू केले होते. आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून संपूर्ण संचारबंदीसाठी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात तसेच ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडयाही (एसआरपीएफ) तैनात केल्या आहेत. आयुक्तालयात एसआरपीएफच्या पाच कंपन्या (५०० जवान), ५०० होमगार्डस्, पोलीस मुख्यालयातील ७०० कर्मचारी याशिवाय, तीन हजार ५०० स्थानिक पोलिसांचा फौजफाटा खास संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. याशिवाय, वाहतूक शाखेचे ५०० कर्मचारीही दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये रस्त्यावर जागोजागी तैनात केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त वाहनांवर फिरणारे, मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणारे आणि अत्यावश्यक कामाचे नाव सांगून बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जागोजागी नाकाबंदी केली असून या सर्व ठिकाणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त नाकाबंदीचे नाक्यांवर अचानक तपासणी करणार आहेत.* काय होणार कारवाई-विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. जर तो एखाद्या वाहनातून जात असेल तर १७९ नुसार आदेशाचा भंग केल्यामुळे कलम २०७ प्रमाणे त्याच्याकडील वाहन जप्तीचीही कारवाई होऊ शकते.* तर अटकेचीही कारवाई होऊ शकते-संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे कोणी आढळून आल्यास त्याची आधी खातरजमा केली जाणार आहे. तो जर रुग्णालय, मेडिकल, औषध निर्माण कंपनी किंवा वाहतूकीसाठी जात असेल किंवा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, अधिस्वीकृती पत्रकार तसेच रुग्णालयीन कर्मचारी असल्याचे आढळले तर कोणतीही कारवाई होणार नाही. पण यापैकी काहीही नसतांना पोलिसांशी हुज्जत घातली तर गरज पडली तर त्याच्यावर अटकेचीही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.* ठाणे ग्रामीणमध्येही बंदोबस्त-ठाणे ग्रामीणमध्येही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड, गणेशपूरी आणि शहापूर या विभागांमधील ११ पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त आहे. याठिकाणीही नाकाबंदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस