शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

Corona Virus News: संचारबंदीसाठी ठाणे पोलीस सज्ज: विनाकारण फिरणाऱ्यांवर राहणार करडी नजर

By जितेंद्र कालेकर | Updated: April 15, 2021 00:07 IST

वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो.

ठळक मुद्दे कलम १४४ चा भंग केल्यास होणार कारवाईएसआरपीएफसह राहणार पोलीस बंदोबस्त

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाढत्या कोरोनाची श्रृंखला तोडण्यासाठी राज्यभरात बुधवारी रात्रीपासून संचारबंदी लागू केली आहे. या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आणि ग्रामीणमध्ये राज्य राखीव दलाच्या पाच तुकडयांसह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. कोणीही अत्यावश्यक कारणाशिवाय फिरतांना आढळल्यास संबंधितांवर कलम १८८ नुसार गुन्हे दाखल केले जाणार आहेत.राज्य शासनाने यापूर्वीच रात्रीची संचारबंदी आणि दिवसा जमावबंदीचे आदेश ४ एप्रिलपासून लागू केले होते. आता कोरोनाची साखळी तोडण्यासाठी १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजल्यापासून संपूर्ण संचारबंदीसाठी कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या पाच परिमंडळात तसेच ठाणे ग्रामीण कार्यक्षेत्रात स्थानिक पोलिसांसह राज्य राखीव दलाच्या तुकडयाही (एसआरपीएफ) तैनात केल्या आहेत. आयुक्तालयात एसआरपीएफच्या पाच कंपन्या (५०० जवान), ५०० होमगार्डस्, पोलीस मुख्यालयातील ७०० कर्मचारी याशिवाय, तीन हजार ५०० स्थानिक पोलिसांचा फौजफाटा खास संचारबंदीच्या बंदोबस्तासाठी तैनात केला आहे. याशिवाय, वाहतूक शाखेचे ५०० कर्मचारीही दिवस आणि रात्र अशा दोन शिफ्टमध्ये रस्त्यावर जागोजागी तैनात केले आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त वाहनांवर फिरणारे, मॉर्निंग वॉक किंवा सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडणारे आणि अत्यावश्यक कामाचे नाव सांगून बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस आणि वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. जागोजागी नाकाबंदी केली असून या सर्व ठिकाणी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेकला तसेच अतिरिक्त पोलीस आयुक्त किंवा पोलीस उपायुक्त नाकाबंदीचे नाक्यांवर अचानक तपासणी करणार आहेत.* काय होणार कारवाई-विनाकारण फिरतांना कोणीही आढळल्यास त्यांच्यावर कलम १४४ चा भंग केल्यामुळे १८८ प्रमाणे गुन्हा दाखल होऊ शकतो. जर तो एखाद्या वाहनातून जात असेल तर १७९ नुसार आदेशाचा भंग केल्यामुळे कलम २०७ प्रमाणे त्याच्याकडील वाहन जप्तीचीही कारवाई होऊ शकते.* तर अटकेचीही कारवाई होऊ शकते-संचारबंदीच्या आदेशाचा भंग केल्याचे कोणी आढळून आल्यास त्याची आधी खातरजमा केली जाणार आहे. तो जर रुग्णालय, मेडिकल, औषध निर्माण कंपनी किंवा वाहतूकीसाठी जात असेल किंवा सफाई कामगार, सुरक्षा रक्षक, अधिस्वीकृती पत्रकार तसेच रुग्णालयीन कर्मचारी असल्याचे आढळले तर कोणतीही कारवाई होणार नाही. पण यापैकी काहीही नसतांना पोलिसांशी हुज्जत घातली तर गरज पडली तर त्याच्यावर अटकेचीही कारवाई केली जाऊ शकते, असे पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.* ठाणे ग्रामीणमध्येही बंदोबस्त-ठाणे ग्रामीणमध्येही पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली मुरबाड, गणेशपूरी आणि शहापूर या विभागांमधील ११ पोलीस ठाण्यांच्या पातळीवर बंदोबस्त आहे. याठिकाणीही नाकाबंदी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिस