शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
4
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
5
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
6
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
7
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
8
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
9
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
10
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
11
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
12
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
13
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
14
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
15
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
16
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
18
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
19
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
20
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भार्इंदर परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांचा संप तीस-या दिवशी देखील सुरुच ; प्रशासनाची बघ्याची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 19:30 IST

नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले असुन दुसरी कडे प्रशासनाने मात्र कोणतीच पर्यायी व्यवस्था न करता निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.

मीरारोड : नाताळचा सण व सुट्टीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरु केलेला संप आज तिस-या दिवशी देखील कायम असल्याने बससेवे अभावी नागरीकांचे प्रचंड हाल होत आहेत. शिवसेनेने सत्ताधारी भाजपा व प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले असुन दुसरी कडे प्रशासनाने मात्र कोणतीच पर्यायी व्यवस्था न करता निव्वळ बघ्याची भूमिका घेतली आहे.पालिकेत भाजपाची स्पष्ट बहुमताची सत्ता आहे. तर स्वत: आ. मेहता हेच श्रमीक जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष आहेत. तसे असताना पालिकेच्या परिवहन उपक्रांतील कंत्राटी कामगारांचा किमान वेतना नुसारचा फरक, गेल्या महिन्याचे कमी मिळालेले वेतन आदी मागण्यां वरुन कर्मचा-यांनी शुक्रवारी दुपार पासुन अचानक संप सुरु केला. परिवहनची तरतुदच संपल्याने ठेकेदारास वेतनाची कमी रक्कम अदा केली. जेणे करुन कर्मचारयांना देखील कमी वेतन मिळाले.कर्मचा-यांनी आ. मेहता यांच्या नेतृत्वाखाली सुरु केलेल्या या संपा मुळे शहरातील हजारो नागरीक मात्र वेठीस धरले गेले आहेत. विशेषत: मुर्धाते उत्तन - चौक व थेट गोराई तर काशिमीरा, हाटकेश, कनकिया आदि भागातील प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. रीक्षा शिवाय दुसरा कुठलाच पर्याय नसल्याने रीक्षावाल्यांनी देखील अव्वाच्या सव्वा भाडं आकारुन लूटमार चालवली आहे.त्यातही सुट्टीचे दिवस असल्याने लोकं सहकुटुंब बाहेर पडतात. शिवाय नाताळचा सण असुन उत्तन - चौक - डोंगरी आदी भागात मोठ्या संख्येने राहणारया ख्रिस्ती बांधवांना याचा जाच सहन करावा लागतोय. मंगळवार २६ रोजी काशिमीरा येथील संत जेरॉम चर्च ची यात्रा असल्याने तेथे मोठ्या संख्यने यात्रेकरु जातात. बस सेवा बंदचा फटका नागरीकांना बसतोय.महापौर डिंपल मेहता यांच्या दालनात आ. नरेंद्र मेहता, उपमहापौर चंद्रकांत वैती यांच्या सोबत आयुक्त डॉ. नरेश गीते आदिंची बैठक झाली. त्यात मध्ये परिवहन उपक्र माची आर्थिक तरतुद गेल्याच महिन्यात संपली असल्याने आवश्यक तरतुदीचे पुर्नविनीयोजन करुन घेण्यासह मंगळवारी बँका सुरु होताच रक्कम देण्याची तयारी प्रशासनाने दाखवली. पण कर्मचा-यांच्या नेतृत्वाने मात्र आडमुठेपणा कायम ठेवल्याने संप तिसरया दिवशी देखील सुरुच आहे.पालिका प्रशासनाने देखील सत्ताधारयांच्या संपा बद्दल कमालीची गुळमुळीत भुमिका घेतली असुन नागरीकांच्या सोयीसाठी कुठलीही पर्यायी व्यवस्थाच केली नाही. प्रशासनाने निव्वळ बघ्याची भुमिका घेतली आहे. संपा मुळे नागरीकांचे हाल होत असुन उत्तन, डोंगरी, पाली, चौक आदी भागात संतापाचे वातावरण असुन शिवसेने सत्ताधारी भाजपा व पालिका प्रशासनाच्या निषेधाचे फलक लावले आहेत. आ. मेहतांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोन घेतला नाही.विजयकुमार म्हसाळ (उपायुक्त मुख्यालय ) - आ. मेहतांना मंगळवारी बँका उघडताच आर्थिक तरतुद करुन पैसे अदा करतो संप मागे घ्यावा असे सांगीतले आहे.आॅलवीस फॅरो ( प्रवाशी संघटना अध्यक्ष ) - नाताळचा सण आहे. या आधी दिवाळीत असाच कर्मचा-यांनी अचानक संप केला होता. सत्ताधारी यांनीच असे अचानक संप करुन सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणे निषेधार्ह्यच आहे.अरुण कदम ( माजी उपनगारध्यक्ष ) - सत्ता हातात असताना स्वत:च्या संघटनेतील कर्मचारयांचे प्रश्न सोडवायचे नाहीत व त्यांचा स्वत:च्या फायद्यासाठी गैरवापर करुन घेत आहेत. भाजपा व त्यांच्या नेत्याने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणे म्हणजे मनमानीपणाचा कळस आहे. पालिकेने कर्मचा-यांना न्याय द्यावा पण कर्मचारयांनी देखील नेत्यासारखा आडमुठेपणा करता बस सुरु कराव्यात अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकMira Bhayanderमीरा-भाईंदर