शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसची पूर्ण भिस्त राहणार राष्ट्रवादीवरच

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 2:55 AM

भिवंडी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे.

- श्याम राऊतमुरबाड - भिवंडी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक २९ एप्रिल रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी युती आणि आघाडी दोहोंनी कंबर कसली आहे. युतीच्या वाटणीत भिवंडीची जागा भाजपाच्या वाट्याला, तर आघाडीत ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेली आहे. या मतदारसंघाचे विद्यमान खासदार कपील पाटील हे भाजपाचे असून, यावेळीही त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसचा उमेदवार कोण असणार, हे अद्याप गुलदस्त्यात असले, तरी एकूणच चित्र पाहता काँग्रेसची भिस्त बहुतांशी राष्ट्रवादीवरच अवलंबून असणार आहे.भिवंडी लोकसभा मतदारसंघात २00९ साली काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे हे निवडून आले होते. २0१४ मध्ये टावरे यांना डावलून भाजपातून आलेले कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली गेली. विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने कुणबी कार्ड खेळले. कारण या मतदारसंघात मुरबाड, शहापूर, भिवंडीचा ग्रामीण भाग आणि कल्याणच्या ग्रामीण भागात कुणबी समाज मोठा आहे. शिवाय शहापूर, मुरबाडमध्ये राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे.भिवंडी शहरातील मुस्लिम मतदार कोणत्याही परिस्थितीत भाजपाला मतदान करणार नाही, असा अंदाज बांधून विश्वनाथ पाटील यांना उमेदवारी दिली गेली. यावर उपाय म्हणून भाजपाने कपील पाटील यांना राष्ट्रवादीतून आयात करून उमेदवारी दिली. त्यामुळे कुणबी विरु द्ध आगरी लढत होऊन विश्वनाथ पाटील जिंकतील, असा सर्वांचाच अंदाज होता; मात्र प्रत्यक्षात उलटेच झाले. मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादीचे आमदार किसन कथोरे व माजी आमदार गोटीरामभाऊ पवार हे विश्वनाथ पाटील यांच्यासोबत असतानाही, ज्या गावात राष्ट्रवादीशिवाय कुणालाच मतदान होत नव्हते, तेथेदेखील कपील पाटील यांना आघाडी मिळाली. राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत असलेल्या जवळीकीमुळे कपील पाटील यांना मुरबाड विधानसभा मतदारसंघात पन्नास हजार मतांची आघाडी मिळाली. हिच आघाडी कपील पाटील यांचा विजय तर विश्वनाथ पाटील यांचा पराभव करून गेली; मात्र त्यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केलेली चूक सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीला मारक ठरून माजी आमदार गोटीरामभाऊ पवार यांना पराभव पत्करावा लागला. आता तशी परिस्थिती राहीली नाही. कपील पाटील यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मदत केली; मात्र पाटील यांच्याकडून त्यांना सहकार्य तर मिळालेच नाही, उलट मुरबाड तालुक्यात राष्ट्रवादी संपवण्यासाठी प्रयत्न केले. यावेळच्या निवडणुकीत त्याचे पडसाद कसे उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.काँग्रेसच्या उमेदवारीसाठी माजी खासदार सुरेश टावरे आणि २0१४ च्या निवडणुकीत पराभूत झालेले विश्वनाथ पाटील हे देव पाण्यात बुडवून बसले आहेत; मात्र काँग्रेसची उमेदवारी आपल्यालाच मिळावी, यासाठी एका बाहेरच्या उमेदवाराचे जिकरीचे प्रयत्न सुरू आहेत.उमेदवारी कोणाला द्यायची याचा निर्णय दिल्लीच्या दरबारात होणार आहे. काँग्रेसची उमेदवारी कुणालाही मिळाली, तरी त्या उमेदवाराची भिस्त राष्ट्रवादीवरच आवलंबून असणार आहे; कारण भिवंडी शहर वगळता उर्वरित मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व नाममात्र आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक