शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

खाजगी इंग्रजी शाळांकडून सक्तीने फीवसुली, पालकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2020 01:36 IST

प्रवेश रद्द केल्यास शाळांवर छडी उगारण्याचा मनसेचा इशारा

ठाणे : लॉकडाऊनच्या काळातही काही खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडून सक्तीने फीवसुली केली जात असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. विद्यार्थी घरातूनच आॅनलाइन शिक्षण घेत असताना प्रवेश फीबरोबर इतर सुविधांची फी भरण्याचा तगादा या शाळांनी लावला आहे. तसेच फी न भरल्यास विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केला जाईल, असेही शाळांनी सांगितल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत, मनसेकडे पालकांच्या तक्रारी आल्या आहेत. फी न भरलेल्या विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द केल्यास शाळांवर मनसे स्टाइलने छडी उगारणार असल्याचा इशारा मनसेने दिला आहे.काही इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांनी पालकांना ३१ आॅगस्टपर्यंत चालू शैक्षणिक वर्षाची फी भरण्यास सांगितले आहे. परंतु, लॉकडाऊनमध्ये अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्याने त्यांना फी भरणे शक्य नाही. त्यामुळे या फीमध्ये सवलत द्यावी आणि प्रवेश फीव्यतिरिक्त इतर फी वसूल करू नये, अशी मागणी पालक प्रतिनिधींनी शाळा व्यवस्थापनाकडे केली. परंतु, त्यांच्याकडे विनंती करूनही शाळा व्यवस्थापन दुर्लक्ष करीत असल्याच्या तक्रारी मनसेकडे आल्या आहेत.याबाबत राबोडी येथील सरस्वती विद्यालय शाळेतील पाचवी इयत्तेच्या पालक प्रतिनिधींनी सांगितले की, प्रवेश फीसह प्रयोगशाळा, क्रीडा, मासिक फी, टर्म फी, वाचनालय, संगणक या इतर फीदेखील भरण्याची सक्ती शाळा व्यवस्थापनाने केली आहे. सध्या विद्यार्थी आॅनलाइन शिक्षण घेत आहेत. त्यामुळे इतर सुविधांची फी घेण्याचा प्रश्नच येत नाही. आॅनलाइन शिक्षणासाठी पालकांनी लॅपटॉप, टॅब खरेदी केले, हा भुर्दंड त्यांना बसला नाही का, असा सवालही त्यांनी केला आहे. आता प्रवेश अर्ज भरून घ्या आणि नंतर फी घ्या किंवा प्रवेश अर्ज आणि प्रवेश फीच घ्या. पण, शाळा व्यवस्थापन काहीच ऐकायला तयार नाही.सरकारच्या ३० मार्च २०२० रोजीच्या परिपत्रकात लॉकडाऊन काळात फी भरण्याची सक्ती करू नये, असे म्हटले आहे. हे आम्ही सर्व शाळांना कळविले आहे. पालक त्यांच्या इच्छेनुसार दरमहा, तीन महिन्यांची किंवा वर्षभराची फी भरू शकतात, अशी कायद्यात तरतूददेखील आहे. इतर फी न भरण्याच्या संदर्भात पालक आणि शाळा व्यवस्थापनाने बैठक घ्यावी. त्यात पालकांना त्यांचे म्हणणे मांडता येईल. तसेच, ते फीसंदर्भात असलेल्या समितीकडे जाऊ शकतात.- शेषराव बडे, शिक्षणाधिकारी,जिल्हा परिषदकोरोनाकाळात आॅनलाइन शैक्षणिक साहित्य उदा. लॅपटॉप, वायफाय इत्यादींचा जादा खर्च पालकांना करावा लागत आहे. शाळा प्रशासनाने फी कमी केलीच पाहिजे. शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या आर्थिक परिस्थितीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. कोणत्याही विद्यार्थ्याला फी नाही भरली म्हणून शाळेतून काढले, तर मनसे छडी उगारल्याशिवाय राहणार नाही.- संदीप पाचंगे,जिल्हाध्यक्ष, मनविसेकोविड कधी संपणार, हे माहीत नाही. मग प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक हे नष्टच करून टाकावे का? इलेक्ट्रॉनिक वस्तू, मैदान यांची देखभाल शाळेला करावी लागते. शिक्षक हे माणसे नाहीत का? पालकांनी शिक्षकांना समजून घेण्याची गरज आहे. पालकांना जूनची फी भरायला सांगितली आहे. ३१ आॅगस्ट अंतिम तारीख ही सरकारने दिली आहे. त्यामुळे आम्ही पालकांना या तारखेपर्यंत फी भरण्याचे सांगितले आहे. - मीरा कोर्डे, सरस्वती विद्यालय, राबोडी 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळा