शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेल्या ५४ जणांना नागरिकत्व; फाळणी स्मृतिदिन साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 07:20 IST

सिंधू भवनात फाळणी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले

लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापालिका सिंधू भवनात फाळणी स्मृतिदिनानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. यावेळी फाळणीच्यावेळी सिंधी समाजावर झालेल्या अन्यायाला उजाळा देण्यात आला. सीसीएअंतर्गत पाकिस्तानातूनउल्हासनगरसह अन्य शहरांत आलेल्या ५४ जणांना यावेळी नागरिकत्व देण्यात आले.  कार्यक्रमाला पालिका आयुक्त अजीज शेख, सिंधी कौन्सिलचे महेश सुखरामानी उपस्थित होते.

पालिका सिंधू भवनात स्वातंत्र्यदिनानिमित्त राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद, महाराष्ट्र सिंधी साहित्य ॲकॅडमी, सिंधी कलाकार संगम आणि  पालिका यांच्यावतीने विभाजन विभाषिका स्मृती दिवसाचे आयोजन केले होते. पाकिस्तानातील अल्पसंख्याक हिंदूंवर अन्याय सुरू असून, या अन्यायाला कंटाळून काही वर्षांपूर्वी पाकिस्तानातून उल्हासनगरात आलेल्या ५४ सिंधी नागरिकांना (सीसीए) नागरिकत्व सुधारणा कायद्यान्वये भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, किशोर गवस, उपायुक्त सुभाष जाधव आदी उपस्थित होते.

अत्याचाराच्या मांडल्या व्यथा

प्राध्यापिका प्रिया वाच्छानी आणि सीमा मेंघानी यांच्या प्रयत्नातून सिंधी संस्कृतीच्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. देशाचे नागरिकत्व मिळालेल्या नागरिकांनी पाकिस्तानात त्यांच्यावर झालेल्या अत्याचाराच्या व्यथा मांडल्या. पाकिस्तानात त्यांना भेडसावणाऱ्या समस्या, त्यांचा व्यवसाय आणि धर्म सुरक्षित ठेवणे त्यांना किती कठीण गेले, याबाबत माहिती दिली. हिंदू म्हणून भारतात कसे सुरक्षित आहोत. याबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. या सिंधी भाषिकांना नागरिकत्वासाठी भारतीय सिंधू सभेने मदत केली.

१५० जण नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत

भारताच्या सीएए कायद्यानव्ये १५० जण नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापैकी ५४ जणांना गेल्या तीन महिन्यांत नागरिकत्व मिळाले आहे. अन्य जणांनाही लवकरच नागरिकत्व मिळेल, अशी माहिती महाराष्ट्र सिंधी साहित्य ॲकॅडमीचे अध्यक्ष महेश सुखरामानी यांनी यावेळी दिली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानulhasnagarउल्हासनगर