शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
4
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
5
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
6
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
7
चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
8
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
9
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
10
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
11
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
12
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
13
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
14
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
15
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही
16
Man-Animal Conflict: "आमचं सरकार तुमच्या प्रत्येक दुःखात सोबत", मुख्यमंत्री योगींचे पीडितांना आश्वासन
17
नमाज पढत होते विद्यार्थी, तेवढ्यात झाला मोठा आवाज, शाळेची इमारत कोसळून ६५ विद्यार्थी अडकले 
18
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
19
बाबाचे 'चाळे'! इन्स्टिट्यूटमधील महिलांसोबतच स्वामी चैतन्यानंदचे संबंध; मोबाईलमध्ये मिळाले फोटो
20
खून करुन आलोय, मुलींकडे लक्ष द्या; पत्नीच्या डोळ्यात चटणी टाकून केले वार, कोल्हापुरात हत्येचा थरार

'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:54 IST

शेलार यांनी सोमवारी ठाणे  येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे

ठाणे  :  मुंबईत कोरोना रोखण्यात ज्या पध्दतीने महापालिका आयुक्त कमी पडल्याने त्यांची बदली केली, तोच नियम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याच्या बाबतीत लावून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का? असा सवाल भाजपचे नेते व माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील पालकमंत्र्यांच्याच मतदार संघात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाला अॅम्ब्युलेन्स न मिळाल्याने त्याचाही मृत्यु झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाबतीत हे पाऊल उचरणार का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

शेलार यांनी सोमवारी ठाणे  येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र मागील कित्येक वर्ष महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला एक सुसज्ज हॉस्पीटल बांधता आलेले नसल्याची टिकाही त्यांनी केली. दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आता आरोग्य केंद्र उभारणार आहे. परंतु त्यासाठी नियमात बदल करावा लागतो, त्याचा अधिकार गृहमंत्र्यांना नाही, जे विकास नियंत्रण नियमावली बनवतात तेच ठाण्यातील नगरविकास मंत्र्यांनी जो यु डीसीआर जो मुंबई सोडून संपूर्ण राज्याला लागू होईल त्या प्रस्तावित अंतिम बदल असे करण्याचे ठरविले तो कि 15 टक्के सुविधांच्या जागा, ज्या पूर्वीच्या नियमानुसार मिळणार होत्या, नागरीकांच्या सोईसाठी त्या 15 टक्यांऐवजी, नवीन प्रस्तावित अंतिम युडीसीआरमध्ये त्या 5 टक्यांवर आणल्या आहेत. याचा अर्थ 10 टक्के जागा सुविधा केंद्राच्या खाऊन टाकण्याचे काम, नगरविकासमंत्री करीत आहेत आणि दुस:या बाजूला आम्ही आरोग्य केंद्राच्या जागा वाढवू असे म्हणत आहेत. याचा अर्थ कोरोनाच्या माहामारीमध्ये विकासकाच्या वाटेमारी करण्याचे काम दोनही मंत्री करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

गेल्या अडीच महिन्यापासून केंद्रावर टिका सुरु आहे, आम्ही अडीच महिन्यात आम्ही महत्वाच्या सुचना राज्य सरकाराला दिल्या. परंतु मागणी केली, सुचना केली की तो आमचा विरोध आहे, असेच राज्यसरकारकडून भासवले जात आहे. ऑनलाईन शिक्षणार्पयत येण्यापूर्वी पालक, शैक्षणिक संस्था, तज्ञ मंडळींशी चर्चा करुनच नंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा भाजपचा शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अंतिम वर्षाला शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याचे आदल्या वर्षातील गुण लक्षात घेऊन, त्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्यामुळे साडेतील लाख विद्याथ्र्याना एटीकेटी लागलेली आहे,त्या विद्याथ्र्याचे काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून त्यामुळे या विद्याथ्र्याना नापास करण्याचे काम हे सरकार करणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या एटीकेटीच्या विद्याथ्र्याना न्याय द्या असेही त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेतीलच एक राजकीय संघटना ही शिक्षणविषयक निर्णय घेत असून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हे निर्णय घेत असतांना कोणत्याही प्रकारे कोणालाही विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दुसरीकडे इतर राज्यांनी केंद्राकडून रेल्वेचे आयसोलेशन वॉर्ड घेतले आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारकडून ते अद्यापही का घेतलेले नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित करीत, केवळ खाजगी कंत्रटदारांकडून आयसोलेशन घेऊन त्यांची तिजोरी भरण्याचे कामही या सरकारकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर केंद्राकडून राज्य सरकारला आतार्पयत विविध योजनांपोटी 2800 कोटी मिळालेले आहेत. परंतु त्या निधीचा उपयोग काय केला याचे उत्तरही राज्य सरकाराने द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने 1 लाख 7क् हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यत सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रु पयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यावधी लोकांना मोफत धान्य, शेतक:यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणो. गरीब कुटुंबाना मोफत गॅससिलेंडर देणो, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा विदव्यांगाना थेट आर्थीक मदत करणो असे उपाय केंद्र सरकारने केले. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करु न देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रु पयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. यामध्ये शेतक:यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या फायदेशीर सुधारणोसह अनेक महत्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघुउद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देवून अर्थचक्र  गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप  ठाणे शहर अध्यक्ष आमदार अँड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिका भाजपा गटनेते संजय वाघुले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे