शहरं
Join us  
Trending Stories
1
६७ बिनविरोध नगरसेवक निवडणूक आयोगाच्या रडारवर; दबाव टाकला की आमिष दाखवलं? होणार चौकशी
2
सुकमामध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत १२ नक्षलवादी ठार
3
आघाड्यांचा 'फज्जा', बंडखोरीचा 'धडाका'! उमेदवारी अर्ज माघारीनंतर चित्र झाले स्पष्ट; 'युती' कागदावर, 'मैदानात' मात्र सर्वच स्वतंत्र!
4
तारिक रहमान होणार 'किंग', पण प्रचाराचं काय? बांगलादेशात निवडणूक आयोगाच्या 'या' एका नियमाने वाढवलं टेन्शन!
5
Border 2: मेरा दिमाग हिला हुआ है! 'घर कब आओगे' गाण्याच्या लाँचवेळी सनी देओल असं का म्हणाला?
6
पाकिस्तानची नापाक खेळी; राजस्थानमध्ये ड्रोनने पाठवली 'पांढरी पावडर', पोलिसांनी असा लावला छडा
7
इराणमध्ये खामेनींविरोधात निदर्शने तीव्र, ट्रम्प यांच्या पाठिंब्यामुळे 'Gen-Z' चा उत्साह वाढला
8
एकच प्रीमिअम, पती-पत्नीला मिळणार विमा सुरक्षा प्लॅन; जाणून घ्या कसं?
9
महाराष्ट्राचा शाहरुख खान! पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या उमेश कामतचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन, दाखवले सिक्स पॅक ॲब्स
10
कंडोमच्या किमती वाढल्याने लोकसंख्या वाढेल? सलग तिसऱ्या वर्षी चीनला भीती, भारतासाठी ही एक संधी
11
'ऑपरेशन सिंदूर'वर पाकिस्तानचा यू-टर्न, आता युद्धविरामाचे श्रेय दिले चीनला; आधी ट्रम्प यांना दिलेले
12
‘नवसाचं पोर गेलं, भरपाई दिल्याने परत येणार का?’ दूषित पाण्यामुळे मृत्यू; दोन अधिकाऱ्यांना हटवले
13
इराण पेटला...! सर्वोच्च नेते खामेनेईंविरुद्ध तरुणाईचे रस्त्यावर उतरून आंदोलन; देशाच्या अर्थव्यवस्थेला घरघर, निदर्शनात सात जणांचा मृत्यू
14
कॅनडा सोडायची वेळ आली? १० लाख भारतीयांचे 'लीगल स्टेटस' धोक्यात; जंगलात टेंट लावून राहण्याची आली वेळ!
15
कोण होते सिद्धार्थ भैय्या? हृदयविकाराच्या झटक्यानं निधन; १३ वर्षांत ३७००% रिटर्न, मल्टिबॅगर स्टॉक निवडण्याची कला होती अवगत
16
शेणाने रंगवल्या आहेत नितीन गडकरींच्या घराच्या भिंती, फराह खानने दाखवली झलक, पाहा व्हिडीओ
17
शाहरुख खान अन् भन्साळीही वापरणार 'धुरंधर' फॉर्म्युला? 'किंग' अन् 'लव्ह अँड वॉर' दोन भागांमध्ये येणार
18
Shakambhari Purnima 2026: शाकंभरी पौर्णिमेचा 'महायोग'! 'या' राशींच्या आयुष्यात येणार सुखाचा पूर
19
बायकोने केलं लाखोंचं कर्ज, हप्ते भरून पती झाला कंगाल; अखेर कानपूरच्या व्यापाऱ्याने संपवलं जीवन!
20
Post Office ची जबरदस्त स्कीम, घरबसल्या होईल दरमहा २० हजार रुपयांची कमाई, कोणती आहे स्कीम?
Daily Top 2Weekly Top 5

'मुख्यमंत्री साहेब, तोच नियम लावून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2020 14:54 IST

शेलार यांनी सोमवारी ठाणे  येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे

ठाणे  :  मुंबईत कोरोना रोखण्यात ज्या पध्दतीने महापालिका आयुक्त कमी पडल्याने त्यांची बदली केली, तोच नियम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाण्याच्या बाबतीत लावून ठाणे  जिल्ह्याचे पालकमंत्री बदलणार का? असा सवाल भाजपचे नेते व माजी शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे. ठाण्यातील पालकमंत्र्यांच्याच मतदार संघात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. तसेच एका रुग्णाला अॅम्ब्युलेन्स न मिळाल्याने त्याचाही मृत्यु झाला होता. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांच्या बाबतीत हे पाऊल उचरणार का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

शेलार यांनी सोमवारी ठाणे  येथे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबईसह ठाण्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र मागील कित्येक वर्ष महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेला एक सुसज्ज हॉस्पीटल बांधता आलेले नसल्याची टिकाही त्यांनी केली. दुसरीकडे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एसआरएच्या प्रत्येक प्रकल्पात आता आरोग्य केंद्र उभारणार आहे. परंतु त्यासाठी नियमात बदल करावा लागतो, त्याचा अधिकार गृहमंत्र्यांना नाही, जे विकास नियंत्रण नियमावली बनवतात तेच ठाण्यातील नगरविकास मंत्र्यांनी जो यु डीसीआर जो मुंबई सोडून संपूर्ण राज्याला लागू होईल त्या प्रस्तावित अंतिम बदल असे करण्याचे ठरविले तो कि 15 टक्के सुविधांच्या जागा, ज्या पूर्वीच्या नियमानुसार मिळणार होत्या, नागरीकांच्या सोईसाठी त्या 15 टक्यांऐवजी, नवीन प्रस्तावित अंतिम युडीसीआरमध्ये त्या 5 टक्यांवर आणल्या आहेत. याचा अर्थ 10 टक्के जागा सुविधा केंद्राच्या खाऊन टाकण्याचे काम, नगरविकासमंत्री करीत आहेत आणि दुस:या बाजूला आम्ही आरोग्य केंद्राच्या जागा वाढवू असे म्हणत आहेत. याचा अर्थ कोरोनाच्या माहामारीमध्ये विकासकाच्या वाटेमारी करण्याचे काम दोनही मंत्री करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. 

गेल्या अडीच महिन्यापासून केंद्रावर टिका सुरु आहे, आम्ही अडीच महिन्यात आम्ही महत्वाच्या सुचना राज्य सरकाराला दिल्या. परंतु मागणी केली, सुचना केली की तो आमचा विरोध आहे, असेच राज्यसरकारकडून भासवले जात आहे. ऑनलाईन शिक्षणार्पयत येण्यापूर्वी पालक, शैक्षणिक संस्था, तज्ञ मंडळींशी चर्चा करुनच नंतर शाळा सुरु करण्याचा निर्णय घ्यावा, अन्यथा भाजपचा शाळा सुरु करण्याच्या निर्णयाला विरोध असेल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. अंतिम वर्षाला शिक्षण घेणा:या विद्याथ्र्याचे आदल्या वर्षातील गुण लक्षात घेऊन, त्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु त्यामुळे साडेतील लाख विद्याथ्र्याना एटीकेटी लागलेली आहे,त्या विद्याथ्र्याचे काय होणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून त्यामुळे या विद्याथ्र्याना नापास करण्याचे काम हे सरकार करणार आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. या एटीकेटीच्या विद्याथ्र्याना न्याय द्या असेही त्यांनी सांगितले. तसेच शिवसेनेतीलच एक राजकीय संघटना ही शिक्षणविषयक निर्णय घेत असून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु हे निर्णय घेत असतांना कोणत्याही प्रकारे कोणालाही विश्वासात घेतले जात नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दुसरीकडे इतर राज्यांनी केंद्राकडून रेल्वेचे आयसोलेशन वॉर्ड घेतले आहेत. परंतु महाराष्ट्र सरकारकडून ते अद्यापही का घेतलेले नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित करीत, केवळ खाजगी कंत्रटदारांकडून आयसोलेशन घेऊन त्यांची तिजोरी भरण्याचे कामही या सरकारकडून सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. तर केंद्राकडून राज्य सरकारला आतार्पयत विविध योजनांपोटी 2800 कोटी मिळालेले आहेत. परंतु त्या निधीचा उपयोग काय केला याचे उत्तरही राज्य सरकाराने द्यावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारताने कोरोनाच्या जागतिक साथीचा प्रभावी मुकाबला केला आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाल्यामुळे झळ बसलेल्या दुर्बल घटकांना मदतीसाठी केंद्र सरकारने तातडीने 1 लाख 7क् हजार कोटींचे प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज जाहीर केले व त्याची प्रभावी अंमलबजावणी केली. आतापर्यत सुमारे 42 कोटी गरजूंना 53,248 कोटी रु पयांची मदत देण्यात आली आहे. कोट्यावधी लोकांना मोफत धान्य, शेतक:यांच्या खात्यात थेट पैसे जमा करणो. गरीब कुटुंबाना मोफत गॅससिलेंडर देणो, जनधन खाते असलेल्या महिलांना तसेच गरीब ज्येष्ठ नागरिक, विधवा विदव्यांगाना थेट आर्थीक मदत करणो असे उपाय केंद्र सरकारने केले. देशाची अर्थव्यवस्था पुन्हा उभी करु न देश आत्मनिर्भर करण्यासाठी वीस लाख कोटी रु पयांचे पॅकेज मोदी सरकारने जाहीर केले. यामध्ये शेतक:यांना त्यांच्या मर्जीने शेतमाल विकण्याचे स्वातंत्र्य देण्यासाठीच्या फायदेशीर सुधारणोसह अनेक महत्वाच्या आर्थिक सुधारणाही जाहीर करण्यात आल्या. शेतकरी, लघुउद्योजक, पथारीवाले, छोटे व्यावसायिक अशा सर्व घटकांना मदतीचा हात देवून अर्थचक्र  गतीमान करण्यासाठी मोदी सरकारने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या पॅकेजमुळे कोरोनाच्या आर्थिक संकटातून बाहेर पडेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी भाजप  ठाणे शहर अध्यक्ष आमदार अँड. निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, महापालिका भाजपा गटनेते संजय वाघुले आदी उपस्थित होते. 

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारthaneठाणेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे