शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

ठाण्यातील नालेसफाईची चौकशी मुख्यमंत्र्यांनी करावी : जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2019 11:49 PM

भाजपचे आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील नालेसफाईमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे.

ठाणे : जर ठाण्यातील एखाद्या आंब्याच्या स्टॉलसाठी मुख्यमंत्र्यांकडून फोन येऊ शकतो. तर ठाणे महापालिकेतील नालेसफाईतील भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणीही आ. संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे करावी, असे आवाहन राष्टÑवादीचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी सत्ताधारी भाजपला केले. नालेसफाई ही पावसाळ्यापूर्वीच होणे अपेक्षित आहे. त्यामुळे ती तातडीने करण्याची मागणी ३ मे रोजीच पालिका आयुक्तांकडे केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.भाजपचे आमदार केळकर यांनी ठाणे शहरातील नालेसफाईमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या चौकशीचे आव्हान केळकर यांच्यासह पालिका आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांना त्यांनी दिले.ते म्हणाले, केळकर हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी या भ्रष्टाचाराच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून आणावेत. जर, आंब्याचा एक स्टॉल हटविण्यासाठी मुख्यमंत्री मध्यस्थी करीत असतील, तर लोकांच्या जीविताशी संबंधित असलेला हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलाच पाहिजे. नाल्यातून निर्माण झालेला पैसा कुठे जातो, हे मुख्यमंत्र्यांनी शोधावे, असे आवाहन आव्हाड यांनी केले.गेली दहा वर्षे आम्ही नालेसफाई व्यवस्थित होण्याच्या उद्देशाने ठामपाशी पत्रव्यवहार करीत आहोत. एकच अधिकारी गेली दहा वर्षे नालेसफाईवर लक्ष ठेवून आहे. नालेसफाईचे काम करणारे ठेकेदार कोणाच्या रोजंदारीवर आहेत; नालेसफाईवर गेली २५ वर्षे सत्तेत असलेले लोक का बोलत नाहीत, याची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.नालेसफाईसंदर्भात मागील वर्षी ठाणे महापालिकेचे विरोधी पक्षनेते मिलिंद पाटील यांनी मांडलेली लक्षवेधी आजपर्यंत सभागृहात घेण्यात आलेली नाही. याचीही कारणे आता सत्ताधारी आणि प्रशासनाने जाहीर करावी, अशी मागणीही यावेळी आव्हाड यांनी केली.नालेसफाईला यंदाही उशीरजूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये ठाण्यात पावसाचे आगमन होते. त्याचदरम्यान नालेसफाईला सुरुवात होते. त्यामुळे अर्धी नालेसफाई झाल्याने त्या नाल्यातील कचरा वाहून जातो. बाहेर काढलेला कचराही पावसाच्या पाण्याने पुन्हा त्याच कचºयात मिसळून नाल्यात जातो. पालिकेचे अधिकारी हे नालेसफाईचा उद्योग फक्त पैसे खाण्यासाठीच करीत आहेत, असा आरोप ३ मे रोजी पालिका आयुक्त जयस्वाल यांना दिलेल्या पत्रामध्ये आव्हाड यांनी केला होता. आताही नालेसफाईला उशिर झाला असून गेल्या वर्षी रामचंद्रनगर, संभाजीनगर परिसरातील नाल्यांमधून दोन महिला वाहून गेल्याच्या घटनेकडेही त्यांनी सोमवारी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात लक्ष वेधले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड